शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाला देणार आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:07 IST

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला माध्यम बनवून राज्य निवडणूक आयोग स्वत:चे मत लादत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला. त्यामुळे ...

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला माध्यम बनवून राज्य निवडणूक आयोग स्वत:चे मत लादत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाला न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे.

शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जि.प. सदस्य सलील देशमुख, दिनेश बंग, माजी गटनेते चंद्रशेखर कोल्हे यांनी रविभवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. याप्रसंगी चंद्रशेखर कोल्हे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचे आरक्षण पूर्णपणे कमी करण्यास सांगितले नाही. आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवर गेली असल्याने मर्यादेवरील जागा सर्वसाधारण वर्गातून भरण्यास सांगितले आहे. परंतु आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातील काही मुद्यांवर राज्य निवडणूक आयोगाने आपले मत लादून सर्व जागा सर्वसाधारण वर्गातून भरण्यास सांगितले. हा ओबीसींवर अन्याय आहे. आयोगाच्या आदेशाला न्यायालयात आव्हान देण्यात येईल. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार आहे. याची तयारी सुरू असून लवकरच न्यायालयात जाणार आहे. पत्रपरिषदेला प्रकाश नागपुरे, बबन आव्हाडे, अनिल ठाकरे, निशिकांत नागमोते, नीलिमा ठाकरे, सुचिता ठाकरे, रश्मी आरघोडे, अ‍ॅड. रितेश धावडा, देवका बोडखे, बापू चरडे, सतीश रेवतकर आदी उपस्थित होते.

- या परिस्थितीस भाजपच जबाबदार

भाजप सरकारच्या काळापासूनच हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. जि.प.मध्ये भाजपाची सत्ता असताना अडीच वर्ष मुदतवाढ देण्यात आली. भाजपकडून न्यायालयात योग्यरीत्या बाजू मांडण्यात आली नाही. ओबीसींची माहितीही गोळा करण्यात आली नाही. आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात जाणारेही भाजपचे व्यक्ती होते. या परिस्थितीसाठी संपूर्णपणे भाजप जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.

- तरीही सदस्यत्व रद्द केले

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार सुरुवातीला जिल्ह्यातील १६ जि.प. सदस्य व ६ पंचायत समितीच्या १५ सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले. नंतर राज्य निवडणूक आयोगाने त्या सर्व जागा खुल्या वर्गात करून उरलेल्या ७ पंचायत समितीतील ओबीसी सदस्यांचेही सदस्यत्व रद्द केले. विशेष म्हणजे तिथे संपूर्ण आरक्षण ५० टक्क्यांच्या आत आरक्षण होते. त्यामुळे सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.