शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
2
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
3
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
4
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
5
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
6
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
7
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
8
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
9
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
10
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
11
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
12
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
13
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
14
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
15
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
16
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
17
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
18
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
19
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
20
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?

विजेच्या धक्क्याने बैलजाेडीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : बैलगाडीने शेतात जात असताना आंब्याच्या झाडाची माेठी फांदी विजेच्या तारांवर पडली आणि त्या जिवंत ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेंढाळी : बैलगाडीने शेतात जात असताना आंब्याच्या झाडाची माेठी फांदी विजेच्या तारांवर पडली आणि त्या जिवंत तारा तुटून बैलगाडीला जुंपलेल्या दाेन्ही बैलांच्या अंगावर पडल्या. हा प्रकार लक्षात येताच शेतकरी व त्याच्या सातवर्षीय मुलाने बैलांना स्पर्श करण्याऐवजी बैलगाडीतून उडी मारली व बाजूला झाले. यात विजेच्या धक्क्याने दाेन्ही बैलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना काेंढाळी (ता. काटाेल) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील साेनमाेह शिवारात शुक्रवारी (दि. १८) सकाळी घडली.

बलराम भाेयर (४०, रा. काेंढासावळी, ता. काटाेल) यांची साेनमाेह, ता. काटाेल शिवारात शेती आहे. ते व त्यांचा मुलगा शिव बलराम भाेयर (७) बैलगाडीने नेहमीप्रमाणे शेतात जात हाेते. साेनमाेह शिवारातील नदीजवळ पाेहाेचताच आंब्याच्या झाडाची माेठी फांदी विजेच्या तारांवर काेसळली. त्यामुळे तारा तुटल्या. या तारा रस्त्याला आडव्या गेल्या असल्याने त्या थेट बैलगाडीला जुंपलेल्या दाेन्ही बैलांच्या अंगावर पडल्या.

त्यामुळे त्यांना जाेरात विजेचा धक्का लागला आणि काही वेळात घटनास्थळी दाेन्ही बैलांचा मृत्यू झाला. बैलांच्या अंगावर विजेच्या तारा पडल्या असल्याचे लक्षात येताच बलराम यांनी प्रसंगावधान बाळगत शिवला साेबत घेऊन तारांच्या विरुद्ध दिशेने बैलगाडीतून उडी मारली व बाजूला झाले. माहिती मिळताच महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेत ऐन खरीप हंगामाच्या ताेंडावर बैलजाेडी मृत्युमुखी पडल्याने महावितरण कंपनी व शासनाने बलराम यांना याेग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नागरिाकांनी केली आहे.