शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

मूलच्या कर्मभूमीला मिळाला दुसऱ्यांदा मुख्यमंत्री

By admin | Updated: October 30, 2014 00:44 IST

१९६२ नंतर तब्बल ५२ वर्षांनी चंद्रपूर जिल्ह्यातील मूल या कर्मभूमीला दुसऱ्यांदा मुख्यमंत्री लाभत आहे. २१ नोव्हेंबर १९६२ रोजी कर्मवीर मा.सा. उपाख्य कर्मवीर कन्नमवार यांनी महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री

कन्नमवारांच्या आठवणी ताज्या : देवेंद्र फडणवीसही मूलचेचगोपालकृष्ण मांडवकर - चंद्रपूर१९६२ नंतर तब्बल ५२ वर्षांनी चंद्रपूर जिल्ह्यातील मूल या कर्मभूमीला दुसऱ्यांदा मुख्यमंत्री लाभत आहे. २१ नोव्हेंबर १९६२ रोजी कर्मवीर मा.सा. उपाख्य कर्मवीर कन्नमवार यांनी महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. आता ३१ आॅक्टोबरला महाराष्ट्राचे २३ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत. या दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या राजकीय प्रवासाने भारावलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील मूलवासीयांच्या भावना मात्र या प्रसंगामुळे उचंबळून आल्या आहेत.सर्वसामान्य कार्यकर्ता ते मुख्यमंत्री अशी ‘बॉटम टू टॉप’ प्रवासगाथा असलेल्या या दोन्ही व्यक्तिमत्वांमुळे चंद्रपूर जिल्ह्यासह मूल तालुक्यातील जनतेला प्रचंड आनंद झाला आहे. कर्मवीर कन्नमवार यांचे चंद्रपुरातील भानापेठ वार्डात घर होते. चंद्रपुरातच त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याची सुरूवात झाली. १९३१ मध्ये त्यांनी चंद्रपुरात गांधी सेवा मंडळाची स्थापना केली. या मंडळाचे ते प्रमुख होते. इंग्रज पारतंत्र्याच्या काळात त्यांची सामाजिक आणि राजकीय वाटचाल अतिशय प्रतिकूल परिस्थितीत झाली.मूल-सावली विधानसभा मतदार संघातून ते दोनदा विजयी झाले. त्यावेळी हा मतदार संघ आणि चंद्रपूर जिल्हा मध्यप्रदेशात होता. १९५२ मध्ये ते पहिल्यांदा या मतदार संघातून विजयी झाले. त्यानंतर मध्यप्रदेश मंत्रीमंडळात आरोग्यमंत्री म्हणून त्यांचा समावेश झाला. पुढे महाराष्ट्राची स्थापना झाल्यावर ते मुख्यमंत्री झाले. मूल तालुक्यातील मारोडा ही मा. सा. कन्नमवारांची जन्मभूमी मानली जाते. तर, मूल ही मनोनित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जन्मभूमी आहे. मूलमधील फडणवीस वाड्यात देवेंद्र यांचे बालपण गेले. त्यांचे वडील गंगाधरराव फडणवीस विधान परिषदेवर निवडून गेले होते. त्यांच्या निधनानंतर मूलचा राजकीय वारसा त्यांच्या काकू शोभाताई फडणवीस यांनी चालविला. शिक्षणासाठी देवेंद्र फडणवीस नागपूरला गेल्यावर तिथे संघ परिवाराशी त्यांचा जवळचा संबंध आला. एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते महापौर आणि त्यानंतर भाजपा प्रांताध्यक्ष ते मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास मूलच्या जनतेलाही अचंबित करायला लावणारा आहे. कर्मवीर कन्नमवारांनंतर देवेंद्र फडणवीस यांचे नाव मूलसोबत जोडले जाणार असल्याने या क्षेत्राच्या विकासाची आस लावून बसलेल्यांच्या आशा पालवल्या आहेत. दोघांच्याही प्रवासाची पाऊलवाट सारखीचमा.सा. कन्नमवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्याही सामाजिक आणि राजकीय प्रवासाची पाऊलवाट सारखीच आहे. स्वप्नवत असलेला या दोघांचाही प्रवास थक्क करायला लावणारा आहे. कर्मवीर कन्नमवार यांनी काँग्रेस सेवादलाच्या माध्यमातून कामाला सुरूवात केली. चंद्रपुरातील गांधी चौकात एका फळ्यावर बातम्यांचे मजकूर आणि मथळे लिहून जनप्रबोधन केले. तर, देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या रांगेत बसून नागपुरातील संघ कार्यालयातून आयुष्याला दिशा दिली.