शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

भैयालाल यांच्या अंत्यदर्शनावेळी हळहळले समाजमन

By admin | Updated: January 22, 2017 02:24 IST

भंडारा जिल्ह्याच्या खैरलांजी येथे १२ वर्षापूर्वी भोतमांगे कुटुंबाचे हत्याकांड म्हणजे खोलवर रुजलेल्या जातीवादी मानसिकतेचे दर्शन घडविणारी अमानवीय घटना.

नागपूर : भंडारा जिल्ह्याच्या खैरलांजी येथे १२ वर्षापूर्वी भोतमांगे कुटुंबाचे हत्याकांड म्हणजे खोलवर रुजलेल्या जातीवादी मानसिकतेचे दर्शन घडविणारी अमानवीय घटना. गावातील काही जातीवाद्यांनी भोतमांगे कुटुंबातील चौघांना क्रूरपणे ठार मारले. या हत्याकांडाचा एकमेव साक्षीदार भैयालाल भोतमांगे. त्या घटनेपासून आतापर्यंत न्यायासाठी सतत संघर्ष करीत जगलेल्या भैयालाल यांनी न्याय मिळण्याआधीच जगाचा निरोप घेतला. खैरलांजी हत्याकांडानंतर आरोपींना शिक्षा व्हावी व भोतमांगे कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी झालेल्या विराट आंदोलनाचे केंद्रबिंदू नागपूर ठरले. त्यामुळे अंत्यसंस्कारापूर्वी नागपूरकरांना भैयालाल भोतमांगे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता यावे यासाठी त्यांचे पार्थिव सीताबर्डीच्या आनंद बुद्धविहार येथे ठेवण्यात आले होते़ शनिवारी सकाळी ९.१५ च्या दरम्यान त्यांचे पार्थिव मेडिकल रुग्णालयातून आनंद बुद्धविहारात आणण्यात आले. येथे नागरिक सकाळपासून जड अंतकरणाने उभे होते़ भैयालाल यांचे पार्थिव एक तास विहारात ठेवण्यात आले. त्यावेळी भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्यासह रवी शेंडे, राजन वाघमारे, भैयाजी खैरकर, सचिन मून, अरुण साखरकर, रमेश कांबळे, मायाताई शेंडे, उत्तम शेवळे, नितीन फुलमाळी, दिनेश अंडरसहारे, मानवाधिकार आयोगाचे सी.एम. थुल, राजू लोखंडे, बबलू कडबे, प्रमोद जोंधळे, हेमंत भोतमांगे, तक्षशिला वाघधरे व समता सैनिक दलाच्या महाराष्ट्र महिला अध्यक्षा उज्ज्वला गणवीर प्रामुख्याने उपस्थित होते. आमदार प्रकाश गजभिये यांनीही अंत्यदर्शन घेतले. भंते नागार्जुन सुरई ससाई यांनी वंदना घेतल्यानंतर भैयालाल भोतमांगे यांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रिपब्लिकन गटांचे कार्यकर्ते व शेकडो नागरिकांनी यावेळी भैयालाल यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर १०.३० वाजताच्या दरम्यान त्यांचे पार्थिव भंडाऱ्याकडे रवाना करण्यात आले. (प्रतिनिधी) विशेष वकिलाची व्यवस्था करू : बडोले खैरलांजी हत्याकांडाच्या न्यायासाठी भैयालाल भोतमांगे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. मात्र निर्णय लागण्याआधी त्यांचे निधन होणे ही दु:खद घटना आहे. तरीही समाज आणि सरकार त्यांचा लढा थांबविणार नाही. या प्रकरणात न्यायालयात सुनावणीसाठी सरकारतर्फे विशेष वकिलाची व्यवस्था करण्यात येईल, अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी भैयालाल यांच्या श्रद्धांजली सभेत दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर जातीयता, विषमता व चातुर्वर्ण्य व्यवस्थेविरोधात लढा दिला. मात्र समाजात आजही ही विषमता कायम आहे. खैरलांजी हत्याकांड हे त्याच विषमतेमुळे घडले आणि भैयालाल त्या संघर्षाचे प्रतीक होते. त्यांच्या निधनाने न्यायालयीन लढ्याचे नुकसान झाले आहे. मात्र न्याय मिळेपर्यंत ही लढाई संपणार नाही. पण न्याय पहायला ते आपल्यात नाही, याची खंत वाटत असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.