शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
2
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
3
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
4
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
5
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
6
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
7
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
8
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
9
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
10
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
11
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
12
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
13
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
14
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
15
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
16
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
17
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
18
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
19
जागा शिंदेसेनेला सुटली, धनुष्यबाणावर लढण्याची ऑफरही आली, पण..., भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्तीने घेतला मोठा निर्णय  
20
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? सावधान! सेबीने दिला इशारा; तुमचे पैसे अडकण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

कृषी अधिकाऱ्यांच्या बदल्यांना ब्रेक

By admin | Updated: May 28, 2017 02:29 IST

राज्य शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी यंदा जाहीर केलेले ‘उन्नत शेती-समृद्घ शेतकरी ’अभियान यशस्वी करण्यासाठी

आदेश जारी : उन्नत शेतीने रोखला मार्ग लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी यंदा जाहीर केलेले ‘उन्नत शेती-समृद्घ शेतकरी ’अभियान यशस्वी करण्यासाठी कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ब्रेक लावण्यात आला आहे. यासंबंधी राज्य शासनातर्फे अलीकडेच एक आदेश जारी करण्यात आला आहे. त्या आदेशानुसार मे महिन्यात बदलीस पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या पुढील आदेशापर्यंत थांबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्य शासनातर्फे कृषी विभागाच्या माध्यमातून २०१७-१८ च्या खरीप हंगामापासून राज्यात ‘उन्नत शेती-समृद्घ शेतकरी’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेंतर्गत कृषी विभागामार्फत शेती विकास आणि शेतकरी कल्याणाच्या विविध योजना, कार्यक्रम, आधुनिक कृषी औजारे तसेच कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. सोबतच या मोहिमेत प्रमुख पिकांची प्रत्यक्षात प्राप्त होणारी उत्पादकता आणि त्या पिकांच्या अनुवांशिक उत्पादन क्षमतेची तफावत कमी करून शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जाच्या रकमेपेक्षा अधिक उत्पन्न प्राप्त करून देणे, पीक विमा योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांचा सहभाग करून घेणे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षित करणे अपेक्षित आहे. अशास्थितीत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्यास ही मोहीम राबविण्यास अडचण निर्माण होईल. त्यामुळे कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक व कृषी सेवक या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्या करण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी विशेष म्हणजे, मागील वर्षीसुद्धा उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या बदल्या थांबविण्यात आल्या होत्या. शिवाय यंदा पुन्हा सरकारने बदल्यांना ब्रेक लावल्यामुळे कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मागील वर्षी थांबविण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना आता एकाच ठिकाणी चार वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी झाला आहे. त्यामुळे यावर्षी त्यांच्या बदल्या झाल्या नाहीत, तर त्यांना पाचवे वर्षसुद्धा काढावे लागणार आहे. मागील वर्षी कृषी खात्यात अचानक झालेल्या फेरबदलामुळे या सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या रोखण्यात आल्या होत्या. शिवाय यावर्षी उन्नत शेतीने पुन्हा या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा मार्ग रोखला आहे.