शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

पुस्तके भांडारात पडून, वाहतूकदार गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:11 IST

नागपूर : पहिले शैक्षणिक सत्र आता संपायला आले आहे. पण सर्व शिक्षा अभियानातून विद्यार्थ्यांना मिळणारी मोफत पाठ्यपुस्तके अजूनही ...

नागपूर : पहिले शैक्षणिक सत्र आता संपायला आले आहे. पण सर्व शिक्षा अभियानातून विद्यार्थ्यांना मिळणारी मोफत पाठ्यपुस्तके अजूनही मिळालेली नाही. पुस्तके केंद्र शाळेपर्यंत पोहचविण्यासाठी शिरीष कार्गो सर्व्हिसेस प्रा.लि. मुंबई या पुरवठादाराला राज्यभरात पुस्तके पोहचविण्यासाठी चार कोटी रुपयांचे कंत्राट दिले होते. पण कंत्राटदार गुल झाला असून, ७० टक्के पुस्तके अजूनही भांडारात पडून आहेत. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांची पुस्तकांसाठी ओरड सुरू झाली आहे.

विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक योजनेतील पुस्तके पोहचविलेली नाही, अशा तक्रारी संपूर्ण राज्यातून येत आहेत. नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यातून ८ लाख पाठ्यपुस्तकांची मागणी बालभारतीकडे करण्यात आली होती. तालुक्यात १०० टक्के पुस्तके पोहचली आहेत. पण तालुक्यावरून केंद्रशाळेत अजूनही पुस्तके पोहचलेली नसल्याची माहिती आहे. शहरांमध्ये अजूनही पाठ्यपुस्तके पोहचलीच नसल्याची ओरड होत आहे. काही शाळांनी मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांकडून जुनी पुस्तके घेऊन विद्यार्थ्यांना दिली आहेत. पण अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी पुस्तकेच परत केली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण पाठ्यपुस्तकाविनाच सुरू आहे.

- असा ठरला पुस्तकाच्या वाहतुकीचा दर

कंत्राटानुसार बालभारती भांडार ते तालुकास्तरापर्यंत पुस्तके पोहचविण्यासाठी प्रति मेट्रिक टन प्रतिकिलोमीटर ११.७५ रुपये दर निश्चित करण्यात आला. तर तालुकास्तरापासून केंद्र शाळेपर्यंत प्रतिकिलोग्रॅम दर १.२० रुपये निश्चित करण्यात आला. १ जून रोजी हा करार झाला असून, पुस्तके कधीपर्यंत पोहचावी, यासंदर्भात कालावधी निश्चित दिलेला नाही.

- कंत्राटदाराकडे वाहने नाही, काम करणारे मजूर नाही

यापूर्वी पुस्तके तालुकास्तरावर पोहचली की बीईओ गाडी करून पुस्तके शाळेपर्यंत पोहचवीत होते. त्यासाठीचा वाहतुकीचा खर्च शिक्षण विभाग बीईओंना देत होता. परंतु यावेळी बालभारतीच्या भांडारापासून केंद्र शाळेपर्यंत पुस्तके पोहचविण्याचे कंत्राट राज्यस्तरावरून झाला. अशात कंत्राटदाराकडे तालुकास्तरावरून केंद्रशाळेत पुस्तके पोहचविण्यासाठी यंत्रणाच नाही. त्याच्याकडे वाहने उपलब्ध नाही. काम करणारे मजूर नाही. त्यामुळे ग्रामीण भागात पुस्तके तालुक्याच्या ठिकाणीच पडून आहेत. सर्वच बीईओंनी कंत्राटदारांना पुस्तके का पोहचली नाही, यासंदर्भात कंत्राटदाराला पत्रही दिले आहे. शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे व कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षण धोक्यात आले आहे. यावर्षी कंत्राटदाराला शाळेपर्यंत पुस्तके पोहचविण्याचा कंत्राट का देण्यात आला? हे देखील संशयास्पद आहे. यामागे अधिकारी व कंत्राटदारामध्ये नफेखोरी झाल्याचेच दिसते आहे. आधीच विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणामुळे शिक्षणाच्या मूळ प्रवाहापासून दूर जात आहेत व त्यात तीन महिन्यापासून विद्यार्थ्यांकडे पुस्तकेच पोहचली नाही, दुर्दैव आहे.

अनिल शिवणकर, पूर्व विदर्भ संयोजक, भाजप शिक्षक आघाडी