शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

गुन्हेमुक्त होईल उपराजधानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:08 IST

जगदीश जोशी नागपूर : गृहमंत्र्यांचे होमटाऊन असल्यामुळे नागपूर गुन्ह्यांसाठी नेहमीच चर्चेत राहते. येथे घडणारी लहानशी घटनाही नेत्यांमधील भांडणाचे कारण ...

जगदीश जोशी

नागपूर : गृहमंत्र्यांचे होमटाऊन असल्यामुळे नागपूर गुन्ह्यांसाठी नेहमीच चर्चेत राहते. येथे घडणारी लहानशी घटनाही नेत्यांमधील भांडणाचे कारण ठरते. गेल्या सहा वर्षात अनेकदा उपराजधानीवर क्राईम कॅपिटलचा डाग लागला. परंतु, सध्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी कर्तबगार अधिकाऱ्यांच्या हातात आहे. त्यांनी २०२१ मध्ये नागपूरला गुन्हे व भ्रष्टाचारमुक्त शहर करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

अमितेशकुमार, पोलीस आयुक्त.

नागपूरवासीयांना भीतीमुक्त करणे नवीन वर्षाचे लक्ष्य आहे. खून व प्राणघातक हल्ल्याच्या घटना चिंतेची बाब आहे. अशा घटना थांबविण्यासाठी प्रत्येक प्रयत्न केले जातील. अवैध धंदे व बेकायदेशीर हालचाली होऊ दिल्या जाणार नाहीत. महिलांवरील गुन्ह्यांची संख्या घटली आहे. येणाऱ्या वर्षात असे गुन्हे करणाऱ्यांना शंभरवेळा विचार करावा लागेल अशी व्यवस्था केली जाईल. पोलीस अथक परिश्रम घेत असतानाही आर्थिक व सायबर गुन्हे वाढत आहेत. त्यावर नियंत्रण आणण्याकरिता प्रभावी योजना आखली जाईल. नागरिक वाहतूक नियमांबाबत गंभीर नाहीत. त्याविषयी नागरिकांमध्ये जागृती घडवून आणली जाईल.

----------

निर्मला देवी, अधीक्षक, सीबीआय नागपूर.

भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी सीबीआयच्या रडारवर आहेत. सीबीआय नागपूर शाखेंतर्गत ११ जिल्हे येतात. या जिल्ह्यांमधील केंद्र सरकारचे सर्व विभाग सीबीआयच्या कार्यक्षेत्रात येतात. यापैकी अनेक विभागांमध्ये सामान्य नागरिकांना विविध कामे करण्यासाठी जावे लागते. दरम्यान, त्यांना भ्रष्टाचाराला तोंड द्यावे लागते. बरेचदा यासंदर्भात तक्रार केली जात नाही. त्यामुळे नागरिकांना याविषयी जागृत केले जाईल. निडर होऊन भ्रष्टाचाराची तक्रार करण्यासाठी प्रेरित केले जाईल. २०२० मध्ये केवळ एका प्रकरणाची नोंद झाली. २०२१ मध्ये नागरिकांच्या मदतीने चांगली कामगिरी करण्याचे प्रयत्न केले जातील.

-----------

रश्मी नांदेडकर, अधीक्षक, एसीबी.

कोरोना संक्रमणामुळे सापळा कारवाई व बेहिशेबी मालमत्तांच्या प्रकरणांत घट झाली. नवीन वर्षामध्ये सर्व अडथळे बाजूला करून भ्रष्टाचाऱ्यांना धडा शिकवला जाईल. काही विभाग भ्रष्टाचाराकरिता नेहमी चर्चेत असतात. त्यांची नस एसीबीला माहिती आहे. एसीबी अशा विभागाशी संबंधित तक्रारी गंभीरतेेने घेऊन भ्रष्टाचाऱ्यांना गजाआड करण्याची योजना तयार करते. परंतु, अनेकदा विविध कारणांमुळे कारवाईत यश मिळत नाही. त्यावर प्रभावी उपाय शोधून काढला जाईल. पारदर्शी कामकाजामुळे एसीबीचा मान वाढला आहे. ही प्रतिमा कायम जपली जाईल.

------------

राकेश ओला, पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण.

ग्रामीण पोलिसांकरिता २०२० हे वर्ष उत्तम राहिले. गुन्हे व अपघातांची संख्या खूप कमी झाली. नवीन वर्षात पुन्हा चांगली कामगिरी करायची आहे. चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी ग्रामीण पोलिसांना सक्रिय केले जाईल. अपघातांमध्ये नागरिकांना विनाकारण प्राण गमवावे लागतात. वाहतूक नियमांचे पालन करून अपघात टाळले जाऊ शकतात. यासंदर्भात जनजागृती केली जाईल.