शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

प्रयोगशील व्हा, ब्रँडिंग करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 01:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात कौशल्य म्हणजेच हुनरची कमी नाही.परंतु या हुनरसोबतच बाजारात कोणत्या वस्तूला मागणी आहे, हे महत्त्वाचे आहे. वस्तूचा दर्जा आणि मार्केटिंगसोबतच त्याची ब्रँडिंगही करा. नवनवीन तंत्रज्ञान शोधणे आणि त्यात संशोधन करून नवीन वस्तू निर्माण करणे आवश्यक आहे. अशा वस्तूंना जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे, त्याची किंमत द्यायलाही ...

ठळक मुद्देनितीन गडकरी : हुनर खोज संवाद यात्रेचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात कौशल्य म्हणजेच हुनरची कमी नाही.परंतु या हुनरसोबतच बाजारात कोणत्या वस्तूला मागणी आहे, हे महत्त्वाचे आहे. वस्तूचा दर्जा आणि मार्केटिंगसोबतच त्याची ब्रँडिंगही करा. नवनवीन तंत्रज्ञान शोधणे आणि त्यात संशोधन करून नवीन वस्तू निर्माण करणे आवश्यक आहे. अशा वस्तूंना जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे, त्याची किंमत द्यायलाही लोकं तयार आहेत. तेव्हा कारागिरांनी प्रयोगशील व्हावे, वस्तूची ब्रँडिंग करावी. यासाठी इनोव्हेशन, टेक्नोलॉजी आणि रिसर्चवर भर द्यावा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.ग्राम ज्ञानपीठ, संपूर्ण बांबू केंद्र, राष्ट्रीय कारीगर पंचायत आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात तीन दिवसीय ‘हुनर खोज यात्रा संवाद व प्रस्तुतिकरण’ आयोजित करण्यात आले होते. रविवारी या कार्यक्रमाच्या समारोपीय समारंभात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, माजी मंत्री शोभाताई फडणवीस, डॉ. महेश शर्मा, प्रभाकरराव मुंडले, सुनील देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी करागिरांच्या पाठीशी शासन नेहमीच खंबीरपणे उभे आहे. यासाठीच केंद्र सरकारने कौशल्य विकासासारखे स्वतंत्र मंत्रालयसुद्धा तयार केले असल्याचे स्पष्ट केले. यावेळी डॉ. महेश शर्मा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी देशभरातून आलेल्या विविध कारागिरांचा सन्मान करण्यात आला. किस्टू खडगी, हरिकृष्ण नायक, भय्यालाल शिवारे, रमेश बेहरे, संग्राम भिनारे या कारागिरांना सन्मानित करणयात आले. संचालन श्रद्धा श्रुुत्री यांनी केले. रामकुमार यांनी आभार मानले.कारागिरांसाठी स्वतंत्र मंत्रालय करासुनील देशपांडे यांनी आपल्या प्रास्ताविकेत देशभरातील कारागिरांच्या समस्या विशद केल्या. स्मार्ट शहरात या कारागिरांचे स्थान काय, असा प्रश्न उपस्थित करीत कारागिरांसाठी स्वतंत्र मंत्रालय किंवा आयोग स्थापन करण्यात यावा, अशी मागणी केली.बांबू लवकरच देशभरात टीपीमुक्तआम्ही महाराष्ट्रात बांबू टीपी(ट्रान्सपोर्टेशन पास)मुक्त केला आहे. लवकरच देशभरातही बांबू टीपीमुक्त केला जाईल. राष्ट्रीय बांबूधोरणही लवकरच जाहीर केले जाईल, असे नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.