शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

कोवळ्या वयातच बोन मॅरो रोपण आवश्यक

By admin | Updated: May 8, 2017 02:25 IST

सिकलसेल, थॅलसेमिया या गंभीर आजारावर ‘बोन मॅरो रोपण’ हा यशस्वी उपचार आहे. संबंधित रुग्णास

विक्रम मॅथ्यूस : थॅलसेमिया व सिकलसेलवर राष्ट्रीय परिसंवाद लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सिकलसेल, थॅलसेमिया या गंभीर आजारावर ‘बोन मॅरो रोपण’ हा यशस्वी उपचार आहे. संबंधित रुग्णास त्याच्याशी जुळणारा स्टेमसेल दाता उपलब्ध झाल्यास, त्याला नवे आयुष्य मिळू शकते. परंतु कोवळ्या वयात म्हणजे सात वर्षाच्या आत हे प्रत्यारोपण केल्यास याचा यशाचा दर ९० ते ९५ टक्के असतो. यामुळे पालकांनी याला गंभीरतेने घ्यायला हवे, अशी माहिती प्रसिद्ध बोन मॅरो प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. विक्रम मॅथ्यूस यांनी येथे दिली. थॅलसेमिया व सिकलसेल सेंटर व इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी एका हॉटेलमध्ये थॅलसेमिया व सिकलसेलवर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मुख्य वक्ता म्हणून बोलत होते. परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी खा. डॉ. विकास महात्मे, आ. डॉ. मिलिंद माने, थॅलसेमिया व सिकलसेल सेंटरचे संचालक डॉ. विंकी रुघवानी, ‘आयएमए’चे सचिव डॉ. प्रशांत राठी, बालरोग तज्ज्ञ डॉ. दीप्ती जैन व डॉ. हरीश वरभे उपस्थित होते. डॉ. मॅथ्यूस म्हणाले, थॅलसेमियाच्या रुग्णाला दर महिन्याला नवे रक्त द्यावे लागते. त्यामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण वाढते. ते नियंत्रित करण्यासाठी औषधे घ्यावी लागतात. या आजारावर कायमचा पर्याय म्हणून बोन मॅरोचे रोपण आहे. परंतु तंतोतंत जुळणारा बोन मॅरो मिळणे अवघड असते म्हणून स्वत:हून बोन मॅरो दाते सामोर येणे आवश्यक झाले आहे. अलीकडच्या काळात असाध्य रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ‘स्टेम सेल’ थेरपी महत्त्वाची मानली जाते. परंतु अद्यापही ही थेरपी संशोधनाच्या कक्षातच आहे. यामुळे रुग्ण व नातेवाईकांनी याच्या भूलथापांना बळी पडू नये, असेही ते म्हणाले. आ. डॉ. मिलिंद माने म्हणाले, सिकलसेल या गंभीर आजाराबाबत शासनाने अनेक निर्णय घेतले आहे. परंतु प्रशासकीय अडचणीमुळे काही निर्णय अमलात आले नाही. याचा फटका केवळ रुग्णालाच बसत नाही तर यासाठी धडपड करणाऱ्या लोकप्रतिनिधींनाही बसतो. अशावेळी रुग्ण, नातेवाईक व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन त्याकडे लक्ष वेधण्याची गरज आहे. खा. डॉ. विकास महात्मे म्हणाले, सिकलसेल, थॅलसेमिया रुग्णांच्या समस्या चर्चा करून सोडविणे शक्य आहे. हे दोन्ही आजार टाळता येतात. लग्नापूर्वी रक्ताची तपासणी करून थॅलसेमिया व सिकलसेल असण्याची शक्यता पडताळून पाहिल्यास या आजाराला प्रतिबंध बसेल. असेही ते म्हणाले. प्रास्ताविक डॉ. विंकी रुघवानी यांनी केले. ते म्हणाले, गेल्या दोन वर्षात सरकारकडून थॅलसेमिया व सिकलसेलच्या रुग्णांना आवश्यक मदत मिळत आहे. विशेषत: मुख्यमंत्री सहायता निधीतून २७ रुग्णांना बोन मॅरो प्रत्यारोपणासाठी प्रत्येकी तीन लाखांची मदत मिळाली आहे. परंतु रुग्णांना मिळणाऱ्या नि:शुल्क औषधांमध्ये खंड पडणार नाही याकडेही सरकारने लक्ष देणे व मोफत बससेवा योजना सुरू करणे आवश्यक आहे. संचालन वैशाली बागडे व सोनल ठक्कर यांनी केले तर आभार डॉ. प्रशांत राठी यांनी मानले. दुसऱ्या सत्रात डॉ. वरभे, डॉ. जैन व डॉ. रुघवानी यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला सिकलसेल सोसायटी आॅफ इंडियाचे अध्यक्ष संपत रामटेके, प्रताप मोटवानी, यांच्यासह मोठ्या संख्येत सिकलसेल, थॅलसेमियाचे रुग्ण व त्यांचे पालक उपस्थित होते.