शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

सीईओ साहेब : हागणदारीमुक्ती कराच पण - आधी पाणीटंचाईचे बघा!

By admin | Updated: May 8, 2014 01:01 IST

मे महिन्याचा आठवडा उलटल्यानंतरही जिल्ह्याचा पाणीटंचाई कृती आराखडा अद्याप थंडबस्त्यात आहे. ४४८ गावातील या टंचाई उपाययोजनांची जिल्हा परिषदेकडून अंमलबजावणीच ..

 यवतमाळ : मे महिन्याचा आठवडा उलटल्यानंतरही जिल्ह्याचा पाणीटंचाई कृती आराखडा अद्याप थंडबस्त्यात आहे. ४४८ गावातील या टंचाई उपाययोजनांची जिल्हा परिषदेकडून अंमलबजावणीच सुरू न झाल्याने ग्रामीण जनतेची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई ऐवजी प्रशासन शौचालयांवर भर देत असल्याने सर्वांनाच या कारभाराचे ‘कौतुक’ वाटत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

नदी-नाले व पाण्याचे अन्य स्रोत आटल्याने नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. ही संभाव्या पाणीटंचाई जिल्ह्यातील किमान ४४८ गावात उद्भवणार असा अंदाज बांधून जिल्हा परिषदेने तेथील टंचाई उपाययोजनांसाठी चार कोटी २९ लाख ५६ हजारांचा कृती आराखडा तयार केला होता. त्याला जिल्हा प्रशासनाने मंजुरीही दिली. परंतु प्रत्यक्षात या आराखड्यानुसार अद्यापही टंचाई उपाययोजनांची कामे सुरू झालेली नाही. आराखडा, कामांचे प्रस्ताव, अंदाजपत्रक, मंजुरी, कामाचे प्रत्यक्ष आदेश आणि कामाला सुरुवात असे वेगवेगळे टप्पे आहेत. मात्र टंचाई उपाययोजनांची कामे अद्याप आराखड्याच्या बाहेर निघाली नसून फाईलीतच असल्याचे सांगितले जाते. वास्तविक आतापर्यंत टंचाई निवारणाची कामे किमान ७० ते ८० टक्के पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात दहा ते पंधरा टक्केही कामे झाली नसल्याचे सांगण्यात येते. संपूर्ण जिल्ह्यात पाणीटंचाई हा हॉट विषय असताना प्रशासनाकडून त्याला बगल दिली जात आहे.

उलट त्याऐवजी ग्रामस्तरावरील प्रत्येकाला ‘शौचालय किती बांधता’ असा एकच सवाल विचारला जात आहे. ग्रामसेवक तर या एकाच कामात व्यस्त असल्याचे सांगितले जाते. प्रशासन पाणीटंचाईऐवजी शासनस्तरावर केवळ कौतुकाचा विषय ठरलेल्या हागणदारीमुक्तीवर भर देत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हा परिषदेचे पदाधिकारीही हागणदारीमुक्तीच्या सुरात सूर मिळवित असल्याने त्यांनी प्रशासनापुढे नांग्या तर टाकल्या नाही ना असा संशय व्यक्त केला जात आहे. जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत पाणीटंचाई विषय बाजूला पडल्याने ही बाब सिद्ध झाली आहे. दरवर्षी एकाच गावावर पाणीटंचाई निवारणार्थ शासनाचा निधी खर्च केला जात आहे. या ऐवजी त्या गावातील कायम उपाययोजनेवर कुणीच बोलताना दिसत नाही. मे महिना सुरू होऊनही पाणीटंचाई उपाययोजना फाईलीतच अडकून असल्याने जिल्हा परिषदेच्या राजकीय व प्रशासकीय कारभाराची गती काय आहे हे लक्षात येते. (जिल्हा प्रतिनिधी)