शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

जिल्हा परिषदेच्या कर वसुलीला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:07 IST

नागपूर : जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता व पाणी कर वसुलीला कोरोनामुळे ब्रेक लागला आहे. २०२०-२१ ...

नागपूर : जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता व पाणी कर वसुलीला कोरोनामुळे ब्रेक लागला आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात उद्दिष्टाच्या ३.३५ टक्के मालमत्ता तर ३.५९ टक्के पाणी कर वसूल करण्यात आला आहे.

कोरोना महामारीनंतर लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले. शहरासह ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमडली. त्यामुळे लाखो नळधारकांसह मालमत्ताधारकांकडे पाणी व मालमत्ता कर थकीत आहे. जि.प.च्या पंचायत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नळ योजनेतून वार्षिक २०७९.७६ लाखांचे उद्दिष्ट आहे. परंतु १ जून २०२१ पर्यंत केवळ ३.५९ टक्के वसुली होऊ शकली आहे. मालमत्ता कराचे उद्दिष्ट ५९८१.३२ लाख आहे. १ जूनपर्यंत केवळ ३.३५ टक्के वसुली झाली आहे. ग्रामस्थांकडे पाणीपट्टी व मालमत्ता कर थकीत असल्यामुळे सर्वच ग्रामपंचायतींपुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. कोरोना महामारीच्या संकटात अनेकांना रोजगार गमवावा लागला. शेतीच्या कामांसह इतर कामे आणि उद्योग-धंदे बंद असल्याने ग्रामस्थांची आर्थिक स्थिती ढासळलेली आहे. त्यामुळेच पाणी कर, मालमत्ता करासह अनेकांकडे वीज बिले थकीत आहेत.

दृष्टिक्षेपात

पाणी कराचे उद्दिष्ट-२०७९.७६ लाख

वसूल झाले-७४.७२ लाख

मालमत्ता कराचे उद्दिष्ट-५९८१.३२ लाख

वसूल झाले-२००.४२ लाख

- १,६९,३७७ लोकांच्या घरी नळ

जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये ७७४ ग्रामपंचायती अंतर्गत १६३५ गावे व १६६० वाड्यांमध्ये नळयोजना आहे. ग्रामीण भागातील कुटुंब संख्या ४,४९,४८८ आहे. यापैकी ४,१७,३७९ कुटुंबाला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यापैकी १,६९,३७७ नागरिकांना १४२९ नळयोजनांच्या माध्यमातून वैयक्तिक नळ कनेक्शन देण्यात आले आहे.