शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

सीबीआयची रेल्वे विभागात कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) सोमवारी दुपारी रेल्वेच्या एका लाचखोर अधिकाऱ्याच्या मुसक्या बांधून एकच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) सोमवारी दुपारी रेल्वेच्या एका लाचखोर अधिकाऱ्याच्या मुसक्या बांधून एकच खळबळ उडवून दिली. अखिलेश चाैबे असे आरोपी अधिकाऱ्याचे नाव असून, तो रेल्वेत वरिष्ठ मंडळ मेकॅनिकल इंजिनिअर आहे.

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात एका कंत्राटदाराला एक लाख, ७० हजारांचे बिल घेणे होते. अखिलेश चाैबेने ते हेतूपुरस्सर अडवून ठेवले होते. वारंवार मागणी करूनही प्रलंबित बिल निकाली काढायला चाैबे तयार नव्हता. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराने दोन आठवड्यांपूर्वी चाैबेची भेट घेतली. यावेळी चाैबेने बिल काढण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केली. घासाघीस केल्यानंतर तो दहा हजारांवर थांबला. दहा हजार लाच दिल्याशिवाय बिल काढून देणार नाही, असे त्याने कंत्राटदाराला सांगितले. त्यामुळे कंत्राटदाराने गुरुवारी सीबीआयकडे धाव घेतली. सीबीआय युनिटच्या अधीक्षक निर्मला देवी यांनी तक्रारीची शहानिशा करून घेतल्यानंतर सोमवारी दुपारी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, सोमवारी दुपारी २.३०च्या सुमारास कंत्राटदाराच्या मागोमाग सीबीआयचे पथक रेल्वेस्थानकाजवळच्या मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालयात धडकले. चाैबेने कंत्राटदाराकडून लाचेचे दहा हजार रुपये स्वीकारताच चाैबेच्या मुसक्या आवळल्या. एक ते दीड तास त्याच्या कार्यालयाची चाैकशी केल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन सीबीआयचे पथक निघून गेले.

---

मध्य प्रदेशकडे पथक रवाना

आरोपी चौबेला जेरबंद केल्यानंतर सीबीआयच्या एका पथकाने त्याच्या कार्यालयात, तर दुसऱ्या पथकाने भोले पेट्रोलपंप चाैकाजवळच्या निवासस्थानी झडती सुरू केली. चाैबे मूळचा मध्य प्रदेशातील रहिवासी आहे. त्यामुळे तिसरे एक पथक चाैकशीसाठी मध्य प्रदेशातील चौबेच्या निवासस्थानी पाठविण्यात आले. या तीनही ठिकाणी तपासणी सुरू करण्यात आली. त्यात काय मिळाले, ते वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट होऊ शकले नाही.

---

भ्रष्टाचाऱ्यांच्या तक्रारी द्या ।

समाजाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड नष्ट करण्यासाठी भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाईची गरज आहे. नागरिकांकडून तक्रारी मिळत नसल्याने भ्रष्टाचारी बोकाळतात. त्यामुळे अशांना वठणीवर आणण्यासाठी नागरिकांनी सीबीआयकडे तक्रार द्याव्यात, असे आवाहन सीबीआय अधीक्षक निर्मलादेवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले आहे.

----