शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
3
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
4
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
5
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
6
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
7
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
8
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
9
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
10
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
11
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
12
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
13
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
14
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
15
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
16
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
17
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
18
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
19
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
20
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

काेराेना काळात ‘मनरेगा’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:08 IST

राहुल पेटकर लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : काेराेना संक्रमणामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच मजुरांची अवस्था बिकट असून, ...

राहुल पेटकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : काेराेना संक्रमणामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच मजुरांची अवस्था बिकट असून, त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर आला. मात्र, प्रशासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी याेजनेंतर्गत रामटेक तालुक्यात २५८ विविध कामांना प्रशासकीय मंजुरी दिली. त्यामुळे तालुक्यातील ९१३ मजुरांना काम मिळाल्याने काेराेना संकटाच्या काळात त्यांना थाेडा आधार मिळाला आहे.

रामटेक तालुक्यात मनरेगा अंतर्गत सध्या २५८ विविध कामांना सुरुवात करण्यात आली असून, त्यासाठी ९१३ मजुरांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कामामध्ये इंदिरा आवास योजनेच्या २०८ कामांचा समावेश असून, या कामात ५३० मजुरांची नियुक्ती केली आहे. वृक्ष लागवडीच्या ४८ कामावर २५५ मजूर, तलाव खाेलीकरणाच्या दाेन कामासाठी १२८ मजुरांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व कामावर एकूण ७ काेटी १२ जाख ३५ हजार रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. एकूण मनुष्य दिन निर्मिती लक्षात घेता, १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या काळात २ काेटी ३४ लाख ८७० रुपये खर्च करण्यात आले.

सिंचन विहिरींची ३० कामे प्रशासकीय मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती मनरेगाच्या अधिकाऱ्यांनी दिली. पुढच्या आठवड्यात ही कामे सुरू हाेणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यात सार्वजनिक शाेषखड्ड्यांची ३५, वैयक्तिक शाेषखड्ड्यांची ७५, वृक्ष लागवडीची पाच, घरकुल बांधकामाची २३१, विहीर पुनर्भरणाची तीन, नाला खाेलीकरणाची पाच अशी ३५५ कामे सध्या सुरू आहेत. या कामावर ६ काेटी ८५ लाख २६४ रुपये खर्च करण्यात आले. यातून एकूण मनुष्य दिन निर्मिती ही ५ काेटी ६८ लाख ६६० रुपये आहे.

रामटेक तालुक्यात विविध राेजगार हमीची एकूण १,३८७ कामे अपूर्ण आहेत. शिवाय, सन २०२०-२१ मधील ७३३ कामेदेखील अपूर्ण आहेत. एवढेच नव्हे तर पंतप्रधान आवास याेजनेची ६६२ कामे अपूर्ण असून, पांदण रस्त्याची ४१ तर शाेषखड्ड्यांची ५२ कामे अपूर्ण आहेत.

...

कुटुंबीयांना दिलासा

काेराेना संक्रमण आणि लाॅकडाऊन यामुळे उद्याेगधंदे व इतर कामे थांबल्यागत झाली आहेत. या काळात अनेकांचे राेजगार गेले असून, ग्रामीण भागातील गरिबांच्या हाताला काम मिळेनासे झाले. उन्हाळ्यात शेतीचीही फारशी कामे राहत नसल्याने ग्रामीण भागातील मजुरांना कामे मिळणार तरी कशी, कामे नसल्याने उपजीविका करायची कशी, असे प्रश्नही त्यांच्यासमाेर निर्माण झाले. मात्र, प्रशासनाने २५८ का हाेईना कामांना मंजुरी दिल्याने ९१३ मजुरांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.

....

संकटकाळात कामाची गरज

काेराेनाच्या संकटकाळात ग्रामीण भागातील मजुरांना कामाची नितांत गरज आहे. मनरेगा अंतर्गत काही कामे सुरू करण्यात आल्याने मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यात आल्याने त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे. त्यांना यापुढेही कामे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. सिंचन विहिरीच्या ३० कामांना मंजुरी मिळाली आहे. ती कामे पुढील आठवड्यात सुरू केली जाईल. या याेजनेमुळे नागरिकांना अन्नधान्याचा पुरवठा हाेत आहे. मजुरांच्या बँक खात्यात त्यांच्या मजुरीची रक्कम जमा केली जात आहे, अशी प्रतिक्रिया रामटेकचे खंडविकास अधिकारी प्रदीप ब्रम्हनाेटे यांनी व्यक्त केली.