शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

भाजप म्हणते प्रार्थनास्थळे उघडा, बाकी म्हणतात वाट बघा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडावी यासाठी भाजपने राज्यभरात आंदोलन केले. राज्य शासनाने मद्यालयांना परवानगी दिली असताना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडावी यासाठी भाजपने राज्यभरात आंदोलन केले. राज्य शासनाने मद्यालयांना परवानगी दिली असताना श्रावणात शिवालयांत प्रवेशबंदी का असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे, परंतु नागपुरातील इतर प्रमुख पक्षांकडून मात्र मंदिर उघडण्याला विरोध करण्यात येत आहे. सध्या ‘वेट ॲन्ड वॉच’ हीच भूमिका घेणे समाजाच्या हिताचे राहील, असे पक्षनेत्यांचे म्हणणे आहे.

प्रार्थनास्थळे उघडायलाच हवी : भाजप

गेल्या दीड वर्षापासून मंदिर बंद असल्यामुळे मंदिरावर उपजीविका अवलंबून असणाऱ्यांचे रोजगार बंद असल्याने त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. इतर राज्यातील मंदिरे सुरु असून महाराष्ट्रातील मंदिरे मात्र बंद आहेत. एकीकडे सरकारने मद्यालयांना परवानगी दिली आहे. तिकडे गर्दी होत नाही का व ‘कोरोना’चा संसर्ग होत नाही का.

- आ.प्रवीण दटके, शहराध्यक्ष, भाजप

कोरोनाला परतावल्यानंतरच मंदिरे उघडावीत : शिवसेना

शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र पक्षाच्या इतर नेत्यांशी चर्चा केली असता सध्या ‘कोरोना’पासून बचाव महत्त्वाचा असल्याने मंदिरे उघडण्याची आवश्यकता नाही हीच पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच याबाबत भावना मांडल्याने त्यांना शिवसेना नेत्यांचे समर्थनच आहे.

प्रार्थनास्थळे उघडल्यानंतर नुकसान झाले तर : काँग्रेस

प्रार्थनास्थळे उघडावी ही मागणी होत आहे; मात्र प्रार्थनास्थळे उघडल्यानंतर ‘कोरोना’चा संसर्ग वाढला तर समोर येणाऱ्या परिस्थितीला जबाबदार कोण राहणार. प्रार्थनास्थळांचा आडोसा घेऊन केंद्र शासनाचे अपयश लपविण्याचा भाजपकडून प्रयत्न सुरू आहे.

- आ.विकास ठाकरे, शहराध्यक्ष, कॉंग्रेस

देवाला सध्या घरीच पूजावे - राष्ट्रवादी कॉंग्रेस

सध्या सणासुदीचे दिवस असल्याने प्रार्थनास्थळे उघडायला हवी असे अनेकांना वाटते. मात्र स्थिती तशी नाही याची त्यांना जाण आहे. केवळ भाजपकडूनच अशी मागणी होते आहे. ‘कोरोना’चे संकट पाहता लोकांनी काही दिवस घरूनच देवाचे पूजन करणे हिताचे राहील.

- दुनेश्वर पेठे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

हजारो कोटींची उलाढाल ठप्प

श्रावण महिन्यांत श्रावण सोमवारसह विविध सण असतात. याशिवाय अनेक मोठ्या मंदिरांमध्ये लोक दर्शनाला जात असतात; मात्र प्रार्थनास्थळांमध्ये प्रवेशबंदी असल्याने तेथे विक्री करणाऱ्यांचे हाल होत आहेत. शिवाय मंदिरांना मिळणाऱ्या देणग्यांवरदेखील मोठा परिणाम झाला आहे. जर एकूण चित्र पाहिले तर नागपूर व जिल्ह्यात पाचशे कोटींहून अधिकची उलाढाल ठप्प आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. शिवाय पाच हजारांहून अधिक जण बेरोजगार झाले आहेत.