शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

Budget 2019; मध्यमवर्गाला अधिक दिलासा मिळण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 11:19 IST

१ फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प (लेखानुदान) सादर करण्यात येणार आहे. यासंदर्भात नागपुरातील युवा राजकीय व आर्थिक विश्लेषक शिवानी दाणी-वखरे यांचे मनोगत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तो लोकमतच्या वाचकांसाठी देत आहोत.

ठळक मुद्देयंदाचं हे बजेट पूर्ण बजेट असणार आहे. ते अंतरिम नसेल.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्षा बाशूनागपूर:सोळाव्या लोकसभेची मुदत ३१ जानेवारी २०१९ ला संपत आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष २०१९-२० साठी सरकारकडून १ फेब्रुवारीला पूर्ण अर्थसंकल्पाऐवजी व्होट ऑन अकाऊंट म्हणजेच अंतरिम अर्थसंकल्प (लेखानुदान) सादर करण्यात येणार आहे. यासंदर्भात नागपुरातील युवा राजकीय व आर्थिक विश्लेषक शिवानी दाणी-वखरे यांचे मनोगत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तो लोकमतच्या वाचकांसाठी देत आहोत.१ तारखेला सादर केला जाणारा अंतरिम अर्थसंकल्प कसा असू शकतो?शिवानी दाणी वखरे- २०१९ च्या बजेटकडे सगळ््या लोकांचं लक्ष लागलेलं आहे. कारण हे निवडणूकपूर्व बजेट असल्याने त्याच्याकडे जनतेचं लक्ष अधिक राहणार आहे. लोकांमध्ये उत्सुकता आहे. याला पॉलिटिक्स बजेट असंही संबोधलं जाऊ शकतं. अर्थव्यवस्थेची सध्याची परिस्थिती पाहता, ज्या प्रकारे आपण आतापर्यंत इन्फ्रास्ट्रक्चरल किंवा भांडवली खर्च केला आहे, हा तो खर्च असतो ज्यात संपत्ती निर्माण केली जाते. जसं पूल बांधणं, रस्ते बांधणं. ज्यातून सरकाराल रेव्हेन्यू मिळतो. दुसरा असतो रेव्हेन्यू किंवा महसूल खर्च. हा खर्च करावाच लागतो. जसं सेवानिवृत्ती वेतन. आतापर्यंतच्या बहुतांश अर्थसंकल्पांमध्ये या महसूल खर्चावर फार मोठा भर दिला जात होता. त्या तुलनेत भांडवली खर्चाकडे लक्ष दिलं जात नव्हतं. मात्र गेल्या तीन-चार वर्षांत भांडवली खर्चावर विशेष लक्ष दिलं गेलं आहे हे आपण पाहत आहोत. भांडवली व महसूलीमधलं हे प्रमाण आता सकारात्मक झाले आहे. त्यामुळे या बजेटमध्ये भांडवली खर्चाला प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे.दुसरं म्हणजे, या बजेटमध्ये सबसिडीसाठी काय तरतुदी आहेत यावरही लक्ष राहणार आहे. गेल्या चार वर्षात सबसिडीचे प्रकार बदलवले गेले आहेत. आता ती शेवटच्या माणसापर्यंत पोहचली जाते. त्याची क्वालिटी सुधारली आहे. या सबसिडीमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे.ज्याला देशाचा कणा असं आपण म्हणतो, त्या नोकरदार व मध्यमवर्गासाठी या बजेटमध्ये प्राप्तिकराची मर्यादा वाढविली जाण्याची शक्यता आहे. सध्या ती एक लाख पन्नास हजारांची आहे. तीत वाढ होऊ शकते. त्यामुळे मध्यमवर्गही मोठ्या अपेक्षेने या बजेटवर नजर ठेवून आहे.यंदाचं हे बजेट पूर्ण बजेट असणार आहे. ते अंतरिम नसेल.या बजेटमध्ये जेडीपीचे प्रमाण राखले जाते की नाही याकडेही लक्ष दिले जाईल. कृषी आणि युवा वर्गासाठी याआधी विशेषत्वाने विचार केला गेला नव्हता. जो आता केला जातो आहे. त्यांच्यासाठी काय तरतुदी आहेत ते पाहणंही औत्सुक्याचे राहील. एकंदरित हे एक पूर्ण बजेट असेल. 

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019