शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळ दिल्लीला पळविण्याचा डाव

By admin | Updated: November 17, 2015 04:14 IST

उपराजधानीला एज्युकेशनल हब म्हणून विकसित करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे. सरकारच्या

नागपूर : उपराजधानीला एज्युकेशनल हब म्हणून विकसित करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे. सरकारच्या प्रयत्नामुळे एम्स, आयआयएम, ट्रिपल-आयटीसारख्या संस्था नागपुरात सुरु होणार आहेत. इकडे मात्र केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाचे नागपुरात असलेले मुख्यालय दिल्लीला पळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासंदर्भातील प्रस्ताव केंद्रीय कामगार मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. येत्या दोन दिवसात होणाऱ्या व्यवस्थापन मंडळाच्या (गव्हर्निंग बॉडी) बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होणार होईल, असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.देशभरातील श्रमिक, कामगारांना कामाचे स्वरूप, कायदे आणि त्यांच्या अधिकाराबाबत शिक्षित करण्याचे श्रमिक शिक्षण मंडळाद्वारे केले जाते. यासाठी अभ्यासक्रमही तयार केला जातो. श्रमिक शिक्षण मंडळाचे देशभरात सध्या ५० विभागीय व ९ उपविभागीय केंद्रे आहेत. यातील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ वर्कर्स एज्युकेशनचे रिजनल सेंटर मुंबईला आहे. या सर्व केंद्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय १९५८ साली नागपुरात स्थापन करण्यात आले. नागपूर हे देशाच्या मध्यस्थानी असल्याने देशभरातील विभागीय केंद्रांवर नियंत्रण ठेवणे सोपे होईल, या हेतूने त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी मुख्यालय नागपूरला स्थापन करण्याचा विचार केला होता. मात्र यावेळच्या लोकांना नागपूरचे केंद्रस्थान आणि महत्त्व वाढणे मान्य नसावे म्हणून की काय श्रमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय दिल्लीला पळविण्याचा डाव रचला जात आहे. सिलॅबस रिव्हीव्ह कमिटीचा घोळश्रमिक शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम तयार करण्याचे काम अभ्यासक्रम पुनरावलोकन समितीकडे (सिलॅबस रिव्हीव्ह कमिटी) असते. या समितीला केवळ पाठ्यक्रमाबाबत शिफारशी देण्याचा अधिकार आहे. मात्र याच समितीने हा नवीन घोळ घातल्याचे समजते. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, या समितीला पाठ्यक्रमाचे पुनरावलोकन करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र समितीने पाठ्यक्रमासोबत हे मुख्यालयच दिल्लीला हलविण्याचा प्रस्ताव तयार केला. येथे योग्य व्यवस्था नाहीत, काम करण्याला अडचणी येतात आणि सर्व मुख्यालय दिल्लीला असताना हेच मुख्यालय नागपुरात का असावे, असा तर्क देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. समितीने हा प्रस्ताव श्रम मंत्रालयाकडे सादर केला आहे. आता १८ नोव्हेंबरला होणाऱ्या व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्राने दिली आहे.