शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
4
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
5
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
6
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
7
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
8
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
9
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
10
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
11
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
12
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
14
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
15
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
16
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
17
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
18
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
19
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
20
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

मनपात अर्थसंकल्पावर मंथन

By admin | Updated: May 11, 2015 02:17 IST

स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) अडीच महिन्यांनी हद्दपार होणार असल्याने व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. दुसरीकडे एलबीटी हाच मुख्य आर्थिक स्रोत असल्याने ...

नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) अडीच महिन्यांनी हद्दपार होणार असल्याने व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. दुसरीकडे एलबीटी हाच मुख्य आर्थिक स्रोत असल्याने एलबीटीला पर्याय काय, असा प्रश्न महापालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांना पडला आहे. सरकारकडून अनुदान मिळणार की पुन्हा जकात येणार अद्याप स्पष्ट झालेले नाही. या परिस्थितीत जूनच्या पहिल्या आठवड्यात २०१५-१६ च्या अर्थसंकल्प सादर क रावयाचा असल्याने मनपात अर्थसंकल्पावर मंथन सुरू आहे.२०१४-१५ या वर्षात स्थायी समितीने १६४५ कोटीचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प कमी राहील असा अंदाज आहे. एलबीटी रद्द होणार आहे. परंतु अद्याप पर्याय निश्चित नसल्याने समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे वास्तव उत्पन्नावर अर्थसंकल्प सादर करण्याच्या विचारात आहे. मनपा प्रशासनाने नगररचना विभागाच्या माध्यमातून विकास शुल्काशिवाय इतर शुल्काची वसुली रेडिरेकनरच्या आधारावर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या विभागाचे उत्पन्न तिपटीने वाढण्याची अपेक्षा आहे. तसेच मालमत्ता विभागाच्या उत्पन्नात वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. हॉटेल, व्यावसायिक प्रतिष्ठाने, सभागृह, रुग्णालये यांच्याकडून ७ टक्के स्वच्छता शुल्क वसूल केले जाणार आहे. मालमत्ता करापासून वित्त वर्षात २५० ते २७५ कोटीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. नगररचना विभागाचे उद्दिष्ट १०० वरून २५० कोटी करण्याचा प्रस्ताव आहे. एलबीटीपासून चार महिन्यात १७५ कोटी वसूल होण्याची अपेक्षा आहे. पाणीशुल्क १५० कोटी तसेच इतर विभागापासून १७५ कोटीचे उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे. सिमेंट रस्त्यांसाठी राज्य सरकारकडून मनपाला १०० कोटी प्राप्त झाले आहे. मनपा व नासुप्र यांचा प्रत्येकी १०० कोटीचा वाटा राहणार असल्याने अर्थसंकल्पात सिमेंट रस्त्यासाठी ३०० कोटीची तरतूद केली जाणार आहे. तसेच शासनाकडून विविध योजनाचे ३०० ते ४०० कोटीचे अनुदान प्राप्त होईल. तसेच कर्जाच्या माध्यमातून काही रक्कम उपलब्ध करून १७५० कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी सुरू आहे. या वर्षात ९७५ कोटीचे उत्पन्न झाले. मागील वर्षाच्या तुलनेत ते १७५ कोटीने अधिक आहे. दुसरीकडे मनपा प्रशासनाला दर महिन्याला आस्थापना व इतर बाबीवर महिन्याला ६३ कोटी खर्च करावे लागते. एलबीटी मधून प्रामुख्याने कर्मचाऱ्यांचे वेतन दिले जात होते. परंतु आॅगस्ट महिन्याचे वेतन देण्यासाठी प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागली.(प्रतिनिधी)