शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

भाजपा १७५ जागा जिंकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:16 IST

केंद्र व राज्य सरकार लोकहिताचे काम करीत आहे. जनता सरकारवर खूश आहे. भाजपातर्फे नुकतेच राज्यात एक सर्वेक्षण करण्यात आले.

ठळक मुद्देसर्वेक्षण केल्याचा बावनकुळेंचा खुलासा फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री भाजपा शहर कार्यकारिणी बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र व राज्य सरकार लोकहिताचे काम करीत आहे. जनता सरकारवर खूश आहे. भाजपातर्फे नुकतेच राज्यात एक सर्वेक्षण करण्यात आले. यात भाजपाला तब्बल १७५ जागा मिळत असल्याचे समोर आले आहे, असा खुलासा करीत देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा दावा ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.भाजपाच्या नाागपूर शहर कार्यकारिणीची बैठक पूर्व लक्ष्नीनगरातील मैदानावर रविवारी सकाळी सुरू झाली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्घाटन केले. यावेळी शहर अध्यक्ष आ. सुुधाकर कोहळे, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, खा.अजय संचेती, आ. सुधाकर देशमुख, आ.कृष्णा खोपडे,आ. डॉ. मिलिंद माने, आ. अनिल सोले, आ. गिरीश व्यास, आ. विकास कुंभारे, महापौर नंदा जिचकार, श्रीकांत देशपांडे, शहर महामंत्री संदीप जोशी, संदीप जाधव, भोजराज डुंबे, माजी महापौर अर्चना डेहनकर आदी उपस्थित होते. यावेळी बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांसमक्ष भाजपातर्फे करण्यात आलेल्या गुप्त सर्वेक्षणाचा खुलासा करताच कार्यकर्त्यांनी गडकरी- फडणवीसांचा जयघोष केला. बावनकुळे म्हणाले, राज्यातच नव्हे तर केंद्रातही पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार येणार आहे. नागपुरात नितीन गडकरी यांचा विजयरथ थांबविणे कठीण आहे. भाजपा केंद्रात ३९९ जागा जिंकणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ३५ हजार कोटींची कर्जमाफी केली आहे. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. विरोधक शेतकºयांची दिशाभूल करू पाहत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सरकारने घेतलेले निर्णय शेतकरी व जनतेसमोर मांडण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.कोर्टाचे निर्णय जनतेला सांगाडीजे वाजवू नका, महामार्गापासून दारूची दुकाने ५०० मीटरपेक्षा जास्त अंतरावर हवीत, असे काही निर्णय न्यायालयाने घेतले आहेत. नंतर न्यायालयानेच त्यातून मार्ग काढले. मात्र, या निर्णयांमुळे जनतेत सरकारविषयी रोष निर्माण होतो. अशावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन यात सरकारची चूक नाही हे जनतेला पटवून द्यावे, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.ंमोदी, गडकरी, फडणवीस यांचे अभिनंदनकार्यकारिणीच्याा पहिल्या सत्रात आ. सुधाकर देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंंदनाचा प्रस्ताव मांडला. मुख्यमंत्र्यांंनी शेतकºयांसाठी जाहीर केलेली कर्जमाफी, घेतलेले लोकोपयोगी निर्णय, राज्यात आणलेली गुंतवणूक आदी बाबींसाठी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्यात आले. दुसºया सत्रात खा. अजय संचेती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्याला आ. अनिल सोले व आ. डॉ. मिलिंद माने यांनी अनुमोदन दिले. तर समारोपीय सत्रात शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. गडकरी यांनी भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्रालयाच्या माध्यमातून देशाला विकासाची दिशा दिली. त्यांच्या कामामुळे पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्याकडे जलसंपदा मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभारही दिला. त्यांनी नागपूरसह विदर्भाच्या विकासाकडे विशेष लक्ष दिले, असे कोहळे यांनी प्रस्ताव मांडताना सांगितले. सर्व प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आले.पाच बूथवर एक पालक नेमणार : कोहळेशहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांनी प्रास्ताविकातून पक्षसंघटनेचा आढावा मांडला. शहरात १ हजार ७८४ बूथची बांधणी पूर्ण झाली आहेत. बूथवर मतदार याद्या पोहचविण्यात आल्या आहेत. मतदार यादीसाठी पेज प्रमुख नेमणार आहोत. पेज प्रमुखाने त्या पेजवरील मतदारांशी संपर्क सधायचा आहे. याशिवाय प्रत्येक पाच बूथसाठी एक पालक नेमला जाईल. संबंधित पाच बूथचा आढावा हा पालक घेईल व प्रभाग अध्यक्षांकडे सादर करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मतदारांशी संपर्क करणे हाच विजयाचा मूलमंत्र आहे. शहरात ६२ हजार कोटी रुपयांची विकास कामे सुरू आहेत. या कामांचा प्रचार- प्रसार व्हायला हवा. त्यासाठी घरात बसू नका, संपर्क वाढवा, असे आवाहन कोहळे यांनी केले.विधानसभानिहाय आढावा सादरबैठकीत मंडळ अध्यक्षांनी विधानसभानिहाय आढावा सादर केला. मतदारसंघातील प्रत्येक प्रभागाची कार्यकारिणी झाली आहे का, आघाड्यांची रचना झाली का, पक्षातर्फे सहा महिन्यात कोणते कार्यक्रम राबविण्यात आले, आदी माहिती मंडळ अध्यक्षांनी दिली.