शहरं
Join us  
Trending Stories
1
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा पंतप्रधान म्हणून उल्लेख; योगायोग की राजकीय भूकंपाचे संकेत?
2
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
3
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
4
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
5
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
6
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
7
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
8
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
9
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
10
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
12
Viral Video: "हे फूटपाथ चालण्यासाठी आहेत, गाड्यांसाठी नाही!" परदेशी नागरिकांकडून पुणेकरांना शिस्तीचा धडा
13
ड्रॅगनला मोठा झटका! चिनच्या 'या' वस्तूवर ५ वर्षांसाठी 'अँटी-डंपिंग ड्युटी' लागू; स्थानिक उद्योगांना मिळणार बळ
14
Anurag Dwivedi : क्रूझवर शाही लग्न, लक्झरी कारचा मालक; कोट्यवधींची कमाई करुन दुबईला पळाला प्रसिद्ध युट्यूबर
15
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
16
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
17
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
18
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
19
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
20
ICICI Prudential AMC IPO: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला व्हिजन दिले

By admin | Updated: January 2, 2017 02:07 IST

मी महाराष्ट्राच्या विधिमंडळात काम करीत असताना मला पक्षाच्या आदेशाने दिल्लीला जावे लागले

गडकरींचे गौरवोद्गार : देवेंद्र फडणवीस यांना ‘नागभूषण पुरस्कार’ पुरस्कार प्रदान नागपूर : मी महाराष्ट्राच्या विधिमंडळात काम करीत असताना मला पक्षाच्या आदेशाने दिल्लीला जावे लागले आणि माझ्यानंतर ही जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर पडली. त्यांनी हे आव्हान स्वीकारले आणि आपल्या अभ्यासू वृत्तीच्या बळावर तत्कालीन सरकारचे अनेक घोटाळे बाहेर काढले. त्यांच्या भाषणांची चर्चा व्हायला लागली, त्यांच्या नेतृत्वाची झलक अवघ्या महाराष्ट्राने पाहिली. आज तेच अभ्यासू फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राला व्हिजन देणारा हा नेता आहे. त्यांच्या नेतृत्वात राज्य विकासाचा एक नवीन इतिहास निर्माण करेल, असा आशावाद केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. नागभूषण फाऊंडेशनच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा ‘नागभूषण पुरस्कार’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रविवारी गडकरींच्या हस्ते प्रदान करण्यात आला या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर तर विशेष अतिथी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही. एस. सिरपूरकर, खा. अजय संचेती, महापौर प्रवीण दटके, माजी खासदार दत्ता मेघे यांच्यासह मंचावर नागभूषण फाऊंडेशनचे सचिव डॉ. गिरीश गांधी, अध्यक्ष प्रभाकरराव मुंडले, उपाध्यक्ष सत्यनारायण नुवाल, कोषाध्यक्ष ब्रजकिशोर अग्रवाल उपस्थित होते. गडकरी पुढे म्हणाले, आम्हाला राज्याचा व देशाही विकास अपेक्षित आहे. परंतु मी आणि देवेंद्र दोघेही नागपूरचे असल्याने आम्ही नागपूरवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. काही जण त्यावरही टीका करीत आहेत. परंतु त्या टीकेची पर्वा नाही. प्रत्येकाचे आपल्या शहरावर विशेष प्रेम असते तसे ते आमचेही आहे आणि या प्रेमापोटी आम्ही ही विकासगंगा शहरात आणली आहे. सत्तेत नसताना अनेक अपमान पचवले. ब्राह्मणांचा पक्ष म्हणून हेटाळणीही सहन केली. परंतु आज सर्वाधिक ओबीसी आमच्या पक्षात आहेत. सत्ता येईल -जाईल, शेवटी तुम्ही सत्तेतून काय विचार देता हे महत्त्वाचे आहे. देवेंद्रवरही त्याच विधायक विचारांचे संस्कार झाले आहेत. म्हणूनच त्याला आज ‘नागभूषण पुरस्कार’ प्रदान करताना मला विशेष आनंद होत असल्याचे गडकरींनी सांगितले. डॉ. गिरीश गांधी म्हणाले, हा सत्कार म्हणजे नागपूरच्या एका कर्तृत्ववान सुपुत्राने दुसऱ्या कर्तृत्ववान सुपुत्राचा केलेला सन्मान आहे. जे या आधी कुणाला जमले नाही त्या महाराष्ट्राचे राजकारण फडणवीसांनी कवेत आणल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही. एस. सिरपूरकर यांनीही आपल्या भाषणातून मुख्यमंत्र्यांशी असलेल्या कौटुंबिक संबंधांना उजाळा देत त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. प्रास्ताविक खा. अजय संचेती यांनी केले. संचालन रेखा दंडिगे तर आभार अशोक गांधी यांनी मानले. या कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी) पद्मभूषणपेक्षाही मोठा पुरस्कार - मुख्यमंत्री आज हा जो पुरस्कार मला मिळालाय तो माझ्यादृष्टीने पद्मभूषणपेक्षाही मोठा पुरस्कार आहे. याचे कारण, एक तर ही कौतुकाची थाप देणारी मंडळी माझ्या घरची आहेत आणि दुसरे म्हणजे ही पुरस्कार मला नितीन गडकरींच्या हस्ते मिळतोय. माझ्या या यशात नितीनजींचा फार मोठा वाटा आहे. त्यांनीच मला राजकारणात आणले म्हणून मी मुख्यमंत्री होऊ शकलो. मला राजकारण फार करता येत नाही. जे जनहिताचे आहे ते मी करीत असतो. ते करताना परिणामांची पर्वा करीत नाही. मी तुम्हाला शब्द देतो येत्या पाच वर्षात विदर्भाचा चेहरा पूर्णपणे बदललेला असेल. त्यातल्यात्यात नागपूरवर माझे विशेष लक्ष आहे. कारण, हे माझे शहर आहे. माझ्या जीवनाचा शेवट याच शहरात होणार आहे. मुंबई-पुण्यासह आम्हाला अवघ्या महाराष्ट्रालाच विकासाची नवी दिशा द्यायची आहे या शब्दात मुख्यमंत्र्यांनी सत्काराला उत्तर दिले व हे विकासपर्व कसे सुरू आहे हे सांगताना विविध भागात सुरू असलेल्या योजनांची आकडेवारीसह माहितीही दिली. फडणवीसांची विनयशीलता अन् गडकरींचे आशीर्वाद शाल, श्रीफळ व एक लक्ष रुपयाचा धनादेश असे स्वरुप असलेला ‘नागभूषण पुरस्कार’ गडकरींनी मुख्यमंत्र्यांना प्रदान केल्यावर मुख्यमंत्र्यांनी गडकरींचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतला. गडकरींनीही मुख्यमंत्र्यांना कडकडून मिठी मारली. यावेळी अवघे सभागृह टाळ्यांनी दणाणून गेले. मला कधीच मुख्यमंत्री व्हायचे नव्हते देवेंद्र मुख्यमंत्री झाला तेव्हा अनेक जण बोलत सुटले की गडकरींची संधी गेली. परंतु मुख्यमंत्री झालोच पाहिजे अशी अपेक्षा मी कधीच बाळगली नाही. या विषयावरून आमच्यात कधी मतभेदही झाले नाहीत. हा मीडियाने फुगवलेला फुगा आहे. आम्हा दोघांमध्येही योग्य संवाद नि समन्वय आहे, अशा शब्दात गडकरी व फडणवीस यांच्यात लावालावी करणाऱ्यांना गडकरींनी इशारा दिला.