शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांकडून जमा केलेली पुस्तके परत करावी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:06 IST

नागपूर : शासनाच्या शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांकडे असलेली मागील वर्षीची शिल्लक पुस्तके शाळेत जमा करण्यात आली होती. परंतु ...

नागपूर : शासनाच्या शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांकडे असलेली मागील वर्षीची शिल्लक पुस्तके शाळेत जमा करण्यात आली होती. परंतु आता विद्यार्थ्यांकडून पाठ्यपुस्तके परत घेऊ नयेत, अशी घोषणा शिक्षणमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे कालपर्यंत विद्यार्थ्यांकडून शाळेत जमा केलेली पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना परत करावी लागणार असून, शिक्षणमंत्र्यांच्या या घोषणेमुळे शिक्षण विभागात सावळागोंधळ असल्याचे दिसून येत आहे.

मागील संपूर्ण सत्रभर शाळा सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांकडील चांगल्या स्थितीतील पाठ्यपुस्तके परत घेऊन परत आलेली पाठ्यपुस्तके वजा करून नवीन शैक्षणिक सत्राकरिता पाठ्यपुस्तकांची मागणी करण्याचे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांकडून पाठ्यपुस्तके परत घेण्यात आली. जवळपास चाळीस ते पन्नास टक्के विद्यार्थ्यांनी जुनी पाठ्यपुस्तके शाळेत जमा केली. तेवढी संख्या वजा करून मुख्याध्यापकांनी चालू शैक्षणिक सत्रासाठी नवीन पाठ्यपुस्तकांची मागणी केली; आणि आता सेतू वर्गाचे कारण देत पुस्तके परत न घेण्याची घोषणा शिक्षणमंत्र्यांकडून करण्यात आली.

त्यामुळे विद्यार्थ्यांकडून जमा केलेली पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना परत करावी लागणार आहेत. शिवाय नवीन मागणी कमी करण्यात आल्याने नवीन पाठ्यपुस्तके किती प्रमाणात मिळणार, अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे कोरोनाच्या काळात पालक व विद्यार्थ्यांना एकाच कामासाठी वारंवार शाळेत बोलावणे ही बाब अत्यंत चुकीची व अप्रासंगिक आहे. पालकांचीसुद्धा नाराजी आहे.

- सेतू वर्गातील अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना ही पाठ्यपुस्तके साहाय्यभूत ठरणार आहेत ही बाब खरी आहे. परंतु शासनाच्या धरसोड निर्णयामुळे आधी जमा केलेली पाठ्यपुस्तके पुन्हा विद्यार्थ्यांना परत करावी लागणार आहेत. हा निर्णय स्थानिक यंत्रणा व शिक्षकांवर ताण वाढवणारा व गोंधळात टाकणारा आहे.

लीलाधर ठाकरे, जिल्हाध्यक्ष,

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा नागपूर