शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शिल्लक धान खरेदी करा, नाही तर बाेनस द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:12 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : राज्य शासनाने नाेंदणीकृत शेतकऱ्यांकडील धानाचे पूर्णपणे माेजमाप न करता शासकीय धान खरेदी केंद्र ३१ ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : राज्य शासनाने नाेंदणीकृत शेतकऱ्यांकडील धानाचे पूर्णपणे माेजमाप न करता शासकीय धान खरेदी केंद्र ३१ मार्च राेजी बंद केले. त्यामुळे रामटेक तालुक्यातील धान उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने एक तर शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेल्या धानाची खरेदी करावी, नाही तर त्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७०० रुपये बाेनस द्यावे या मागणीसाठी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमाेर साेमवारी (दि. ३) सकाळी प्रतीकात्मक आंदाेलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी याच मागणीचे उपविभागीय अधिकारी जाेगेंद्र कट्यारे यांच्याकडे निवेदनही साेपविले.

राज्य शासनाने आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने रामटेक तालुक्यात भंडारबाेडी (महादुला), पवनी, हिवराबाजार व बांद्रा या चार ठिकाणी तसेच महाराष्ट्रा राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून खरेदी विक्री संघाच्या मदतीने अन्य चार ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू केले हाेते. या केंद्रावर शेतकऱ्यांकडील धानाची किमान आधारभूत किमतीप्रमाणे खरेदी करण्यात आली असून, शेतकऱ्यांना पहिल्या ५० क्विंटलपर्यंत प्रति क्विंटल ७०० रुपयांचा बाेनस जाहीर करण्यात आला. या केंद्रांवर धान विकण्यासाठी शेतकऱ्यांनी नाेंदणीही करण्यात आली हाेती. मात्र, हे केंद्र काही नाेंदणीकृत शेतकऱ्यांकडील धानाचे माेजमाप पूर्ण हाेण्यापूर्वीच बंद करण्यात आले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडे धान विक्रीविना शिल्लक आहे.

ताे धान व्यापाऱ्यांना कमी किमतीत विकावा लागत असल्याने नुकसान हाेत आहे. त्यामुळे शासनाने या धानाची खरेदी करावी अथवा ते शक्य नसल्याने नाेंदणीकृत शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७०० रुपये बाेनस देण्यात यावे, अशी मागणीही शेतकऱ्यांनी वेळी केली हाेती. आंदाेलनात भंडारबाेडी, महादुला, शिवणी, बाेरी येथील शेतकरी सहभागी झाले हाेते. भंडारबाेडीचे माजी सरपंच बलदेव कुमरे, नारायण झाडे, भागवत माेहने, हिंमत घाेडागाडे, दिनेश बडवाईक, वच्छला काठाेके यांनी उपविभागीय अधिकारी जाेगेंद्र कट्यारे यांच्याकडे निवेदन साेपविले. ही समस्या न साेडविल्यास गुरुवार (दि. ६)पासून आंदाेलन करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला.

...

१,९०० शेतकरी शिल्लक

नाेंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी खरेदी विक्री संघाकडे १,१०० तर आदिवासी विकास महामंडळाकडे ८०० शेतकऱ्यांकडील धान अद्यापही माेजणीविना पडून आहे. हे खरेदी केंद्र मध्यंतरी बरेच दिवस बंद ठेवण्यात आले हाेते. या खरेदी केंद्रावर किमान आधारभूत किमतीप्रमाणे म्हणजेच प्रति क्विंटल १,८६८ रुपयांप्रमाणे धानाची खरेदी करण्यात आली. शिवाय, शेतकऱ्यांना ७०० रुपये प्रति क्विंटल बाेनस जाहीर करण्यात आल्याने २,५६८ रुपये भाव मिळायचा. धान खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांना शिल्लक धान १,३०० रुपये प्रति क्विंटल दराने विकावा लागत आहे. हा दर किमान आधारभूत किमतीपेक्षा ५६८ रुपये कमी आहे. यात त्यांचे प्रति क्विंटल ५६८ ते १,२६८ रुपयांचे नुकसान हाेत आहे.