शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

चौफेर सत्ता मग चारच्या प्रभागाची वेळ का ?

By admin | Updated: July 3, 2016 02:43 IST

केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आहे. एवढेच काय तर महापालिका व जिल्हा परिषदेवरही भाजपची सत्ता आहे.

गडकरी, फडणवीसांवरच भार : स्थानिक नेत्यांनी चालावे जमिनीवरकमलेश वानखेडे नागपूरकेंद्र व राज्यात भाजपची सत्ता आहे. एवढेच काय तर महापालिका व जिल्हा परिषदेवरही भाजपची सत्ता आहे. चौफेर सत्ता असतानाही महापालिकेच्या आगामी निवडणुकीत चार सदस्यांचा प्रभाग करण्याची वेळ भाजपवर का आली, ही बाब भाजपला अंतर्मुख करायला लावणारी आहे. पक्षाचे संघटन मजबूत आहे, सहाही आमदार भाजपचे आहेत. असे असतानाही दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीत धोका होऊ शकतो, असा विचार भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या मनात का आला? गडकरी, फडणवीसांना साथ देणारी जनता महापालिकेत साथ देणार नाही, असे स्थानिक नेत्यांना का वाटू लागले, यावरही गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीड दोन वर्षात नागपूरसाठी एम्सपासून ते मिहानपर्यंत, मेट्रो रेल्वेपासून ते सिमेंट रस्त्यांपर्यंत सर्व काही करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. गडकरी- फडणवीस यांची जोडी नागपूरसाठी काहीतरी करीत आहेत, असा मॅसेज नागपूरकरांमध्ये गेला. मात्र, दुसरीकडे महापालिकेतील सत्ताधारी नागपूरकरांवर पाहिजे तेवढी छाप निर्माण करू शकले नाहीत. महापालिकेत सत्ता आहे, शहरात सहाही आमदार भाजपचे आहेत. असे असतानाही प्रचलित दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीतही आपण महापालिकेच्या निवडणुका जिंकू शकतो, असा विश्वास स्थानिक नेते आपल्या ज्येष्ठ नेत्यांना देऊ शकले नाही.नगरसेवक ऐटीत कार्यकर्ते कैचीतगडकरी, फडणवीस आहेत. निवडणूक जिंकणे त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचे आहे. त्यामुळे आपल्याला चिंता नाही, अशा ऐटीत भाजपचे काही नगरसेवक वावरत आहेत. मध्यंतरी पक्षाच्या बैठकीलाच काही नगरसेवकांनी दांडी मारली होती. बहुतांश नगरसेवक सत्ताधाऱ्यांच्या गोतावळ्यात जास्त व जनतेत कमी दिसू लागले आहेत. नगरसेवकांच्या अशा वागणुकीमुळे भाजपचा झेंडा घेऊन वॉर्डात प्रचार करणारे संघटनेचे कार्यकर्ते नागरिकांच्या कैचीत सापडू लागले आहेत. काही नगरसेवकांच्या तर संघटनेपर्यंत तक्रारीही आल्या आहेत. भाजप जनमताचे सर्वेक्षण करून कामाचे ‘आॅडिट’ करणारा पक्ष आहे. असे आॅडिट झाले तर ४० टक्के नगरसेवकांचे तिकीट कटून त्यांच्यावर घरी बसण्याची वेळ येऊ शकते. ही वास्तविकता आहे.