शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
3
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
4
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
5
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
6
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
7
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
8
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
9
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
10
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
11
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
12
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
13
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
14
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
15
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
16
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
17
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
18
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
19
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
20
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर

सेंद्रीय शेतीला केंद्राचा आधार

By admin | Updated: May 11, 2014 01:28 IST

अन्नधान्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर वाढला आहे. त्यामुळे जमिनीचा कस कमी झाला आहे.

नागपूर : अन्नधान्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर वाढला आहे. त्यामुळे जमिनीचा कस कमी झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार अन्नधान्यातून मोठ्या प्रमाणात रासायनिक घटक मानवाच्या शरीरात जात असल्याने, नवनवीन आजार पसरत आहेत. याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून, विषमुक्त अन्न मानवाला मिळावे म्हणून केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने २००४ पासून सेंद्रीय शेतीसाठी स्वतंत्र शाखा निर्माण करून, सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देत आहे. सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देणारे प्रादेशिक केंद्र नागपुरात आहे. या केंद्राकडे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात व गोवा या राज्याचा कार्यभार आहे. हे केंद्र सेंद्रीय शेतीचा प्रचार आणि प्रसाराचे कार्य करते. सेंद्रीय शेतीसाठी काम करणार्‍या स्वयंसेवी संस्था, राज्य सरकारचे कार्यालय, कृषी विद्यापीठ व विद्यार्थी, शेतकरी यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविते. सेंद्रीय शेतीसाठी आवश्यक असणार्‍या जीवाणू खतांचा समावेश फर्टिलायझर कंट्रोलर अ‍ॅक्ट १९८५ अंतर्गत झाल्याने, जीवाणू खतांची तपासणी, त्यांच्या गुणवत्तेची तपासणी नि:शुल्क करते. सेंद्रीय शेतीसाठी काम करणार्‍या ग्रुपला सर्टिफिकेशन करून देते. सेंद्रीय शेतीच्या प्रचार आणि प्रसाराच्या या कामाबरोबरच सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून उद्योजक कसा निर्माण व्हावा, यासाठी आर्थिक सहाय्य करते. गेल्या वर्षी नागपूर केंद्राने चार राज्यात २७ प्रशिक्षण कार्यक्रम राबविले. पाच लोकांना उद्योगासाठी अर्थसाहाय्य केले आहे. केंद्र सरकारच्या सहकार्याने सेंद्रीय शेतीकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी वळत असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)