शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

विद्यार्थ्यांकडून जमा केलेली पुस्तके परत करावी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:06 IST

नागपूर : शासनाच्या शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांकडे असलेली मागील वर्षीची शिल्लक पुस्तके शाळेत जमा करण्यात आली होती. परंतु ...

नागपूर : शासनाच्या शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांकडे असलेली मागील वर्षीची शिल्लक पुस्तके शाळेत जमा करण्यात आली होती. परंतु आता विद्यार्थ्यांकडून पाठ्यपुस्तके परत घेऊ नयेत, अशी घोषणा शिक्षणमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे कालपर्यंत विद्यार्थ्यांकडून शाळेत जमा केलेली पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना परत करावी लागणार असून, शिक्षणमंत्र्यांच्या या घोषणेमुळे शिक्षण विभागात सावळागोंधळ असल्याचे दिसून येत आहे.

मागील संपूर्ण सत्रभर शाळा सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांकडील चांगल्या स्थितीतील पाठ्यपुस्तके परत घेऊन परत आलेली पाठ्यपुस्तके वजा करून नवीन शैक्षणिक सत्राकरिता पाठ्यपुस्तकांची मागणी करण्याचे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांकडून पाठ्यपुस्तके परत घेण्यात आली. जवळपास चाळीस ते पन्नास टक्के विद्यार्थ्यांनी जुनी पाठ्यपुस्तके शाळेत जमा केली. तेवढी संख्या वजा करून मुख्याध्यापकांनी चालू शैक्षणिक सत्रासाठी नवीन पाठ्यपुस्तकांची मागणी केली; आणि आता सेतू वर्गाचे कारण देत पुस्तके परत न घेण्याची घोषणा शिक्षणमंत्र्यांकडून करण्यात आली.

त्यामुळे विद्यार्थ्यांकडून जमा केलेली पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना परत करावी लागणार आहेत. शिवाय नवीन मागणी कमी करण्यात आल्याने नवीन पाठ्यपुस्तके किती प्रमाणात मिळणार, अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे कोरोनाच्या काळात पालक व विद्यार्थ्यांना एकाच कामासाठी वारंवार शाळेत बोलावणे ही बाब अत्यंत चुकीची व अप्रासंगिक आहे. पालकांचीसुद्धा नाराजी आहे.

- सेतू वर्गातील अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना ही पाठ्यपुस्तके साहाय्यभूत ठरणार आहेत ही बाब खरी आहे. परंतु शासनाच्या धरसोड निर्णयामुळे आधी जमा केलेली पाठ्यपुस्तके पुन्हा विद्यार्थ्यांना परत करावी लागणार आहेत. हा निर्णय स्थानिक यंत्रणा व शिक्षकांवर ताण वाढवणारा व गोंधळात टाकणारा आहे.

लीलाधर ठाकरे, जिल्हाध्यक्ष,

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा नागपूर