शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
3
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
4
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
5
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
6
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
7
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
8
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
9
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
10
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
11
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
12
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
13
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
14
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
15
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
16
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
17
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
18
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
19
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
20
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा

कृषी अधिकाऱ्यांच्या बदल्यांना ब्रेक

By admin | Updated: May 28, 2017 02:29 IST

राज्य शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी यंदा जाहीर केलेले ‘उन्नत शेती-समृद्घ शेतकरी ’अभियान यशस्वी करण्यासाठी

आदेश जारी : उन्नत शेतीने रोखला मार्ग लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी यंदा जाहीर केलेले ‘उन्नत शेती-समृद्घ शेतकरी ’अभियान यशस्वी करण्यासाठी कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ब्रेक लावण्यात आला आहे. यासंबंधी राज्य शासनातर्फे अलीकडेच एक आदेश जारी करण्यात आला आहे. त्या आदेशानुसार मे महिन्यात बदलीस पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या पुढील आदेशापर्यंत थांबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्य शासनातर्फे कृषी विभागाच्या माध्यमातून २०१७-१८ च्या खरीप हंगामापासून राज्यात ‘उन्नत शेती-समृद्घ शेतकरी’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेंतर्गत कृषी विभागामार्फत शेती विकास आणि शेतकरी कल्याणाच्या विविध योजना, कार्यक्रम, आधुनिक कृषी औजारे तसेच कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. सोबतच या मोहिमेत प्रमुख पिकांची प्रत्यक्षात प्राप्त होणारी उत्पादकता आणि त्या पिकांच्या अनुवांशिक उत्पादन क्षमतेची तफावत कमी करून शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जाच्या रकमेपेक्षा अधिक उत्पन्न प्राप्त करून देणे, पीक विमा योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांचा सहभाग करून घेणे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षित करणे अपेक्षित आहे. अशास्थितीत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्यास ही मोहीम राबविण्यास अडचण निर्माण होईल. त्यामुळे कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक व कृषी सेवक या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्या करण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी विशेष म्हणजे, मागील वर्षीसुद्धा उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या बदल्या थांबविण्यात आल्या होत्या. शिवाय यंदा पुन्हा सरकारने बदल्यांना ब्रेक लावल्यामुळे कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मागील वर्षी थांबविण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना आता एकाच ठिकाणी चार वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी झाला आहे. त्यामुळे यावर्षी त्यांच्या बदल्या झाल्या नाहीत, तर त्यांना पाचवे वर्षसुद्धा काढावे लागणार आहे. मागील वर्षी कृषी खात्यात अचानक झालेल्या फेरबदलामुळे या सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या रोखण्यात आल्या होत्या. शिवाय यावर्षी उन्नत शेतीने पुन्हा या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा मार्ग रोखला आहे.