शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोवळ्या वयातच बोन मॅरो रोपण आवश्यक

By admin | Updated: May 8, 2017 02:25 IST

सिकलसेल, थॅलसेमिया या गंभीर आजारावर ‘बोन मॅरो रोपण’ हा यशस्वी उपचार आहे. संबंधित रुग्णास

विक्रम मॅथ्यूस : थॅलसेमिया व सिकलसेलवर राष्ट्रीय परिसंवाद लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सिकलसेल, थॅलसेमिया या गंभीर आजारावर ‘बोन मॅरो रोपण’ हा यशस्वी उपचार आहे. संबंधित रुग्णास त्याच्याशी जुळणारा स्टेमसेल दाता उपलब्ध झाल्यास, त्याला नवे आयुष्य मिळू शकते. परंतु कोवळ्या वयात म्हणजे सात वर्षाच्या आत हे प्रत्यारोपण केल्यास याचा यशाचा दर ९० ते ९५ टक्के असतो. यामुळे पालकांनी याला गंभीरतेने घ्यायला हवे, अशी माहिती प्रसिद्ध बोन मॅरो प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. विक्रम मॅथ्यूस यांनी येथे दिली. थॅलसेमिया व सिकलसेल सेंटर व इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी एका हॉटेलमध्ये थॅलसेमिया व सिकलसेलवर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मुख्य वक्ता म्हणून बोलत होते. परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी खा. डॉ. विकास महात्मे, आ. डॉ. मिलिंद माने, थॅलसेमिया व सिकलसेल सेंटरचे संचालक डॉ. विंकी रुघवानी, ‘आयएमए’चे सचिव डॉ. प्रशांत राठी, बालरोग तज्ज्ञ डॉ. दीप्ती जैन व डॉ. हरीश वरभे उपस्थित होते. डॉ. मॅथ्यूस म्हणाले, थॅलसेमियाच्या रुग्णाला दर महिन्याला नवे रक्त द्यावे लागते. त्यामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण वाढते. ते नियंत्रित करण्यासाठी औषधे घ्यावी लागतात. या आजारावर कायमचा पर्याय म्हणून बोन मॅरोचे रोपण आहे. परंतु तंतोतंत जुळणारा बोन मॅरो मिळणे अवघड असते म्हणून स्वत:हून बोन मॅरो दाते सामोर येणे आवश्यक झाले आहे. अलीकडच्या काळात असाध्य रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ‘स्टेम सेल’ थेरपी महत्त्वाची मानली जाते. परंतु अद्यापही ही थेरपी संशोधनाच्या कक्षातच आहे. यामुळे रुग्ण व नातेवाईकांनी याच्या भूलथापांना बळी पडू नये, असेही ते म्हणाले. आ. डॉ. मिलिंद माने म्हणाले, सिकलसेल या गंभीर आजाराबाबत शासनाने अनेक निर्णय घेतले आहे. परंतु प्रशासकीय अडचणीमुळे काही निर्णय अमलात आले नाही. याचा फटका केवळ रुग्णालाच बसत नाही तर यासाठी धडपड करणाऱ्या लोकप्रतिनिधींनाही बसतो. अशावेळी रुग्ण, नातेवाईक व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन त्याकडे लक्ष वेधण्याची गरज आहे. खा. डॉ. विकास महात्मे म्हणाले, सिकलसेल, थॅलसेमिया रुग्णांच्या समस्या चर्चा करून सोडविणे शक्य आहे. हे दोन्ही आजार टाळता येतात. लग्नापूर्वी रक्ताची तपासणी करून थॅलसेमिया व सिकलसेल असण्याची शक्यता पडताळून पाहिल्यास या आजाराला प्रतिबंध बसेल. असेही ते म्हणाले. प्रास्ताविक डॉ. विंकी रुघवानी यांनी केले. ते म्हणाले, गेल्या दोन वर्षात सरकारकडून थॅलसेमिया व सिकलसेलच्या रुग्णांना आवश्यक मदत मिळत आहे. विशेषत: मुख्यमंत्री सहायता निधीतून २७ रुग्णांना बोन मॅरो प्रत्यारोपणासाठी प्रत्येकी तीन लाखांची मदत मिळाली आहे. परंतु रुग्णांना मिळणाऱ्या नि:शुल्क औषधांमध्ये खंड पडणार नाही याकडेही सरकारने लक्ष देणे व मोफत बससेवा योजना सुरू करणे आवश्यक आहे. संचालन वैशाली बागडे व सोनल ठक्कर यांनी केले तर आभार डॉ. प्रशांत राठी यांनी मानले. दुसऱ्या सत्रात डॉ. वरभे, डॉ. जैन व डॉ. रुघवानी यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला सिकलसेल सोसायटी आॅफ इंडियाचे अध्यक्ष संपत रामटेके, प्रताप मोटवानी, यांच्यासह मोठ्या संख्येत सिकलसेल, थॅलसेमियाचे रुग्ण व त्यांचे पालक उपस्थित होते.