शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

विद्यार्थ्यांकडून जमा केलेली पुस्तके परत करावी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:06 IST

नागपूर : शासनाच्या शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांकडे असलेली मागील वर्षीची शिल्लक पुस्तके शाळेत जमा करण्यात आली होती. परंतु ...

नागपूर : शासनाच्या शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांकडे असलेली मागील वर्षीची शिल्लक पुस्तके शाळेत जमा करण्यात आली होती. परंतु आता विद्यार्थ्यांकडून पाठ्यपुस्तके परत घेऊ नयेत, अशी घोषणा शिक्षणमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे कालपर्यंत विद्यार्थ्यांकडून शाळेत जमा केलेली पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना परत करावी लागणार असून, शिक्षणमंत्र्यांच्या या घोषणेमुळे शिक्षण विभागात सावळागोंधळ असल्याचे दिसून येत आहे.

मागील संपूर्ण सत्रभर शाळा सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांकडील चांगल्या स्थितीतील पाठ्यपुस्तके परत घेऊन परत आलेली पाठ्यपुस्तके वजा करून नवीन शैक्षणिक सत्राकरिता पाठ्यपुस्तकांची मागणी करण्याचे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांकडून पाठ्यपुस्तके परत घेण्यात आली. जवळपास चाळीस ते पन्नास टक्के विद्यार्थ्यांनी जुनी पाठ्यपुस्तके शाळेत जमा केली. तेवढी संख्या वजा करून मुख्याध्यापकांनी चालू शैक्षणिक सत्रासाठी नवीन पाठ्यपुस्तकांची मागणी केली; आणि आता सेतू वर्गाचे कारण देत पुस्तके परत न घेण्याची घोषणा शिक्षणमंत्र्यांकडून करण्यात आली.

त्यामुळे विद्यार्थ्यांकडून जमा केलेली पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना परत करावी लागणार आहेत. शिवाय नवीन मागणी कमी करण्यात आल्याने नवीन पाठ्यपुस्तके किती प्रमाणात मिळणार, अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे कोरोनाच्या काळात पालक व विद्यार्थ्यांना एकाच कामासाठी वारंवार शाळेत बोलावणे ही बाब अत्यंत चुकीची व अप्रासंगिक आहे. पालकांचीसुद्धा नाराजी आहे.

- सेतू वर्गातील अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना ही पाठ्यपुस्तके साहाय्यभूत ठरणार आहेत ही बाब खरी आहे. परंतु शासनाच्या धरसोड निर्णयामुळे आधी जमा केलेली पाठ्यपुस्तके पुन्हा विद्यार्थ्यांना परत करावी लागणार आहेत. हा निर्णय स्थानिक यंत्रणा व शिक्षकांवर ताण वाढवणारा व गोंधळात टाकणारा आहे.

लीलाधर ठाकरे, जिल्हाध्यक्ष,

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा नागपूर