शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
3
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
4
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
5
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
6
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
7
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
8
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
9
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
10
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
11
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
12
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
13
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
14
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
15
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
16
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
17
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
18
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
19
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

व्यापारी जिंकले !

By admin | Updated: August 1, 2015 03:54 IST

शेवटी एलबीटीत सवलत : लोकमतच्या पुढाकाराचे कौतुक

नागपूर : स्थानिक सस्था कर (एलबीटी) हटविण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या व्यापाऱ्यांना आजचा दिवस दिलासा देणारा ठरला. राज्यसरकारने दिलेले आश्वासन पाळत ५० कोटींखालील वार्षिक उलाढालीवर एलबीटी रद्द करण्याची घोषणा केली व व्यापाऱ्यांनी विजयोत्सव साजरा केला. लोकमतने व्यापाऱ्यांची बाजू लावून धरत एलबीटी रद्द करण्यासाठी काऊंटडाऊन सुरू केले होते. व्यापाऱ्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी पुढाकार घेतला होता. लोकमतने घेतलेल्या या पुढाकाराचे व्यापाऱ्यांनी कौतुक करीत आभार मानले. १ एप्रिल २०१३ पासून नागपुरात एलबीटी लागू झाला होता. याला व्यापाऱ्यांनी जोरदार विरोध केला. यातील नियम, अटी व हिशेब देण्याची पद्धत कठीण असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे होते.यामुळे इन्स्पेक्टर राज वाढेल, असेही त्यांचे म्हणणे होते. शिवाय एलबीटी लादल्यामुळे व्यापार कमी होईल, बाहेरगावचे व्यापारी शहरात खरेदीसाठी येणार नाहीत, अशी बाजू मांडत व्यापाऱ्यांनी एलबीटी विरोधात आंदोलन सुरू केले होते. बाजारपेठा बंद ठेवल्या. मोर्चे काढले. शंभरावर व्यापाऱ्यांवर गुन्हेही दाखल झाले. ‘लोकमत’ने सातत्याने हा विषय लावून धरला. चौफेर दबाव वाढल्यानंतर शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वार्षिक ५० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना एलबीटीतून मुक्त केले. (प्रतिनिधी)पेट्रोल पंप नव्हे, ग्राहकांचा फायदा विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे पदाधिकारी अमित गुप्ता यांनी सांगितले की, शहरात ७५ पेट्रोल पंप आहे. यापैकी कुणाचाही टर्नओव्हर ५० कोटीहून अधिक नाही. त्यामुळे आता शहरात पेट्रोल-डिझेलवर एलबीटी वसूल केला जाणार नाही. याचा लाभ पेट्रोलपंप मालकांना नव्हे तर थेट ग्राहकांना मिळेल. यामुळे पेट्रोल पंपांचा शहराबाहेर गेलेल्या व्यापारही परत मिळेल.