शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सबरोबरच रिफायनरीही उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:10 IST

नागपूर : विदर्भात रिफायनरीशिवाय केवळ पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारणे म्हणजे औद्योगिकदृष्ट्या आव्हान असलेल्या प्रदेशाच्या विकासासाठी अर्धवट प्रयत्न ठरेल. रिफायनरीच्या अभावमुळे ...

नागपूर : विदर्भात रिफायनरीशिवाय केवळ पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारणे म्हणजे औद्योगिकदृष्ट्या आव्हान असलेल्या प्रदेशाच्या विकासासाठी अर्धवट प्रयत्न ठरेल. रिफायनरीच्या अभावमुळे या प्रदेशाला रिफाईंड पेट्रोकेमिकल उत्पादनांसाठी इतर प्रदेशांवर नेहमीसाठी अवलंबून रहावे लागेल. याची दखल घेत विदर्भात रिफायनरीही उभारण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस नेते माजी आमदार आशिष देशमुख यांनी केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्री हरदीपसिंग पुरी यांना पत्र पाठवून केली आहे.

देशमुख यांनी पत्रात म्हटले आहे की, मध्यभारतातील बहुतेक पेट्रोलियम उत्पादनांची मागणी दूर समुद्र किनाऱ्यावर असलेल्या रिफायनरींकडे होत आलेली आहे. म्हणूनच याचे ओझे ग्राहक व तेल निर्मात्या कंपन्यांवर निर्माण झाले आहे. मध्यभारतात काम करणाऱ्या कोळसा, चुनखडी, मॅगनीज, लोह खनिज, स्टील आणि ॲल्युमिनियम उत्पादक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात पेट्रोलियम उत्पादनांची आवश्यकता आहे. ४५० किलोमीटरच्या परिसरात ३० मोठे सिमेंट प्लांट्स, ५ मोठे स्टील प्लांट्स, ३ मोठे ॲल्युमिनियम स्मेल्टर्स आणि वीज निर्मिती कंपन्यांना उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात पेट्रोलियम पदार्थांची मागणी आहे. कापूस लागवड करणाऱ्या भागांना चांगल्या दर्जाच्या कपड्यांच्या उत्पादनासाठी पॉलिस्टर ब्लेंडिंग करण्याची आवश्यकता असते त्यामुळे शेतकऱ्यांना कापसाची चांगली किंमत मिळेल. आता रिफायनरी व पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्ससाठी किनारपट्टीचे स्थान आवश्यक नाही. किनारपट्टीपासून टाकलेल्या क्रूड पाईपलाईनद्वारे बऱ्याच लॅण्ड रिफायनरी यशस्वीरीत्या कार्य करीत आहेत. खरं तर दिल्ली जवळ तीन मोठ्या रिफायनरी कार्यरत आहेत. पानिपत, भटिंडा, मथुरा सर्वांचा विस्तार होत आहे. त्यामुळे विदर्भातही रिफायनरी सुरु केल्या जाऊ शकतात. विदर्भातील सर्वात मोठ्या रिफायनरी व पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सद्वारे बेरोजगारी आणि प्रदेशाचा आर्थिक अनुशेष यासारख्या मुद्द्यांचे कायमचे निराकरण केले जाईल. मिहान, एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणात भूखंड उपलब्ध आहेत. या प्रकल्पाद्वारेच त्यांना शक्य तितका चांगला परतावा मिळू शकतो. मुंबई-नागपूर एक्स्प्रेस वे सोबत पाईपलाइन विकसित केल्यास मोठ्या प्रमाणात वाहतूक खर्च वाचवता येईल, असेही देशमुख यांनी पत्रात नमूद केले आहे.