शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

पती-पत्नीने जाळून घेतले, दोघांचाही मृत्यू

By admin | Updated: March 11, 2017 02:38 IST

रोज रोज होणाऱ्या वादाचा भडका उडाल्यामुळे एकमेकांच्या रागावर पती-पत्नीने जाळून घेतले.

नागपूर : रोज रोज होणाऱ्या वादाचा भडका उडाल्यामुळे एकमेकांच्या रागावर पती-पत्नीने जाळून घेतले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. दर्शना (वय ३१) आणि सोनू लक्ष्मणराव नितनवरे (वय ३५) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. शेजाऱ्यांची वेळीच मदत मिळाल्यामुळे त्यांचा नऊ वर्षांचा मुलगा बचावला. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी मध्यरात्री ही थरारक घटना घडली. कोराडीच्या सेक्टर २९ मधील श्रीकृष्ण धाम, वॉक्स कूलर परिसरात राहणाऱ्या सोनूचे घरीच छोटेसे किराणा दुकान होते. घरी गाई आणि शेळ्याही होत्या. पत्नी दर्शना किराणा दुकान सांभाळायची तर सोनू दुधाचा व्यवसाय करायचा. घरची स्थिती चांगली असूनही सोनू दिवसभर कष्ट करायचा. मात्र, त्याला दारूचे व्यसन होते. रोजच त्याला दारू प्यायला लागत होती. तो दारू पिऊन घरी आल्यानंतर पती-पत्नीत वाद व्हायचा. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी सोनूने शेळ्या चरायला सोडल्या. त्याच्या घराच्या बाजूलाच रेल्वेलाईन आहे. रेल्वे रुळावरून जात असलेल्या एका शेळीला रेल्वेगाडीने चिरडले. ते पाहून सोनू दुखावला. त्या अवस्थेत त्याने दुपारीच दारू घेतली. त्यावरून पुन्हा पती-पत्नीत वाद झाला. रात्री रागाच्या भरात सोनूने पुन्हा दारू घेतली अन् त्यानंतर पती-पत्नीत कडाक्याचे भांडण झाले. रोज रोज होणारी कटकट संपविण्यासाठी सोनूने स्वत:च्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतले. छोटेसे घर अन् कपड्यापासून सारेच सामान घरात असल्याने घरातील साहित्य पेटले. सोनूला वाचविण्याच्या प्रयत्नात दर्शनाच्या अंगावरील कपड्यानेही पेट घेतला अन् काही वेळेतच दोघांचाही कोळसा झाला. सर्वांग पेटल्यामुळे दर्शना आणि सोनू जिवाच्या आकांताने किंकाळू लागले. ते ऐकून बाजूलाच झोपलेला त्यांचा नऊ वर्षीय शौर्य नामक मुलगा जागा झाला. त्याने आतून लावून असलेली दाराची कडी उघडली अन् जळणाऱ्या आई वडिलांवर बादलीतील पाणी फेकून त्यांना विझविण्याचे प्रयत्न केले. आरडाओरड ऐकून शेजारी राहणारे पृथ्वीराज सोपान पाटील यांनी धाव घेतली. त्यांनीही दर्शना आणि सोनूला विझविण्याचे प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत ते गंभीर जखमी झाले होते. घरही जळाले होते. पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून कोराडीच्या पोलीस उपनिरीक्षक योगिता तराळे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धावल्या. त्यांनी नितनवरे दाम्पत्याला रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. गुरुवारी सकाळपर्यंत नितनवरे दाम्पत्याचे घर हसते खेळते होते. नवरा बायको अन् मुलगा असे छोटे मात्र सुखी कुटुंब म्हणून त्यांच्याकडे शेजारी बघत होते. मात्र, दोघांच्याही अविवेकीपणामुळे या घराची राखरांगोळी झाली. आई वडील दोघांचाही मृत्यू झाल्याने शौर्य पोरका झाला.(प्रतिनिधी)