शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
4
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
5
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
6
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
7
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
8
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
9
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
10
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
11
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण
12
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
13
वाद-प्रतिवाद सुरू असलेल्या भारताला आज स्वीकारमंत्र अंगीकारण्याची गरज -मोरारीबापू
14
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
15
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
16
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
17
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
18
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
19
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
20
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल

कृषी अधिकाऱ्यांच्या बदल्यांना ब्रेक

By admin | Updated: May 28, 2017 02:29 IST

राज्य शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी यंदा जाहीर केलेले ‘उन्नत शेती-समृद्घ शेतकरी ’अभियान यशस्वी करण्यासाठी

आदेश जारी : उन्नत शेतीने रोखला मार्ग लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी यंदा जाहीर केलेले ‘उन्नत शेती-समृद्घ शेतकरी ’अभियान यशस्वी करण्यासाठी कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ब्रेक लावण्यात आला आहे. यासंबंधी राज्य शासनातर्फे अलीकडेच एक आदेश जारी करण्यात आला आहे. त्या आदेशानुसार मे महिन्यात बदलीस पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या पुढील आदेशापर्यंत थांबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्य शासनातर्फे कृषी विभागाच्या माध्यमातून २०१७-१८ च्या खरीप हंगामापासून राज्यात ‘उन्नत शेती-समृद्घ शेतकरी’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेंतर्गत कृषी विभागामार्फत शेती विकास आणि शेतकरी कल्याणाच्या विविध योजना, कार्यक्रम, आधुनिक कृषी औजारे तसेच कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. सोबतच या मोहिमेत प्रमुख पिकांची प्रत्यक्षात प्राप्त होणारी उत्पादकता आणि त्या पिकांच्या अनुवांशिक उत्पादन क्षमतेची तफावत कमी करून शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जाच्या रकमेपेक्षा अधिक उत्पन्न प्राप्त करून देणे, पीक विमा योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांचा सहभाग करून घेणे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षित करणे अपेक्षित आहे. अशास्थितीत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्यास ही मोहीम राबविण्यास अडचण निर्माण होईल. त्यामुळे कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक व कृषी सेवक या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्या करण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी विशेष म्हणजे, मागील वर्षीसुद्धा उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या बदल्या थांबविण्यात आल्या होत्या. शिवाय यंदा पुन्हा सरकारने बदल्यांना ब्रेक लावल्यामुळे कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मागील वर्षी थांबविण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना आता एकाच ठिकाणी चार वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी झाला आहे. त्यामुळे यावर्षी त्यांच्या बदल्या झाल्या नाहीत, तर त्यांना पाचवे वर्षसुद्धा काढावे लागणार आहे. मागील वर्षी कृषी खात्यात अचानक झालेल्या फेरबदलामुळे या सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या रोखण्यात आल्या होत्या. शिवाय यावर्षी उन्नत शेतीने पुन्हा या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा मार्ग रोखला आहे.