शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

मनपात अर्थसंकल्पावर मंथन

By admin | Updated: May 11, 2015 02:17 IST

स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) अडीच महिन्यांनी हद्दपार होणार असल्याने व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. दुसरीकडे एलबीटी हाच मुख्य आर्थिक स्रोत असल्याने ...

नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) अडीच महिन्यांनी हद्दपार होणार असल्याने व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. दुसरीकडे एलबीटी हाच मुख्य आर्थिक स्रोत असल्याने एलबीटीला पर्याय काय, असा प्रश्न महापालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांना पडला आहे. सरकारकडून अनुदान मिळणार की पुन्हा जकात येणार अद्याप स्पष्ट झालेले नाही. या परिस्थितीत जूनच्या पहिल्या आठवड्यात २०१५-१६ च्या अर्थसंकल्प सादर क रावयाचा असल्याने मनपात अर्थसंकल्पावर मंथन सुरू आहे.२०१४-१५ या वर्षात स्थायी समितीने १६४५ कोटीचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प कमी राहील असा अंदाज आहे. एलबीटी रद्द होणार आहे. परंतु अद्याप पर्याय निश्चित नसल्याने समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे वास्तव उत्पन्नावर अर्थसंकल्प सादर करण्याच्या विचारात आहे. मनपा प्रशासनाने नगररचना विभागाच्या माध्यमातून विकास शुल्काशिवाय इतर शुल्काची वसुली रेडिरेकनरच्या आधारावर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या विभागाचे उत्पन्न तिपटीने वाढण्याची अपेक्षा आहे. तसेच मालमत्ता विभागाच्या उत्पन्नात वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. हॉटेल, व्यावसायिक प्रतिष्ठाने, सभागृह, रुग्णालये यांच्याकडून ७ टक्के स्वच्छता शुल्क वसूल केले जाणार आहे. मालमत्ता करापासून वित्त वर्षात २५० ते २७५ कोटीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. नगररचना विभागाचे उद्दिष्ट १०० वरून २५० कोटी करण्याचा प्रस्ताव आहे. एलबीटीपासून चार महिन्यात १७५ कोटी वसूल होण्याची अपेक्षा आहे. पाणीशुल्क १५० कोटी तसेच इतर विभागापासून १७५ कोटीचे उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे. सिमेंट रस्त्यांसाठी राज्य सरकारकडून मनपाला १०० कोटी प्राप्त झाले आहे. मनपा व नासुप्र यांचा प्रत्येकी १०० कोटीचा वाटा राहणार असल्याने अर्थसंकल्पात सिमेंट रस्त्यासाठी ३०० कोटीची तरतूद केली जाणार आहे. तसेच शासनाकडून विविध योजनाचे ३०० ते ४०० कोटीचे अनुदान प्राप्त होईल. तसेच कर्जाच्या माध्यमातून काही रक्कम उपलब्ध करून १७५० कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी सुरू आहे. या वर्षात ९७५ कोटीचे उत्पन्न झाले. मागील वर्षाच्या तुलनेत ते १७५ कोटीने अधिक आहे. दुसरीकडे मनपा प्रशासनाला दर महिन्याला आस्थापना व इतर बाबीवर महिन्याला ६३ कोटी खर्च करावे लागते. एलबीटी मधून प्रामुख्याने कर्मचाऱ्यांचे वेतन दिले जात होते. परंतु आॅगस्ट महिन्याचे वेतन देण्यासाठी प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागली.(प्रतिनिधी)