शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

भैयालाल यांच्या अंत्यदर्शनावेळी हळहळले समाजमन

By admin | Updated: January 22, 2017 02:24 IST

भंडारा जिल्ह्याच्या खैरलांजी येथे १२ वर्षापूर्वी भोतमांगे कुटुंबाचे हत्याकांड म्हणजे खोलवर रुजलेल्या जातीवादी मानसिकतेचे दर्शन घडविणारी अमानवीय घटना.

नागपूर : भंडारा जिल्ह्याच्या खैरलांजी येथे १२ वर्षापूर्वी भोतमांगे कुटुंबाचे हत्याकांड म्हणजे खोलवर रुजलेल्या जातीवादी मानसिकतेचे दर्शन घडविणारी अमानवीय घटना. गावातील काही जातीवाद्यांनी भोतमांगे कुटुंबातील चौघांना क्रूरपणे ठार मारले. या हत्याकांडाचा एकमेव साक्षीदार भैयालाल भोतमांगे. त्या घटनेपासून आतापर्यंत न्यायासाठी सतत संघर्ष करीत जगलेल्या भैयालाल यांनी न्याय मिळण्याआधीच जगाचा निरोप घेतला. खैरलांजी हत्याकांडानंतर आरोपींना शिक्षा व्हावी व भोतमांगे कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी झालेल्या विराट आंदोलनाचे केंद्रबिंदू नागपूर ठरले. त्यामुळे अंत्यसंस्कारापूर्वी नागपूरकरांना भैयालाल भोतमांगे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता यावे यासाठी त्यांचे पार्थिव सीताबर्डीच्या आनंद बुद्धविहार येथे ठेवण्यात आले होते़ शनिवारी सकाळी ९.१५ च्या दरम्यान त्यांचे पार्थिव मेडिकल रुग्णालयातून आनंद बुद्धविहारात आणण्यात आले. येथे नागरिक सकाळपासून जड अंतकरणाने उभे होते़ भैयालाल यांचे पार्थिव एक तास विहारात ठेवण्यात आले. त्यावेळी भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्यासह रवी शेंडे, राजन वाघमारे, भैयाजी खैरकर, सचिन मून, अरुण साखरकर, रमेश कांबळे, मायाताई शेंडे, उत्तम शेवळे, नितीन फुलमाळी, दिनेश अंडरसहारे, मानवाधिकार आयोगाचे सी.एम. थुल, राजू लोखंडे, बबलू कडबे, प्रमोद जोंधळे, हेमंत भोतमांगे, तक्षशिला वाघधरे व समता सैनिक दलाच्या महाराष्ट्र महिला अध्यक्षा उज्ज्वला गणवीर प्रामुख्याने उपस्थित होते. आमदार प्रकाश गजभिये यांनीही अंत्यदर्शन घेतले. भंते नागार्जुन सुरई ससाई यांनी वंदना घेतल्यानंतर भैयालाल भोतमांगे यांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रिपब्लिकन गटांचे कार्यकर्ते व शेकडो नागरिकांनी यावेळी भैयालाल यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर १०.३० वाजताच्या दरम्यान त्यांचे पार्थिव भंडाऱ्याकडे रवाना करण्यात आले. (प्रतिनिधी) विशेष वकिलाची व्यवस्था करू : बडोले खैरलांजी हत्याकांडाच्या न्यायासाठी भैयालाल भोतमांगे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. मात्र निर्णय लागण्याआधी त्यांचे निधन होणे ही दु:खद घटना आहे. तरीही समाज आणि सरकार त्यांचा लढा थांबविणार नाही. या प्रकरणात न्यायालयात सुनावणीसाठी सरकारतर्फे विशेष वकिलाची व्यवस्था करण्यात येईल, अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी भैयालाल यांच्या श्रद्धांजली सभेत दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर जातीयता, विषमता व चातुर्वर्ण्य व्यवस्थेविरोधात लढा दिला. मात्र समाजात आजही ही विषमता कायम आहे. खैरलांजी हत्याकांड हे त्याच विषमतेमुळे घडले आणि भैयालाल त्या संघर्षाचे प्रतीक होते. त्यांच्या निधनाने न्यायालयीन लढ्याचे नुकसान झाले आहे. मात्र न्याय मिळेपर्यंत ही लढाई संपणार नाही. पण न्याय पहायला ते आपल्यात नाही, याची खंत वाटत असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.