शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सबरोबरच रिफायनरीही उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:10 IST

नागपूर : विदर्भात रिफायनरीशिवाय केवळ पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारणे म्हणजे औद्योगिकदृष्ट्या आव्हान असलेल्या प्रदेशाच्या विकासासाठी अर्धवट प्रयत्न ठरेल. रिफायनरीच्या अभावमुळे ...

नागपूर : विदर्भात रिफायनरीशिवाय केवळ पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारणे म्हणजे औद्योगिकदृष्ट्या आव्हान असलेल्या प्रदेशाच्या विकासासाठी अर्धवट प्रयत्न ठरेल. रिफायनरीच्या अभावमुळे या प्रदेशाला रिफाईंड पेट्रोकेमिकल उत्पादनांसाठी इतर प्रदेशांवर नेहमीसाठी अवलंबून रहावे लागेल. याची दखल घेत विदर्भात रिफायनरीही उभारण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस नेते माजी आमदार आशिष देशमुख यांनी केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्री हरदीपसिंग पुरी यांना पत्र पाठवून केली आहे.

देशमुख यांनी पत्रात म्हटले आहे की, मध्यभारतातील बहुतेक पेट्रोलियम उत्पादनांची मागणी दूर समुद्र किनाऱ्यावर असलेल्या रिफायनरींकडे होत आलेली आहे. म्हणूनच याचे ओझे ग्राहक व तेल निर्मात्या कंपन्यांवर निर्माण झाले आहे. मध्यभारतात काम करणाऱ्या कोळसा, चुनखडी, मॅगनीज, लोह खनिज, स्टील आणि ॲल्युमिनियम उत्पादक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात पेट्रोलियम उत्पादनांची आवश्यकता आहे. ४५० किलोमीटरच्या परिसरात ३० मोठे सिमेंट प्लांट्स, ५ मोठे स्टील प्लांट्स, ३ मोठे ॲल्युमिनियम स्मेल्टर्स आणि वीज निर्मिती कंपन्यांना उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात पेट्रोलियम पदार्थांची मागणी आहे. कापूस लागवड करणाऱ्या भागांना चांगल्या दर्जाच्या कपड्यांच्या उत्पादनासाठी पॉलिस्टर ब्लेंडिंग करण्याची आवश्यकता असते त्यामुळे शेतकऱ्यांना कापसाची चांगली किंमत मिळेल. आता रिफायनरी व पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्ससाठी किनारपट्टीचे स्थान आवश्यक नाही. किनारपट्टीपासून टाकलेल्या क्रूड पाईपलाईनद्वारे बऱ्याच लॅण्ड रिफायनरी यशस्वीरीत्या कार्य करीत आहेत. खरं तर दिल्ली जवळ तीन मोठ्या रिफायनरी कार्यरत आहेत. पानिपत, भटिंडा, मथुरा सर्वांचा विस्तार होत आहे. त्यामुळे विदर्भातही रिफायनरी सुरु केल्या जाऊ शकतात. विदर्भातील सर्वात मोठ्या रिफायनरी व पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सद्वारे बेरोजगारी आणि प्रदेशाचा आर्थिक अनुशेष यासारख्या मुद्द्यांचे कायमचे निराकरण केले जाईल. मिहान, एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणात भूखंड उपलब्ध आहेत. या प्रकल्पाद्वारेच त्यांना शक्य तितका चांगला परतावा मिळू शकतो. मुंबई-नागपूर एक्स्प्रेस वे सोबत पाईपलाइन विकसित केल्यास मोठ्या प्रमाणात वाहतूक खर्च वाचवता येईल, असेही देशमुख यांनी पत्रात नमूद केले आहे.