शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

घरकुल योजनेत मजूरीच्या अनुदानापासून लाभार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST

नागपूर : काटोल तालुक्यातील रेखा सुरेश ठाकरे या महिलेला २०२० मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकूल मंजूर झाले होते. पंचायत ...

नागपूर : काटोल तालुक्यातील रेखा सुरेश ठाकरे या महिलेला २०२० मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकूल मंजूर झाले होते. पंचायत समितीतून बांधकामासाठी महिलेला पहिला हप्ता व दुसरा हप्ता मिळाला. पण मनरेगातून मजुरीसाठी मिळणारे अनुदान मिळाले नाही. मनरेगाच्या सेलने या महिलेच्या प्रकरणात तिचा वर्क कोड वापरून मजुरीचे पैसे इतरांना दिल्याची माहिती पुढे आली आहे. हा प्रकार केवळ या महिलेच्या बाबतीतच घडला नाही, तर मनरेगातून मिळणाऱ्या मजुरीच्या अनुदानाची असे अनेक प्रकरणे ग्रामीण भागातून पुढे येत आहे.

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात हजारो घरकूल मंजूर झालेली आहे. घरकूल बांधण्यासाठी लाभार्थ्याला ४ आठवड्यात १ लाख २० हजार रुपये दिले जातात तर मनरेगातून घरकूल लाभार्थ्यास बांधकाम मजुरीचे १८ ते २१ हजार रुपये ४ हप्त्यात दिले जातात. लाभार्थ्यास बांधकामाचे १ लाख २० हजार रुपयांचे हप्ते मिळतात. मात्र मनरेगातून मजुरीचे हप्ते मिळत नाही. बांधकामाच्या पहिल्या हप्त्याची १५ हजाराची रक्कम लाभार्थ्याला मिळते, त्याचबरोबर मजुरीचे ५६०० रुपये सुद्धा मिळणे गरजेचे आहे. पण मजुरीच्या पहिल्या हप्त्याची रक्कम अदा केली नाही आणि बांधकामाचा दुसऱ्या हप्त्याचा ४० हजाराचा चेक लाभार्थ्याच्या खात्यात जमा झाल्यास, लाभार्थ्यास मजुरीचा हप्ता देण्यात येत नाही. पुढे अशीच प्रक्रिया सुरू राहते आणि चार टप्प्यात मिळणाऱ्या मजुरीच्या निधीपासून वंचित रहावे लागते. लाभार्थी पंचायत समितीच्या चकरा मारतात, मनरेगा सेलकडून त्यांना तांत्रिक अडचणी सांगून लाभापासून वंचित ठेवण्यात येते. मजुरीच्या तुलनेत बांधकामाचा निधी जास्त असल्याने लाभार्थीही मजुरीकडे दुर्लक्ष करतात.

त्याचाच फायदा घेऊन लाभार्थ्याचा वर्क कोड वापरून दुसऱ्या लाभार्थ्यास मजुरीचा लाभ दिला जातो. खरा लाभार्थी मजुरीच्या अनुदानापासून वंचित राहतो. ग्रामीण भागात घरकूल योजनेची मजुरी लाटण्याचा गोरखधंदा सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे अध्यक्ष डॉ. अनिल ठाकरे यांनी केला आहे. यासंदर्भात सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

- मनरेगा सेल कर्मचारी जबाबदार

लाभार्थ्याला घरकूल बांधकामाचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर, दुसरा हप्ता मिळण्यासाठी ते पंचायत समितीतील बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांना आमिष दाखवून लगेच दुसऱ्या हप्त्याचा चेक मिळवून घेतात. बांधकामाचा दुसरा हप्ता मिळाल्यास मनरेगाच्या मजुरीचा पहिला हप्ता मिळत नाही. मजुरीचा निधी कमी असल्याने लाभार्थ्याचेही त्याकडे लक्ष नसते. मनरेगा सेलकडून एकदोन वेळा टाळाटाळ केल्यानंतर लाभार्थी पुन्हा कार्यालयात येत नाही. त्याचाच फायदा मनरेगा सेलचे कर्मचारी घेतात.