शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

पीडित, अत्याचारग्रस्त महिलांना हक्काचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:08 IST

‘सखी वन स्टॉप सेंटर’चा पुढाकार : निवारा, कायदेशीर सल्ला आणि सुरक्षाही प्रदान नागपूर : महिलांच्या सुरक्षेविषयी देशभरात चिंता ...

‘सखी वन स्टॉप सेंटर’चा पुढाकार : निवारा, कायदेशीर सल्ला आणि सुरक्षाही प्रदान

नागपूर : महिलांच्या सुरक्षेविषयी देशभरात चिंता व्यक्त केली जात आहे. कारण अत्याचार, लैंगिक शोषणाच्या घटना वाढतच आहे. पोलीस खात्याने महिलांना ‘भरोसा’ दिला आहे. पण संकटग्रस्त महिलांना तत्काळ आधार देण्याचे काम ‘सखी वन स्टॉप सेंटर’च्या माध्यमातून होत आहे. केंद्र सरकारच्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे ‘सखी वन स्टॉप सेंटर’ सुरू करण्यात आले आहे. नागपुरात जुलै महिन्यात हे सेंटर सुरू झाले. अवघ्या काही महिन्यातच शेकडो पीडित, अत्याचारग्रस्त महिलांना त्याचा आधार झाला.

जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाच्या नियंत्रणाखाली नागपुरात पाटणकर चौकात हे सेंटर सुरू करण्यात आले आहे. कौटुंबिक हिंसाचार पीडित, लैंगिक शोषणाच्या पीडित, मानवी वाहतुकीस बळी पडलेल्या, रस्ता भरकटलेल्या, संरक्षणाची गरज असलेल्या महिलांसाठी हे केंद्र एक आधार म्हणून पुढे येत आहे. पाच दिवसांचा निवारा, कायदेशीर मदत, आरोग्याच्या सुविधा, पोलिसांची सुरक्षा या केंद्राच्या माध्यमातून महिलांना मिळत आहे.

नागपूर जिल्ह्यात हे केंद्र असले तरी, याचा लाभ ‌‌इतर राज्यातील महिलांनाही मिळाला आहे. लॉकडाऊनच्या काळात या केंद्राचा फायदा तामिळनाडू, मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील महिलांनाही झाला आहे. हरविलेल्या महिला, मुलींना सुरक्षा प्रदान करून, त्यांच्या घरापर्यंत पोहचवून देण्यात केंद्राला यश आले आहे.

जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाच्या मार्गदर्शनात नागपूरचे सखी वन स्टॉप सेंटर भारतीय स्त्री संस्थेच्या माध्यमातून संचालित करण्यात येत आहे.

- केंद्र २४ बाय ७ कार्यरत

पाटणकर चौकातील शासकीय करुणा महिला वसतिगृह परिसरात असलेले हे केंद्र २४ बाय ७ सुरू असते. केंद्रात व्यवस्थापक, केस वर्कर, समुपदेशक, वकील, डॉक्टर, नर्स, पोलिसांची चमू पीडितेला मानसिक समुपदेशन, सुरक्षा, मदत व पाच दिवसांचा अल्प निवारा उपलब्ध करून देते. या केंद्राची मदत हवी असेल तर ०७१२-२९५७९५१ यावर संपर्क साधावा.

- केंद्राने यांना पुरविल्या सुविधा

जुलै महिन्यापासून केंद्राकडे २१७ पीडित महिलांनी आधार शोधला आहे. यात कौटुंबिक हिंसाचाराच्या ११५ केसेस आहेत. ३६ महिलांचे समुपदेशन करून त्यांना कुटुंबात सुखरूप पाठविले आहे. राज्यात व राज्याबाहेरून बेपत्ता असलेल्या १२ महिलांना सुरक्षा मिळवून दिली आहे. ३३ महिलांना कायद्याचा सल्ला, १३ महिलांना पोलिसांची मदत केली आहे.

- पोलिसांच्या माध्यमातून अथवा महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून महिला केंद्रात येतात. संकटग्रस्त असलेल्या महिलांना त्यांच्या गरजेनुसार साहाय्य देऊन, त्यांचा आत्मविश्वास वाढवून महिला सक्षमीकरणाचे तसेच कुटुंबसंस्था बळकट करण्याचे काम यशस्वीरीत्या होत आहे.

अपर्णा कोल्हे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी