काम पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूय् : मानेवाडा रोडवरील सिद्देश्वर सभागृह ते जादुमहल चौकापर्यंतच्या सिमेंट रोडचे बांधकाम दोन वर्षांपासून अर्धवट असल्याने, या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. अर्धवट काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वेळेकर नगर लेआऊट, सावित्रीबाई फुलेनगर, बजरंगनगर, शिवराजनगरचा हा मुख्य रस्ता असून, चंद्रमणी नगरकडे जाणारा हा एकमेव रस्ता आहे. या रस्त्यावर पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका चालतात, या रस्त्यावर चार दवाखाने आणि दुकानेही आहेत. त्यामुळे हा अतिशय रहदारी असलेला रस्ता गेल्या दोन वर्षांपासून अर्धवट आहे. सुरुवातीला कंत्राटदाराने या रोडचे बांधकाम सुरू केले, परंतु ते अर्ध्यातच सोडून जादूमहल चौक ते राजकमल चौक या नवीन रस्त्याचे काम सुरू केले, पण तेही अर्धवट ठेवले आहे. यामुळे या रस्त्यावर नेहमी अपघात होत असल्याने नागरिकांत रोष व्यक्त केला जात आहे. याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. अर्धवट काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, अशी मागणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष प्रीतम खडतकर, डॉ.दिनेश लांजेवार, डॉ.सुबोध बिसवास, डॉ.फरजाना अहमद यांच्यासह परिसरातील नागरिकांना मनपा आयुक्त व महापौरांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.