शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
6
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
7
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
8
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
9
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
10
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
11
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
12
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
13
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
14
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
15
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
16
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
17
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
18
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
19
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
20
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

सेंद्रीय शेतीला केंद्राचा आधार

By admin | Updated: May 11, 2014 01:28 IST

अन्नधान्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर वाढला आहे. त्यामुळे जमिनीचा कस कमी झाला आहे.

नागपूर : अन्नधान्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर वाढला आहे. त्यामुळे जमिनीचा कस कमी झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार अन्नधान्यातून मोठ्या प्रमाणात रासायनिक घटक मानवाच्या शरीरात जात असल्याने, नवनवीन आजार पसरत आहेत. याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून, विषमुक्त अन्न मानवाला मिळावे म्हणून केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने २००४ पासून सेंद्रीय शेतीसाठी स्वतंत्र शाखा निर्माण करून, सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देत आहे. सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देणारे प्रादेशिक केंद्र नागपुरात आहे. या केंद्राकडे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात व गोवा या राज्याचा कार्यभार आहे. हे केंद्र सेंद्रीय शेतीचा प्रचार आणि प्रसाराचे कार्य करते. सेंद्रीय शेतीसाठी काम करणार्‍या स्वयंसेवी संस्था, राज्य सरकारचे कार्यालय, कृषी विद्यापीठ व विद्यार्थी, शेतकरी यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविते. सेंद्रीय शेतीसाठी आवश्यक असणार्‍या जीवाणू खतांचा समावेश फर्टिलायझर कंट्रोलर अ‍ॅक्ट १९८५ अंतर्गत झाल्याने, जीवाणू खतांची तपासणी, त्यांच्या गुणवत्तेची तपासणी नि:शुल्क करते. सेंद्रीय शेतीसाठी काम करणार्‍या ग्रुपला सर्टिफिकेशन करून देते. सेंद्रीय शेतीच्या प्रचार आणि प्रसाराच्या या कामाबरोबरच सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून उद्योजक कसा निर्माण व्हावा, यासाठी आर्थिक सहाय्य करते. गेल्या वर्षी नागपूर केंद्राने चार राज्यात २७ प्रशिक्षण कार्यक्रम राबविले. पाच लोकांना उद्योगासाठी अर्थसाहाय्य केले आहे. केंद्र सरकारच्या सहकार्याने सेंद्रीय शेतीकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी वळत असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)