शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळ निर्मितीच्या प्रशिक्षणाला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:08 IST

नागपूर : महामारीच्या काळात आरोग्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या आणि आरोग्य क्षेत्राचा कणा असलेल्या नर्सेसचे प्रशिक्षण कोरोनामुळे थांबले आहे. विदर्भात ...

नागपूर : महामारीच्या काळात आरोग्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या आणि आरोग्य क्षेत्राचा कणा असलेल्या नर्सेसचे प्रशिक्षण कोरोनामुळे थांबले आहे. विदर्भात किमान शंभरच्या जवळपास स्वयंअर्थ सहायित व अनुदानित कॉलेजमध्ये नर्सिंगचे प्रशिक्षण देण्यात येते. नर्सिंग प्रशिक्षणात प्रात्यक्षिक हा महत्त्वाचा भाग आहे. परंतु कोरोनामुळे कॉलेज बंद आहे आणि ऑनलाईन शिक्षणातून प्रशिक्षित नर्स घडविणे शक्य नाही. त्याचा परिणाम नर्सिंग कॉलेजच्या प्रवेशावरही पडला आहे.

खरे म्हणजे कोरोना महामारीच्या काळात नर्सिंगचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना घरात बसवून ऑनलाईन शिक्षण देणे हे चुकीचे आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या केसेस वाढल्या आहेत. मार्च २०२० पासून कॉलेज बंद असल्याने नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना घरातच बसून ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागत आहे. जर कॉलेज सुरू असते तर या प्रशिक्षण घेणाऱ्या नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचा प्रशासनाने सेवा देण्यासाठी उपयोग करून घेतला असता, तर आरोग्य विभागाला मनुष्यबळाच्या कमतरतेचा सामना करावा लागला नसता. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना रुग्णालयांमध्ये सेवा देणे हा अभ्यासक्रमाचाच भाग आहे. परंतु सरकारने कोरोनामुळे नर्सिंग कॉलेज बंद ठेवल्याने त्यांच्या प्रशिक्षणातील प्रात्यक्षिक भाग शिकविण्यातच आला नाही. कोरोनामुळे कॉलेज बंद असल्याचा परिणाम प्रवेशावरही झाला आहे. नवीन सत्रात नर्सिंगसाठी विद्यार्थिनींनी प्रशिक्षणाकडे पाठ दाखविली आहे. जसे वैद्यकीय अभ्यासक्रमाचे कॉलेज सुरू आहे, शासकीय कॉलेजमधील नर्सिंगचे अभ्यासक्रम सुरू आहेत, त्याच धर्तीवर खासगी कॉलेजमधील नर्सिंगचे वर्ग सुरू करावे, अशी मागणी नर्सिंग कॉलेज मॅनेजमेंट असोसिएशनचे सचिव प्रमोद वालमांडरे यांनी केली आहे.

- शिष्यवृत्तीही रखडल्या

महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक मंडळाने गेल्यावर्षीची परीक्षा जानेवारी २०२१ मध्ये घेतली. तब्बल दोन महिने लोटून गेले तरी परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील वर्षासाठी प्रवेश घेता येत नाही. त्यातच महाराष्ट्र राज्य समाजकल्याण विभागाच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत २२ मार्चपर्यंतची होती. गेल्यावर्षीच्या परीक्षेचा निकाल अद्यापही न लागल्याने पुढील वर्षासाठी प्रवेश घेऊन शिष्यवृत्तीचे फॉर्म भरू शकत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या रखडल्या आहेत.