शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

बोर्डाच्या परीक्षा ठरलेल्या वेळेवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य शिक्षण मंडळातर्फे १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे ओळखपत्र ३ एप्रिल रोजी जारी केले जाईल. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य शिक्षण मंडळातर्फे १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे ओळखपत्र ३ एप्रिल रोजी जारी केले जाईल. विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयातून आपापले ओळखपत्र (आयकार्ड) घ्यावे लागेल. यासंदर्भात बोर्डाने महाविद्यालयांना पत्रसुद्धा जारी केले आहे. या निर्णयामुळे आता १० वी व १२ वीच्या परीक्षा ठरलेल्या वेळेवरच होतील. कुठल्याही परिस्थितीत परीक्षा पुढे ढकलल्या जाणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.

राज्यात कोविड संक्रमणाची परिस्थिती पाहता १० वी व १२ वीच्या परीक्षा स्थगित कराव्या लागतील, असे मानले जात होते. कोरोना संक्रमणामुळे नागपूरसोबतच राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नाशिक आदी जिल्ह्यातही सातत्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. यासोबतच मृत्यूची संख्याही वाढत आहे. त्यामुळे काही पालक संघटनांनी बोर्डाकडे परिस्थितीचा आढावा घेऊनच परीक्षा घेण्यासंदर्भात निर्णय घेण्याची मागणी केली होती. परंतु बोर्डाचे आयकार्ड जारी झाल्यामुळे आता परीक्षा वेळेवरच होतील, हे स्पष्ट झाले आहे. आयकार्ड डाऊनलोड करून विद्यार्थ्यांना त्याची प्रिंट देण्यात यावी, असे आदेशही बोर्डाने महाविद्यालयांना दिले आहेत. आता हे महाविद्यालयांवर अवलंबून आहे की ते विद्यार्थ्यांना आयकार्ड कधी देतील. परंतु परीक्षेपूर्वी आयकार्ड देण्याच्या सूचना आहेत. यासंदर्भात नागपूर विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेणे अतिशय कठीण आहे. कारण परीक्षेत एका विभागातील दोन ते अडीच लाख विद्यार्थी सहभागी होत असतात. परीक्षा स्थगित केल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होईल. १२ वीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेनंतर विविध प्रवेश परीक्षांची तयारी करावी लागते. बोर्ड परीक्षा स्थगित झाल्याने किंवा पुढे ढकलल्या गेल्याने विद्यार्थ्यांचे नियोजन बिघडेल. अनावश्यक परीक्षेचा तणाव वाढेल. परीक्षा सुरू होईपर्यंत कोरोनाचे संक्रमण बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आलेले असेल, असा अधिकाऱ्यांना विश्वास आहे.