शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला व्हिजन दिले

By admin | Updated: January 2, 2017 02:07 IST

मी महाराष्ट्राच्या विधिमंडळात काम करीत असताना मला पक्षाच्या आदेशाने दिल्लीला जावे लागले

गडकरींचे गौरवोद्गार : देवेंद्र फडणवीस यांना ‘नागभूषण पुरस्कार’ पुरस्कार प्रदान नागपूर : मी महाराष्ट्राच्या विधिमंडळात काम करीत असताना मला पक्षाच्या आदेशाने दिल्लीला जावे लागले आणि माझ्यानंतर ही जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर पडली. त्यांनी हे आव्हान स्वीकारले आणि आपल्या अभ्यासू वृत्तीच्या बळावर तत्कालीन सरकारचे अनेक घोटाळे बाहेर काढले. त्यांच्या भाषणांची चर्चा व्हायला लागली, त्यांच्या नेतृत्वाची झलक अवघ्या महाराष्ट्राने पाहिली. आज तेच अभ्यासू फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राला व्हिजन देणारा हा नेता आहे. त्यांच्या नेतृत्वात राज्य विकासाचा एक नवीन इतिहास निर्माण करेल, असा आशावाद केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. नागभूषण फाऊंडेशनच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा ‘नागभूषण पुरस्कार’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रविवारी गडकरींच्या हस्ते प्रदान करण्यात आला या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर तर विशेष अतिथी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही. एस. सिरपूरकर, खा. अजय संचेती, महापौर प्रवीण दटके, माजी खासदार दत्ता मेघे यांच्यासह मंचावर नागभूषण फाऊंडेशनचे सचिव डॉ. गिरीश गांधी, अध्यक्ष प्रभाकरराव मुंडले, उपाध्यक्ष सत्यनारायण नुवाल, कोषाध्यक्ष ब्रजकिशोर अग्रवाल उपस्थित होते. गडकरी पुढे म्हणाले, आम्हाला राज्याचा व देशाही विकास अपेक्षित आहे. परंतु मी आणि देवेंद्र दोघेही नागपूरचे असल्याने आम्ही नागपूरवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. काही जण त्यावरही टीका करीत आहेत. परंतु त्या टीकेची पर्वा नाही. प्रत्येकाचे आपल्या शहरावर विशेष प्रेम असते तसे ते आमचेही आहे आणि या प्रेमापोटी आम्ही ही विकासगंगा शहरात आणली आहे. सत्तेत नसताना अनेक अपमान पचवले. ब्राह्मणांचा पक्ष म्हणून हेटाळणीही सहन केली. परंतु आज सर्वाधिक ओबीसी आमच्या पक्षात आहेत. सत्ता येईल -जाईल, शेवटी तुम्ही सत्तेतून काय विचार देता हे महत्त्वाचे आहे. देवेंद्रवरही त्याच विधायक विचारांचे संस्कार झाले आहेत. म्हणूनच त्याला आज ‘नागभूषण पुरस्कार’ प्रदान करताना मला विशेष आनंद होत असल्याचे गडकरींनी सांगितले. डॉ. गिरीश गांधी म्हणाले, हा सत्कार म्हणजे नागपूरच्या एका कर्तृत्ववान सुपुत्राने दुसऱ्या कर्तृत्ववान सुपुत्राचा केलेला सन्मान आहे. जे या आधी कुणाला जमले नाही त्या महाराष्ट्राचे राजकारण फडणवीसांनी कवेत आणल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही. एस. सिरपूरकर यांनीही आपल्या भाषणातून मुख्यमंत्र्यांशी असलेल्या कौटुंबिक संबंधांना उजाळा देत त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. प्रास्ताविक खा. अजय संचेती यांनी केले. संचालन रेखा दंडिगे तर आभार अशोक गांधी यांनी मानले. या कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी) पद्मभूषणपेक्षाही मोठा पुरस्कार - मुख्यमंत्री आज हा जो पुरस्कार मला मिळालाय तो माझ्यादृष्टीने पद्मभूषणपेक्षाही मोठा पुरस्कार आहे. याचे कारण, एक तर ही कौतुकाची थाप देणारी मंडळी माझ्या घरची आहेत आणि दुसरे म्हणजे ही पुरस्कार मला नितीन गडकरींच्या हस्ते मिळतोय. माझ्या या यशात नितीनजींचा फार मोठा वाटा आहे. त्यांनीच मला राजकारणात आणले म्हणून मी मुख्यमंत्री होऊ शकलो. मला राजकारण फार करता येत नाही. जे जनहिताचे आहे ते मी करीत असतो. ते करताना परिणामांची पर्वा करीत नाही. मी तुम्हाला शब्द देतो येत्या पाच वर्षात विदर्भाचा चेहरा पूर्णपणे बदललेला असेल. त्यातल्यात्यात नागपूरवर माझे विशेष लक्ष आहे. कारण, हे माझे शहर आहे. माझ्या जीवनाचा शेवट याच शहरात होणार आहे. मुंबई-पुण्यासह आम्हाला अवघ्या महाराष्ट्रालाच विकासाची नवी दिशा द्यायची आहे या शब्दात मुख्यमंत्र्यांनी सत्काराला उत्तर दिले व हे विकासपर्व कसे सुरू आहे हे सांगताना विविध भागात सुरू असलेल्या योजनांची आकडेवारीसह माहितीही दिली. फडणवीसांची विनयशीलता अन् गडकरींचे आशीर्वाद शाल, श्रीफळ व एक लक्ष रुपयाचा धनादेश असे स्वरुप असलेला ‘नागभूषण पुरस्कार’ गडकरींनी मुख्यमंत्र्यांना प्रदान केल्यावर मुख्यमंत्र्यांनी गडकरींचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतला. गडकरींनीही मुख्यमंत्र्यांना कडकडून मिठी मारली. यावेळी अवघे सभागृह टाळ्यांनी दणाणून गेले. मला कधीच मुख्यमंत्री व्हायचे नव्हते देवेंद्र मुख्यमंत्री झाला तेव्हा अनेक जण बोलत सुटले की गडकरींची संधी गेली. परंतु मुख्यमंत्री झालोच पाहिजे अशी अपेक्षा मी कधीच बाळगली नाही. या विषयावरून आमच्यात कधी मतभेदही झाले नाहीत. हा मीडियाने फुगवलेला फुगा आहे. आम्हा दोघांमध्येही योग्य संवाद नि समन्वय आहे, अशा शब्दात गडकरी व फडणवीस यांच्यात लावालावी करणाऱ्यांना गडकरींनी इशारा दिला.