शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

आरएसएसविरुद्ध लढा पुकारा

By admin | Updated: April 18, 2017 01:51 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) विचार हे देशासाठी घातक आहेत. या विचारांनी देशाचा विकास शक्य नाही.

सम्यक थिएटर महाचर्चा : न्या. बी.जी. कोळसे पाटील यांचे आवाहननागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) विचार हे देशासाठी घातक आहेत. या विचारांनी देशाचा विकास शक्य नाही. त्यामुळे देशातील दलित-आदिवासींसह एकूणच समाजाची प्रगती साधायची असेल तर आरएसएसविरुद्ध सर्वांनी एकत्र येऊन लढा पुकारा, असे आवाहन निवृत्त न्यायमूर्ती व ज्येष्ठ विचारवंत न्या. बी.जी. कोळसे पाटील यांनी येथे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सम्यक थिएटर नागपूरतर्फे सोमवारी वसंतराव देशपांडे सभागृहात ‘आंबेडकरी समाजाचे रथचक्र कुठे अडले?’ या विषयावर महाचर्चा आयोजित करण्यात आली होती. मुख्य वक्ते म्हणून न्या. कोळसे पाटील बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. यशवंत मनोहर हे अध्यक्षस्थानी होते. न्या. कोळसे पाटील म्हणाले, भारताचे संविधान हे सर्व धर्मग्रंथांचा बाप आहे. आरएसएस देशाचे संविधान मानत नाही. सध्या त्यांची सत्ता आहे. केंद्र सरकारचे सर्व कार्यक्रम हे संविधानविरोधी आहेत. देशात होणारे बॉम्बस्फोट व दंगलीमध्येसुद्धा त्यांचा हात आहे. याबाबतचे सर्व पुरावे आहेत. परंतु सर्व यंत्रणा त्यांचीच असल्याने या गोष्टी उघडकीस येत नाहीत; इतकेच नव्हे तर भारतातील गुप्तचर संस्था आयबी ही सुद्धा आरएसएसची शाखा असल्याचेही त्यांनी सांगितले. या देशात आंबेडकरवादीच क्रांती घडवून आणून शकतात, कारण ते विचाराने तयार आहेत. परंतु स्वार्थामुळे बरबटलेसुद्धा आहेत, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. डॉ. यशवंत मनोहर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वैश्विक तत्त्वज्ञान आता जगभरात मांडले जात असल्याचे स्पष्ट केले. डॉ. कोमल ठाकरे यांनी संचालन केले. नरेश साखरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)प्रत्येक चूक ही शिकण्याची संधी आहे - राजा आकाश जगण्याकडे सकारात्मक दृष्टीने बघा. व्यक्ती हा आपल्या चुकांमधून शिकत असतो. त्यामुळे प्रत्येक चूक ही शिकण्याची संधी असते. आयुष्यात प्रगती करण्यासाठी कुठलाही ‘शॉर्टकट’ नाही. परिश्रम करावेच लागेल. करिअरमध्ये शॉर्टकट हा विध्वंसाकडे नेतो, असे प्रा. राजा आकाश यांनी सांगितले. करिअर गायडन्स आणि स्ट्रेस मॅनेजमेंट या विषयावर ते विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करीत होते.