शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

विदर्भात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सबरोबरच रिफायनरीही उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:10 IST

नागपूर : विदर्भात रिफायनरीशिवाय केवळ पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारणे म्हणजे औद्योगिकदृष्ट्या आव्हान असलेल्या प्रदेशाच्या विकासासाठी अर्धवट प्रयत्न ठरेल. रिफायनरीच्या अभावमुळे ...

नागपूर : विदर्भात रिफायनरीशिवाय केवळ पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारणे म्हणजे औद्योगिकदृष्ट्या आव्हान असलेल्या प्रदेशाच्या विकासासाठी अर्धवट प्रयत्न ठरेल. रिफायनरीच्या अभावमुळे या प्रदेशाला रिफाईंड पेट्रोकेमिकल उत्पादनांसाठी इतर प्रदेशांवर नेहमीसाठी अवलंबून रहावे लागेल. याची दखल घेत विदर्भात रिफायनरीही उभारण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस नेते माजी आमदार आशिष देशमुख यांनी केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्री हरदीपसिंग पुरी यांना पत्र पाठवून केली आहे.

देशमुख यांनी पत्रात म्हटले आहे की, मध्यभारतातील बहुतेक पेट्रोलियम उत्पादनांची मागणी दूर समुद्र किनाऱ्यावर असलेल्या रिफायनरींकडे होत आलेली आहे. म्हणूनच याचे ओझे ग्राहक व तेल निर्मात्या कंपन्यांवर निर्माण झाले आहे. मध्यभारतात काम करणाऱ्या कोळसा, चुनखडी, मॅगनीज, लोह खनिज, स्टील आणि ॲल्युमिनियम उत्पादक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात पेट्रोलियम उत्पादनांची आवश्यकता आहे. ४५० किलोमीटरच्या परिसरात ३० मोठे सिमेंट प्लांट्स, ५ मोठे स्टील प्लांट्स, ३ मोठे ॲल्युमिनियम स्मेल्टर्स आणि वीज निर्मिती कंपन्यांना उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात पेट्रोलियम पदार्थांची मागणी आहे. कापूस लागवड करणाऱ्या भागांना चांगल्या दर्जाच्या कपड्यांच्या उत्पादनासाठी पॉलिस्टर ब्लेंडिंग करण्याची आवश्यकता असते त्यामुळे शेतकऱ्यांना कापसाची चांगली किंमत मिळेल. आता रिफायनरी व पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्ससाठी किनारपट्टीचे स्थान आवश्यक नाही. किनारपट्टीपासून टाकलेल्या क्रूड पाईपलाईनद्वारे बऱ्याच लॅण्ड रिफायनरी यशस्वीरीत्या कार्य करीत आहेत. खरं तर दिल्ली जवळ तीन मोठ्या रिफायनरी कार्यरत आहेत. पानिपत, भटिंडा, मथुरा सर्वांचा विस्तार होत आहे. त्यामुळे विदर्भातही रिफायनरी सुरु केल्या जाऊ शकतात. विदर्भातील सर्वात मोठ्या रिफायनरी व पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सद्वारे बेरोजगारी आणि प्रदेशाचा आर्थिक अनुशेष यासारख्या मुद्द्यांचे कायमचे निराकरण केले जाईल. मिहान, एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणात भूखंड उपलब्ध आहेत. या प्रकल्पाद्वारेच त्यांना शक्य तितका चांगला परतावा मिळू शकतो. मुंबई-नागपूर एक्स्प्रेस वे सोबत पाईपलाइन विकसित केल्यास मोठ्या प्रमाणात वाहतूक खर्च वाचवता येईल, असेही देशमुख यांनी पत्रात नमूद केले आहे.