शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
4
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
5
अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
6
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
7
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
8
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
9
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
10
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
12
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
13
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
14
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
15
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
16
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
17
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
18
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासारखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
19
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
20
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश

भाजप-सेना, कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे मागासवर्गीयांच्या विरोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर: जुन्या सरकारच्या काळात मागासवर्गीयांना पदोन्नती न देता फक्त खुल्या वर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली. आता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर: जुन्या सरकारच्या काळात मागासवर्गीयांना पदोन्नती न देता फक्त खुल्या वर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली. आता विद्यमान सरकारने ७ मे रोजी आदेश काढत पदोन्नतीतील आरक्षणच संपविले. मागासवर्गीयांना पदोन्नतीत आरक्षण हे संविधानिक असताना ते नाकारण्यात आले. हा मागासवर्गीयांवर अन्याय असून भाजप-सेना आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे सारेच पक्ष मागासवर्गीयांच्या विरोधात आहे, अशी टीका आरक्षण हक्क कृती समितीतर्फे आयोजित संयुक्त पत्रपरिषदेत करण्यात आली.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील मराठा व ओबीसी आरक्षणावर बोलत आहेत. परंतु मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणावर त्यांचे वक्तव्य नाही. सरकारची भूमिकाही दुटप्पी आहे. सर्वोच्च न्यायालयात सरकारने पदोन्नतीत आरक्षणाच्या बाजूने शपथपत्र दिले; परंतु उच्च न्यायालयात त्यांनी याच्या नकारात्मक शपथपत्र दिल्याचे नरेंद्र जारोंडे यांनी सांगितले.

मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील संवैधानिक आरक्षण कायम राहावे, या मागणीसाठी आरक्षण हक्क कृती समितीतर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी २६ जून रोजी राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयांवर आक्रोश मोर्चा काढण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. ७ मे चा आदेश रद्द करून मागासवर्गीयांना पदोन्नतीत आरक्षण लागू करावे, ४.५ सरळ सेवा भरतीतील रिक्त पदांचा अनुशेष भरावा, उच्च शिक्षणासाठी फ्रीशिप लागू करावी, भटक्या विमुक्तांना लागू असलेली क्रिमीलेअरची अट रद्द करावी, ओबीसींना पदोन्नतीत आरक्षण द्यावे, उपसमितीतून अजित पवार यांनी हटवून मागासवर्गीय मंत्र्यांची नेमणूक करावी, आदी मागण्यांसाठी हा माेर्चा संविधान चौक येथून सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे. पत्रपरिषदेला समितीचे निमंत्रक अरुण गाडे,नरेंद्र जारोंडे, कुलदीप रामटेके डॉ. पुरण मेश्राम, डॉ. प्रदीप आगलावे, अशोक सरस्वती, राजन वाघमारे, प्रकाश कुंभे, मधुकर उईके,राहुल परुळकर,सुरेश तामगाडगे, राजेश ढेंगरे आदी उपस्थित होते.