शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

बजेटमध्ये ६६५ कोटींची तूट

By admin | Updated: April 4, 2016 06:02 IST

एलबीटीमुळे गेल्या वर्षभरात महापालिकेला बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यातच सन २०१५-१६ च्या

गणेश हूड ल्ल नागपूरएलबीटीमुळे गेल्या वर्षभरात महापालिकेला बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यातच सन २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात १९६४.९९ कोटीचे उत्पन्न अपेक्षित असताना प्रत्यक्षात १३०० कोटींचा महसूल जमा झाला. ६६५ कोटींची तूट आहे. शासनाकडून मिळणारे अनुदान पुरेसे नाही. अशा परिस्थितीत पुढील वर्षात होणाऱ्या निवडणुकीपूर्वी शहरातील विकास प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने महापालिकेतील सत्ताधारी नागपूर विकास आघाडीची चिंता वाढली आहे. महसूल जमा न झाल्याने नवीन विकास प्रकल्प राबविता येणार नाही. निदान सुरू असलेले प्रकल्प डिसेंबरपूर्वी पूर्ण कसे होतील, याचे नियोजन सुरू आहे. त्यातच स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी अपेक्षित उत्पन्नाच्या आधारावर मंजुरी दिलेली कामे व ३१ मार्चपर्यंत महापालिकेच्या तिजोरीत जमा झालेल्या महसुलाचा विचार करता यात ३५० कोटीचा फरक आहे.वास्तव उत्पन्नाच्या आधारे आयुक्तांनी १४७४.९८ कोटींचा सुधारित अर्थसंकल्प दिला होता. परंतु यातही १५० कोटींची तूट आहे. २०१६-१७ या वर्षाचा विचार करता एकूण उत्पन्नाच्या ५५ टक्के आस्थापना खर्च आहे. हाती घेण्यात आलेले सिमेंट रस्ते व इतर प्रकल्पात महापालिकेला ३५० कोटींचा वाटा द्यावा लागणार आहे. तसेच कामगारांच्या वेतन फरकाची रक्कम देण्यासंदर्भात न्यायालयाने निर्देश दिल्यास यासाठी १५० कोटींची तरतूद करावी लागणार आहे. यामुळे अनेक विकास कामांना कात्री लागणार आहे. याबाबींचा विचार केला तर महापालिकेच्या तिजोरीत मोजकाच निधी शिल्लक राहणार आहे. यातून सुरू असलेल्या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध झाला तरी भरपूर आहे. त्यामुळे नवीन प्रकल्पांचा विचार विकास आघाडीने तूर्त बाजूला ठेवला आहे. १३०० कोटींच्या उत्पन्नात सिमेंट रस्त्यांसाठी राज्य सरकारकडून १०० कोटी प्राप्त झाले आहे. एलबीटी व इतर अनुदानाच्या माध्यमातून राज्य सरकारकडून ५०४ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. मालमत्ता कर, पाणीपट्टी, एलबीटी व इतर मार्गाने महापालिके ला गेल्या वर्षभरात ७९६ कोटींचा महसूल जमा झाला आहे. आघाडीची चिंता वाढली४महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेला एलबीटी १ आॅगस्ट २०१५ पासून रद्द करण्यात आला. एलबीटीपासून ४५७ कोटींचा महसूल जमा झाला. यात शासकीय अनुदानाचाही समावेश आहे. मालमत्ता करापासून २७०.८५ कोटींचे उत्पन्न अपेक्षित असताना प्रत्यक्षात १८७ कोटी जमा झाले. पाणीपट्टीपासून १५० कोटी गृहीत धरले होेते. परंतु प्रत्यक्षात १२० कोटींचा आकडा पार केलेला नाही. नगररचना विभागाकडून १४५ कोटी अपेक्षित असताना ६५कोटींचाच महसूल मिळाल्याने तूट वाढली.निवडणुकीचा उत्पन्नावर परिणाम४स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त यांनी २०१६-१७ या वर्षाचा अर्थसंकल्प २०४८ कोटीचा दिला आहे. यात शासकीय अनुदान ७३५ कोटी, मालमत्ता करापासून ३०६ तर पणीपट्टीपासून १५० कोटी अपेक्षित आहे. मागील वर्षाच्या तुलनेत चालु वित्तवर्षात मालमत्ता व पाणीपट्टीपासून २०० कोटींचे उत्पन्न वाढण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. परंतु पुढील वर्षात होत असलेल्या निवडणुका विचारात घेता उद्दिष्ट गाठणे अशक्य असल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.