शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

भैयालाल यांच्या अंत्यदर्शनावेळी हळहळले समाजमन

By admin | Updated: January 22, 2017 02:24 IST

भंडारा जिल्ह्याच्या खैरलांजी येथे १२ वर्षापूर्वी भोतमांगे कुटुंबाचे हत्याकांड म्हणजे खोलवर रुजलेल्या जातीवादी मानसिकतेचे दर्शन घडविणारी अमानवीय घटना.

नागपूर : भंडारा जिल्ह्याच्या खैरलांजी येथे १२ वर्षापूर्वी भोतमांगे कुटुंबाचे हत्याकांड म्हणजे खोलवर रुजलेल्या जातीवादी मानसिकतेचे दर्शन घडविणारी अमानवीय घटना. गावातील काही जातीवाद्यांनी भोतमांगे कुटुंबातील चौघांना क्रूरपणे ठार मारले. या हत्याकांडाचा एकमेव साक्षीदार भैयालाल भोतमांगे. त्या घटनेपासून आतापर्यंत न्यायासाठी सतत संघर्ष करीत जगलेल्या भैयालाल यांनी न्याय मिळण्याआधीच जगाचा निरोप घेतला. खैरलांजी हत्याकांडानंतर आरोपींना शिक्षा व्हावी व भोतमांगे कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी झालेल्या विराट आंदोलनाचे केंद्रबिंदू नागपूर ठरले. त्यामुळे अंत्यसंस्कारापूर्वी नागपूरकरांना भैयालाल भोतमांगे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता यावे यासाठी त्यांचे पार्थिव सीताबर्डीच्या आनंद बुद्धविहार येथे ठेवण्यात आले होते़ शनिवारी सकाळी ९.१५ च्या दरम्यान त्यांचे पार्थिव मेडिकल रुग्णालयातून आनंद बुद्धविहारात आणण्यात आले. येथे नागरिक सकाळपासून जड अंतकरणाने उभे होते़ भैयालाल यांचे पार्थिव एक तास विहारात ठेवण्यात आले. त्यावेळी भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्यासह रवी शेंडे, राजन वाघमारे, भैयाजी खैरकर, सचिन मून, अरुण साखरकर, रमेश कांबळे, मायाताई शेंडे, उत्तम शेवळे, नितीन फुलमाळी, दिनेश अंडरसहारे, मानवाधिकार आयोगाचे सी.एम. थुल, राजू लोखंडे, बबलू कडबे, प्रमोद जोंधळे, हेमंत भोतमांगे, तक्षशिला वाघधरे व समता सैनिक दलाच्या महाराष्ट्र महिला अध्यक्षा उज्ज्वला गणवीर प्रामुख्याने उपस्थित होते. आमदार प्रकाश गजभिये यांनीही अंत्यदर्शन घेतले. भंते नागार्जुन सुरई ससाई यांनी वंदना घेतल्यानंतर भैयालाल भोतमांगे यांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रिपब्लिकन गटांचे कार्यकर्ते व शेकडो नागरिकांनी यावेळी भैयालाल यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर १०.३० वाजताच्या दरम्यान त्यांचे पार्थिव भंडाऱ्याकडे रवाना करण्यात आले. (प्रतिनिधी) विशेष वकिलाची व्यवस्था करू : बडोले खैरलांजी हत्याकांडाच्या न्यायासाठी भैयालाल भोतमांगे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. मात्र निर्णय लागण्याआधी त्यांचे निधन होणे ही दु:खद घटना आहे. तरीही समाज आणि सरकार त्यांचा लढा थांबविणार नाही. या प्रकरणात न्यायालयात सुनावणीसाठी सरकारतर्फे विशेष वकिलाची व्यवस्था करण्यात येईल, अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी भैयालाल यांच्या श्रद्धांजली सभेत दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर जातीयता, विषमता व चातुर्वर्ण्य व्यवस्थेविरोधात लढा दिला. मात्र समाजात आजही ही विषमता कायम आहे. खैरलांजी हत्याकांड हे त्याच विषमतेमुळे घडले आणि भैयालाल त्या संघर्षाचे प्रतीक होते. त्यांच्या निधनाने न्यायालयीन लढ्याचे नुकसान झाले आहे. मात्र न्याय मिळेपर्यंत ही लढाई संपणार नाही. पण न्याय पहायला ते आपल्यात नाही, याची खंत वाटत असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.