शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

कन्हान-पिपरीत भाजपचा ‘झेंडा’

By admin | Updated: January 20, 2015 01:17 IST

कन्हान - पिपरी नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीचे निकाल सोमवारी दुपारी जाहीर करण्यात आले. त्यात एकूण १७ जागांपैकी भारतीय जनता पक्षाने ११ जागांवर विजय संपादन करीत

नागपूर : कन्हान - पिपरी नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीचे निकाल सोमवारी दुपारी जाहीर करण्यात आले. त्यात एकूण १७ जागांपैकी भारतीय जनता पक्षाने ११ जागांवर विजय संपादन करीत या नगर परिषदेवर स्पष्ट बहुमत मिळविले. शिवसेनेला तीन, काँग्रेसला दोन आणि अपक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. येथील एकूण १७ जागांसाठी रविवारी (दि. १८) मतदान घेण्यात आले. चार प्रभागातील १७ जागांसाठी एकूण ९५ उमेदवारांनी नशीब आजमावले. सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास रामटेक येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या आवारात मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. दुपारी १ वाजताच्या सुमारास निकाल जाहीर करण्यात आले. यात भारतीय जनता पक्षाने ११, शिवसेनेने तीन, काँग्रेसने दोन आणि अपक्षाने एक जागा जिंकली. या नगर परिषदेची ही पहिली निवडणूक असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता.प्रभाग क्रमांक - १ (अ) मधून भाजपच्या अनिता पाटील, प्रभाग क्रमांक - १ (ब) मधून काँग्रेसचे नरेश बर्वे, प्रभाग क्रमांक - १ (क) मधून सुषमा चोपकर आणि प्रभाग क्रमांक - १ (ड) मधून अपक्ष उमेदवार गेंदलाल काठोके विजयी झाले. प्रभाग क्रमांक - २ (अ) मधून भाजपचे शंकर चहांदे, प्रभाग क्रमांक - २ (ब) मधून शिवसेनेच्या वैशाली डोणेकर, प्रभाग क्रमांक - २ (क) मधून भाजपच्या लक्ष्मी लाडेकर आणि प्रभाग क्रमांक - २ (ड) मधून काँग्रेसचे राजेश यादव यांनी बाजी मारली. प्रभाग क्रमांक - ३ (अ) मधून भाजपच्या संगीता खोब्रागडे, प्रभाग क्रमांक - ३ (ब) मधून भाजपच्या राखी पराते, प्रभाग क्रमांक - ३ (क) मधून भाजपचे मनोज कुरडकर आणि प्रभाग क्रमांक - ३ (ड) मधून भाजपचे डॉ. मनोहर पाठक निवडून आले. प्रभाग क्रमांक - ४ (अ) मधून भाजपच्या नितू गजभिये, प्रभाग क्रमांक - ४ (ब) मधून भाजपचे अजय लाखंडे, प्रभाग क्रमांक - ४ (क) मधून शिवसेनेच्या करुणा आष्टनकर आणि प्रभाग क्रमांक - ४ (ड) मधून शिवसेनेचे गणेश भोंगाडे आणि, प्रभाग क्रमांक - ४ (इ) मधून भाजपच्या आशा पनिकर या विजयी झाल्या. सदर निवडणुकीचे निकाल जाहीर होताच सर्व विजयी उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत विजयी जल्लोष केला. भाजप कार्यकर्त्यांनी कन्हानमध्ये मिरवणूक काढून फटाक्यांच्या आतषबाजीत विजयोत्सव केला. (प्रतिनिधी)‘कही खुशी, कही गम’ही नगर परिषदेची पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे निवडणूक रिंगणात एकूण ९५ उमेदवार होते. यात भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यासह अन्य प्रमुख पक्षाचे तसेच अपक्ष उमेदवार उभे होते. यात भाजप, शिवसेना व काँग्रेस हे तीन पक्ष वगळता एकाही पक्षाला त्यांचे खाते उघडता आले नाही. त्यामुळे भाजप, शिवसेना व काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण होते. राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेच्या गोटात मात्र शांतता पसरली होती. या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाचीही मते मिळाली नाही. येथील मतदारांनी केवळ एकमेव अपक्ष उमेदवाराला पसंती दर्शविली. त्यामुळे इतर अपक्षांचा भ्रमनिरास झाला. यावेळी सहा प्रस्थापित नेत्यांना मतदारांनी कौल दिला. यात काँग्रेसचे नरेश बर्वे व राजेश यादव, भाजपचे शंकर चहांदे व डॉ. मनोहर पाठक, शिवसेनेच्या वैशाली शरद डोणेकर व करुणा आष्टनकर यांचा समावेश आहे.