शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

राज्यभरातील विद्यापीठे ‘आययूएमएस’अंतर्गत येणे आव्हानच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 11:16 IST

राज्यभरातील विद्यापीठांच्या कामामध्ये सुसूत्रता यावी यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये ‘आययूएमएस’ (इंडिग्रेटेड युनिव्हर्सिटी मॅनेजमेंट सिस्टम) ही प्रणाली लागू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ठळक मुद्दे‘डिजिटल’ प्रणाली लागू होणार कशी? वेगळ्या कार्यप्रणाली व आराखड्याचे गणित कसे जमणार?

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यभरातील विद्यापीठांच्या कामामध्ये सुसूत्रता यावी यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये ‘आययूएमएस’ (इंडिग्रेटेड युनिव्हर्सिटी मॅनेजमेंट सिस्टम) ही प्रणाली लागू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र राज्यातील प्रत्येक विद्यापीठाची कार्यप्रणाली वेगवेगळी आहे. अशा स्थितीत कार्यप्रणाली व आराखड्याचे एकाच मापदंडानुसार गणित बसविण्याचे मोठे आव्हान राहणार आहे. ही एकीकृत ‘डिजिटल’ प्रणाली कशी काय लागू होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कामामध्ये सुुसूत्रता यावी यासाठी मागील वर्षी ‘आययूएमएस’ प्रणालीसंदर्भात शासकीय पातळीवरून पावले उचलण्यात आली. या प्रणालीच्या माध्यमातून प्रवेश, परीक्षा, निकाल इत्यादीसंदर्भातील विविध समस्यांवर ‘एन्ड टू एन्ड’ तोडगा मिळेल, असा दावादेखील करण्यात आला. ‘आययूएमएस’अंतर्गत माहिती व तंत्रज्ञान संचालनालय व ‘महाआयटी’तर्फे विविध ‘मॉड्युल्स’ विकसित करण्यात आली. यात प्रवेश,‘अ‍ॅकेडेमिक्स’, महाविद्यालये, मनुष्यबळ व्यवस्थापन व प्रशासन यांच्याशी निगडित ‘मॉड्युल्स’ यांचा समावेश आहे. याअंतर्गत गुणवत्तेच्या आधारावरील प्रवेश, जागा वाटप, नोंदणी प्रक्रिया, वसतिगृह नोंदणी, हजेरी, शुल्क, अभ्यासक्रम तयार करणे, अ‍ॅकेडेमिक कॅलेंडर, परीक्षा व्यवस्थापन, संशोधन व्यवस्थापन, महाविद्यालयांची संलग्नता, महाविद्यालयांवर लक्ष ठेवणे, ‘ई-सर्व्हिस बुक’, महाविद्यालय व विद्यापीठातील शिक्षक, कंत्राटी शिक्षक व प्राचार्यांची भरती, पदोन्नती, वित्त व लेखा, ई-निविदा, विधी प्रकरणे, पेरोल, पीएफ, पेन्शन इत्यादीबाबत ‘एन्ड टू एन्ड सोल्युशन्स’ देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतु प्रत्येक विद्यापीठाचे ‘अ‍ॅकेडेमिक कॅलेंडर’ वेगवेगळे असते. काही विद्यापीठांमध्ये संलग्नित महाविद्यालयांची संख्या कमी आहे. तर नागपूर विद्यापीठासारख्या विद्यापीठात ही संख्या साडेपाचशेहून अधिक आहे. अनेक महाविद्यालयांकडून तर नेमका ‘डाटा’देखील दिलेल्या मुदतीत देण्यात येत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक विद्यापीठातील परीक्षा व्यवस्थापन, निकालांची पद्धत, मूल्यांकनाची प्रक्रिया वेगवेगळी आहे. मग सर्वांना समान प्रणाली लागू करणे ही तारेवरची कसरत ठरणार आहे. अशा स्थितीत ‘आययूएमएस’ राबविणार कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.महाविद्यालयांची डोकेदुखी वाढणार?दरम्यान, या सॉफ्टवेअरमध्ये संलग्नित महाविद्यालयांचीदेखील इत्थंभूत माहिती असेल. अनेक महाविद्यालयांमध्ये तर नियमांनुसार नियमित शिक्षकांचादेखील अभाव आहे, तर बऱ्याच ठिकाणी प्राचार्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे महाविद्यालयांकडून विद्यापीठांनाच माहिती देण्यात चालढकल करण्यात येते. त्यांच्याकडून ‘आययूएमएस’ प्रणालीला विरोध आहे. याशिवाय सर्व ‘डाटा’ अपलोड करण्याची जबाबदारी महाविद्यालयांवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविद्यालयांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती एका अधिकाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ