शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

भूमिपुत्र राजदीप ‘नेट’ मध्ये देशातून दुसरा

By admin | Updated: March 31, 2015 02:18 IST

समाजात काही माणसे अशी असतात की ज्यांना शून्यातून स्वत:चे अस्तित्व घडवावे लागते. परिस्थिती कितीही

‘एमस्सी’मध्ये घेतले होते चार सुवर्णपदक : खडतर परिस्थितीवर केली मातनागपूर : समाजात काही माणसे अशी असतात की ज्यांना शून्यातून स्वत:चे अस्तित्व घडवावे लागते. परिस्थिती कितीही विपरीत असली तरी परिश्रमानेच यश मिळते हे यशाचे सूत्र ठेवून ते जेव्हा मार्गक्रमण करतात तेव्हा त्यांच्या डोळ््यातील स्वप्ने आणखी मोठी होतात. अखेर त्याच्या कर्तृत्वानेच त्याची जगाला ओळख होते. जमिनीशी प्रेमळ संवाद साधणाऱ्या एका शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या राजदीप देवीदास उताणे याने हीच गोष्ट सिद्ध करून दाखवली आहे. खेडेगावातून आलेल्या राजदीपने ‘सीएसआयआर-यूजीसी’तर्फे (कॉन्सिल आॅफ सायन्टिफिक अ‍ॅन्ड इंडस्ट्रीअल रिसर्च-युनिव्हर्सिटी ग्रॅन्ड कमिशन) आयोजित ‘नेट’च्या परीक्षेत देशपातळीवर दुसरे स्थान पटकाविले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०१ व्या दीक्षांत समारंभातदेखील त्याने चार सुवर्णपदके पटकावली होती हे विशेष. आपल्या कर्तृत्वाने त्याने हजारो विद्यार्थ्यांसमोर प्रेरणा निर्माण केली आहे.‘सीएसआयआर-युजीसी’तर्फे डिसेंबर २०१४ मध्ये प्राध्यापकपदाच्या पात्रतेसाठी ‘नेट’ची परीक्षा घेण्यात आली होती. यात राजदीप केवळ उत्तीर्णच झाला नाही तर त्याने देशपातळीवर दुसरा क्रमांक मिळविण्यात यश मिळविले.खेड्यातून सुरू झाला प्रवासशासकीय विज्ञान संस्थेतून रसायनशास्त्र विषयात ‘एमएसस्सी’ करणाऱ्या राजदीपचे वडील हे शेतकरी असून यवतमाळ जिल्ह्यातील नेर परसोपंत तालुक्यातील आजंती येथे त्यांची शेती आहे. घरची परिस्थिती फारशी चांगली नसल्याने राजदीपला सुरुवातीपासूनच संघर्षाचा सामना करावा लागला. पदव्युत्तर शिक्षणासाठी राजदीपने नागपूर गाठले व शासकीय विज्ञान संस्थेत प्रवेश मिळवला. संस्थेच्या वसतीगृहात शिकत असताना दिवसातून दहा ते बारा तास अभ्यास करून त्याने ‘एमएस्सी’ रसायनशास्त्रासारख्या अवघड विषयाच्या परीक्षेत विद्यापीठातून सर्वात जास्त गुण प्राप्त केले़ फेब्रुवारी महिन्यात झालेल्या १०१ व्या दीक्षांत समारंभात त्याचा चार सुवर्णपदकांनी सन्मान करण्यात आला. राजदीप सध्या रसायनशास्त्रातच संशोधन करत आहे. प्रा. डॉ. सुजाता देव यांच्या मार्गदर्शनात ‘अ‍ॅन्टी कॅन्सर ड्रग’ व ‘अ‍ॅन्टी एचआयव्ही ड्रग’ या विषयावर त्याचे संशोधन सुरू आहे. (प्रतिनिधी)भाऊ ठरला आधारस्तंभराजदीपच्या या यशात त्याचा भाऊ अमरदीप याचा मोलाचा वाटा आहे. उच्च शिक्षणासाठी नागपुरात येण्याची राजदीपची इच्छा होती परंतु परिस्थितीअभावी हे अशक्य होते. मोठ्या शहरात राहण्याचा खर्च आपल्याला झेपणारा नाही हे त्याला माहीत होते़ आपल्या भावाची हुशारी पाहून अमरदीपने त्याच्या शिक्षणासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला व आॅटो चालवून त्याच्या शिक्षणासाठी पैसा पुरविला. रसायनशास्त्रातील ‘बेसिक’ चांगले असल्यामुळे ‘नेट’साठी मी स्वअभ्यासावरच भर दिला. शिवाय डॉ.सुजाता देव व डॉ.फरहीन इनाम खान या शिक्षकांचेदेखील चांगले सहकार्य लाभले. माझे संशोधनकार्य पुढेदेखील सुरूच राहिल असे मत राजदीपने यावेळी व्यक्त केले.