शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरातील विद्यापीठे ‘आययूएमएस’अंतर्गत येणे आव्हानच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 11:16 IST

राज्यभरातील विद्यापीठांच्या कामामध्ये सुसूत्रता यावी यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये ‘आययूएमएस’ (इंडिग्रेटेड युनिव्हर्सिटी मॅनेजमेंट सिस्टम) ही प्रणाली लागू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ठळक मुद्दे‘डिजिटल’ प्रणाली लागू होणार कशी? वेगळ्या कार्यप्रणाली व आराखड्याचे गणित कसे जमणार?

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यभरातील विद्यापीठांच्या कामामध्ये सुसूत्रता यावी यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये ‘आययूएमएस’ (इंडिग्रेटेड युनिव्हर्सिटी मॅनेजमेंट सिस्टम) ही प्रणाली लागू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र राज्यातील प्रत्येक विद्यापीठाची कार्यप्रणाली वेगवेगळी आहे. अशा स्थितीत कार्यप्रणाली व आराखड्याचे एकाच मापदंडानुसार गणित बसविण्याचे मोठे आव्हान राहणार आहे. ही एकीकृत ‘डिजिटल’ प्रणाली कशी काय लागू होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कामामध्ये सुुसूत्रता यावी यासाठी मागील वर्षी ‘आययूएमएस’ प्रणालीसंदर्भात शासकीय पातळीवरून पावले उचलण्यात आली. या प्रणालीच्या माध्यमातून प्रवेश, परीक्षा, निकाल इत्यादीसंदर्भातील विविध समस्यांवर ‘एन्ड टू एन्ड’ तोडगा मिळेल, असा दावादेखील करण्यात आला. ‘आययूएमएस’अंतर्गत माहिती व तंत्रज्ञान संचालनालय व ‘महाआयटी’तर्फे विविध ‘मॉड्युल्स’ विकसित करण्यात आली. यात प्रवेश,‘अ‍ॅकेडेमिक्स’, महाविद्यालये, मनुष्यबळ व्यवस्थापन व प्रशासन यांच्याशी निगडित ‘मॉड्युल्स’ यांचा समावेश आहे. याअंतर्गत गुणवत्तेच्या आधारावरील प्रवेश, जागा वाटप, नोंदणी प्रक्रिया, वसतिगृह नोंदणी, हजेरी, शुल्क, अभ्यासक्रम तयार करणे, अ‍ॅकेडेमिक कॅलेंडर, परीक्षा व्यवस्थापन, संशोधन व्यवस्थापन, महाविद्यालयांची संलग्नता, महाविद्यालयांवर लक्ष ठेवणे, ‘ई-सर्व्हिस बुक’, महाविद्यालय व विद्यापीठातील शिक्षक, कंत्राटी शिक्षक व प्राचार्यांची भरती, पदोन्नती, वित्त व लेखा, ई-निविदा, विधी प्रकरणे, पेरोल, पीएफ, पेन्शन इत्यादीबाबत ‘एन्ड टू एन्ड सोल्युशन्स’ देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतु प्रत्येक विद्यापीठाचे ‘अ‍ॅकेडेमिक कॅलेंडर’ वेगवेगळे असते. काही विद्यापीठांमध्ये संलग्नित महाविद्यालयांची संख्या कमी आहे. तर नागपूर विद्यापीठासारख्या विद्यापीठात ही संख्या साडेपाचशेहून अधिक आहे. अनेक महाविद्यालयांकडून तर नेमका ‘डाटा’देखील दिलेल्या मुदतीत देण्यात येत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक विद्यापीठातील परीक्षा व्यवस्थापन, निकालांची पद्धत, मूल्यांकनाची प्रक्रिया वेगवेगळी आहे. मग सर्वांना समान प्रणाली लागू करणे ही तारेवरची कसरत ठरणार आहे. अशा स्थितीत ‘आययूएमएस’ राबविणार कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.महाविद्यालयांची डोकेदुखी वाढणार?दरम्यान, या सॉफ्टवेअरमध्ये संलग्नित महाविद्यालयांचीदेखील इत्थंभूत माहिती असेल. अनेक महाविद्यालयांमध्ये तर नियमांनुसार नियमित शिक्षकांचादेखील अभाव आहे, तर बऱ्याच ठिकाणी प्राचार्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे महाविद्यालयांकडून विद्यापीठांनाच माहिती देण्यात चालढकल करण्यात येते. त्यांच्याकडून ‘आययूएमएस’ प्रणालीला विरोध आहे. याशिवाय सर्व ‘डाटा’ अपलोड करण्याची जबाबदारी महाविद्यालयांवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविद्यालयांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती एका अधिकाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ