शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
5
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
6
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
7
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
8
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
9
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
10
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
11
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
12
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
13
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
14
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
15
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
16
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
18
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
19
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
20
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

विद्यार्थ्यांकडून जमा केलेली पुस्तके परत करावी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:06 IST

नागपूर : शासनाच्या शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांकडे असलेली मागील वर्षीची शिल्लक पुस्तके शाळेत जमा करण्यात आली होती. परंतु ...

नागपूर : शासनाच्या शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांकडे असलेली मागील वर्षीची शिल्लक पुस्तके शाळेत जमा करण्यात आली होती. परंतु आता विद्यार्थ्यांकडून पाठ्यपुस्तके परत घेऊ नयेत, अशी घोषणा शिक्षणमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे कालपर्यंत विद्यार्थ्यांकडून शाळेत जमा केलेली पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना परत करावी लागणार असून, शिक्षणमंत्र्यांच्या या घोषणेमुळे शिक्षण विभागात सावळागोंधळ असल्याचे दिसून येत आहे.

मागील संपूर्ण सत्रभर शाळा सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांकडील चांगल्या स्थितीतील पाठ्यपुस्तके परत घेऊन परत आलेली पाठ्यपुस्तके वजा करून नवीन शैक्षणिक सत्राकरिता पाठ्यपुस्तकांची मागणी करण्याचे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांकडून पाठ्यपुस्तके परत घेण्यात आली. जवळपास चाळीस ते पन्नास टक्के विद्यार्थ्यांनी जुनी पाठ्यपुस्तके शाळेत जमा केली. तेवढी संख्या वजा करून मुख्याध्यापकांनी चालू शैक्षणिक सत्रासाठी नवीन पाठ्यपुस्तकांची मागणी केली; आणि आता सेतू वर्गाचे कारण देत पुस्तके परत न घेण्याची घोषणा शिक्षणमंत्र्यांकडून करण्यात आली.

त्यामुळे विद्यार्थ्यांकडून जमा केलेली पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना परत करावी लागणार आहेत. शिवाय नवीन मागणी कमी करण्यात आल्याने नवीन पाठ्यपुस्तके किती प्रमाणात मिळणार, अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे कोरोनाच्या काळात पालक व विद्यार्थ्यांना एकाच कामासाठी वारंवार शाळेत बोलावणे ही बाब अत्यंत चुकीची व अप्रासंगिक आहे. पालकांचीसुद्धा नाराजी आहे.

- सेतू वर्गातील अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना ही पाठ्यपुस्तके साहाय्यभूत ठरणार आहेत ही बाब खरी आहे. परंतु शासनाच्या धरसोड निर्णयामुळे आधी जमा केलेली पाठ्यपुस्तके पुन्हा विद्यार्थ्यांना परत करावी लागणार आहेत. हा निर्णय स्थानिक यंत्रणा व शिक्षकांवर ताण वाढवणारा व गोंधळात टाकणारा आहे.

लीलाधर ठाकरे, जिल्हाध्यक्ष,

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा नागपूर