शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
3
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
4
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
5
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
6
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
7
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
8
Crime: "तो माझी लैंगिक इच्छा पूर्ण करत नव्हता" पतीची हत्या केलेल्या पत्नीची पोलिसांत कबूली!
9
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: पूजन करताना चुकून दिवा विझणे अशुभ मानतात का? काय करावे?
10
Myntra ला ईडीचा मोठा धक्का! १६५४ कोटींच्या 'फेमा' उल्लंघनाचा आरोप, होलसेलच्या नावाखाली करत होते 'हे' काम
11
विमान अपघातानंतर ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले
12
बोल्ड लूक...प्रशस्त केबिन; लॉन्च झाली देशातील सर्वात स्वस्त ७ सीटर SUV, किंमत फक्त...
13
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
14
शारीरिक संबंधासाठी नकार देणे ही क्रूरता; मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा, पतीच्या घटस्फोटाला मान्यता
15
“रमी प्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक, पण माणिकराव कोकाटे...”; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
16
Shravan Special Recipe: खमंग, खुटखुटीत, चटकदार कोथिंबीर वडी, वाढवेल शोभा नैवेद्याच्या पानाची; पाहा रेसेपी 
17
उत्तर प्रदेशवाले काय करतील याचा नेम नाही! बनावट दूतावास उभारले, ४४ लाखांसह राजनैतिक वाहने जप्त; नेमकं प्रकरण काय?
18
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य
19
"उत्तर गाझा विलीन करणार, तेथे ज्यूंना वसवणार अन् पॅलेस्टिनींना...!" असा आहे इस्रायलचा 'खतरनाक' इरादा!
20
आधी iPhone ला खेळणं म्हटलं! हळू हळू ढासळत गेलं Blackberry चं साम्राज्य; वाचा पतनाची संपूर्ण कहाणी

पती-पत्नीने जाळून घेतले, दोघांचाही मृत्यू

By admin | Updated: March 11, 2017 02:38 IST

रोज रोज होणाऱ्या वादाचा भडका उडाल्यामुळे एकमेकांच्या रागावर पती-पत्नीने जाळून घेतले.

नागपूर : रोज रोज होणाऱ्या वादाचा भडका उडाल्यामुळे एकमेकांच्या रागावर पती-पत्नीने जाळून घेतले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. दर्शना (वय ३१) आणि सोनू लक्ष्मणराव नितनवरे (वय ३५) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. शेजाऱ्यांची वेळीच मदत मिळाल्यामुळे त्यांचा नऊ वर्षांचा मुलगा बचावला. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी मध्यरात्री ही थरारक घटना घडली. कोराडीच्या सेक्टर २९ मधील श्रीकृष्ण धाम, वॉक्स कूलर परिसरात राहणाऱ्या सोनूचे घरीच छोटेसे किराणा दुकान होते. घरी गाई आणि शेळ्याही होत्या. पत्नी दर्शना किराणा दुकान सांभाळायची तर सोनू दुधाचा व्यवसाय करायचा. घरची स्थिती चांगली असूनही सोनू दिवसभर कष्ट करायचा. मात्र, त्याला दारूचे व्यसन होते. रोजच त्याला दारू प्यायला लागत होती. तो दारू पिऊन घरी आल्यानंतर पती-पत्नीत वाद व्हायचा. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी सोनूने शेळ्या चरायला सोडल्या. त्याच्या घराच्या बाजूलाच रेल्वेलाईन आहे. रेल्वे रुळावरून जात असलेल्या एका शेळीला रेल्वेगाडीने चिरडले. ते पाहून सोनू दुखावला. त्या अवस्थेत त्याने दुपारीच दारू घेतली. त्यावरून पुन्हा पती-पत्नीत वाद झाला. रात्री रागाच्या भरात सोनूने पुन्हा दारू घेतली अन् त्यानंतर पती-पत्नीत कडाक्याचे भांडण झाले. रोज रोज होणारी कटकट संपविण्यासाठी सोनूने स्वत:च्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतले. छोटेसे घर अन् कपड्यापासून सारेच सामान घरात असल्याने घरातील साहित्य पेटले. सोनूला वाचविण्याच्या प्रयत्नात दर्शनाच्या अंगावरील कपड्यानेही पेट घेतला अन् काही वेळेतच दोघांचाही कोळसा झाला. सर्वांग पेटल्यामुळे दर्शना आणि सोनू जिवाच्या आकांताने किंकाळू लागले. ते ऐकून बाजूलाच झोपलेला त्यांचा नऊ वर्षीय शौर्य नामक मुलगा जागा झाला. त्याने आतून लावून असलेली दाराची कडी उघडली अन् जळणाऱ्या आई वडिलांवर बादलीतील पाणी फेकून त्यांना विझविण्याचे प्रयत्न केले. आरडाओरड ऐकून शेजारी राहणारे पृथ्वीराज सोपान पाटील यांनी धाव घेतली. त्यांनीही दर्शना आणि सोनूला विझविण्याचे प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत ते गंभीर जखमी झाले होते. घरही जळाले होते. पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून कोराडीच्या पोलीस उपनिरीक्षक योगिता तराळे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धावल्या. त्यांनी नितनवरे दाम्पत्याला रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. गुरुवारी सकाळपर्यंत नितनवरे दाम्पत्याचे घर हसते खेळते होते. नवरा बायको अन् मुलगा असे छोटे मात्र सुखी कुटुंब म्हणून त्यांच्याकडे शेजारी बघत होते. मात्र, दोघांच्याही अविवेकीपणामुळे या घराची राखरांगोळी झाली. आई वडील दोघांचाही मृत्यू झाल्याने शौर्य पोरका झाला.(प्रतिनिधी)