शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

आवडेल त्या क्षेत्रात करिअर करा

By admin | Updated: December 26, 2014 00:52 IST

इंजिनिअरिंग, मेडिकल, मॅनेजमेंट, सीए या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा कल वाढला आहे. हे क्षेत्र करिअरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे समजले जाते. मात्र विद्यार्थ्यांमध्ये

अविनाश धर्माधिकारी : १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरनागपूर : इंजिनिअरिंग, मेडिकल, मॅनेजमेंट, सीए या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा कल वाढला आहे. हे क्षेत्र करिअरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे समजले जाते. मात्र विद्यार्थ्यांमध्ये या अभ्यासक्रमासंदर्भात रुची नसेल, मित्रांच्या अथवा पालकांच्या दबावात विद्यार्थी या क्षेत्राची निवड करीत असतील, तर त्या विद्यार्थ्याचे करिअर धोक्यात राहील. त्यामळे विद्यार्थ्याने सर्वप्रथम आपली योग्यता, परिश्रम करण्याची तयारी, आवड हे लक्षात घेऊन त्यादृष्टिकोनातून करिअरची निवड करावी, असा सल्ला निवृत्त प्रशासकीय अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी विद्यार्थ्यांना दिला. लोकमत युवा नेक्स्ट, भारतीय विद्या प्रसारक संस्था व झुलेलाल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने नुतन भारत कनिष्ठ महाविद्यालयात १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात वक्ता व मार्गदर्शक म्हणून अविनाश धर्माधिकारी उपस्थित होते. ते म्हणाले की, करिअर निवडण्यापूर्वी विद्यार्थ्यांने स्वत:चे आत्मपरिक्षण करावे. आपली योग्यता व आवडीच्या करिअरची निवड केल्यास १०० टक्के यशाची खात्री आहे. दोन दिवसीय शिबिराच्या पहिल्या दिवशी झुलेलाल इन्स्टिट्यूटचे चेअरमन महेश साधवानी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षण संचालक जे. एम. अभ्यंकर, विशेष अतिथी म्हणून आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, आमदार अनिल सोले उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय विद्या प्रसारक संस्थेचे सचिव रमेश बक्षी यांनी केले. संचालन वंदना बळवाईक, आभार प्रदर्शन प्राचार्य वीणा खोतपाल यांनी केले.कार्यक्रमाला किरण गडकरी, जीवन गोडे, मनोज वखरे, एम. प्रधान, हारोडे, दुबे उपस्थित होते. शिबिराला यशस्वी करण्यासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष बी.एम. शास्त्री, उपाध्यक्ष मिलिंद महाजन, सहसचिव अतुल गाडगे, डब्ल्यू. जी. चोरघडे, के. डी. पत्तरकिने, ए. के. मोने, पी.आर. लिमसे, पी. के. चिंचघरे यांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)फक्त परीक्षेसाठी अभ्यास करू नकानॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (व्हीएनआयटी) चे प्रा. योगेश देशपांडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की केवळ परीक्षेसाठी अभ्यास करू नका. विद्यार्थीदशेत अवगत केलेले ज्ञान जीवनाभर कामी येईल, असा अभ्यास करा. असे करिअर निवडा की ज्यातून आपल्याला आनंद मिळेल. शिबिराचा समारोप गणिताचे शिक्षक किरण गडकरी यांच्या भाषणाने झाला. समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक झुलेलाल इन्स्टिट्यूटचे उपप्राचार्य देवाशिष भौमिक यांनी केले.