शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

‘बीएस्सी’च्या विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा!

By admin | Updated: July 22, 2015 03:26 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील २ ते ३ हजार बीएसस्सीच्या (जुना अभ्यासक्रम) विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

नागपूर विद्यापीठ : दुसऱ्या वर्षातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना अंतिम वर्षात मिळणार प्रवेशनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील २ ते ३ हजार बीएसस्सीच्या (जुना अभ्यासक्रम) विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. दुसऱ्या वर्षातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना अंतिम वर्षात प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली. ‘बीएसस्सी’ला सत्र प्रणाली लागू करण्यात आली आहे. परंतु जुन्या अभ्यासक्रमातील अनेक विद्यार्थ्यांचे दुसऱ्या वर्षाचे काही विषय निघाले होते. नियमांनुसार ते ‘एटीकेटी’च्या माध्यमातून तृतीय वर्षाच्या सत्रात प्रवेश घेण्यासाठी पात्र आहेत. परंतु ‘बीएसस्सी’ला सत्र प्रणाली लागू करताना विद्यापीठाने काढलेल्या एका ‘अध्यादेशानुसार असे विद्यार्थी प्रवेश घेण्यास पात्र नाहीत. सत्र प्रणालीनुसार तृतीय सत्रात अनुत्तीर्ण विद्यार्थ्याला पाचव्या सत्रात प्रवेश देणे शक्य नाही. त्यामुळे महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तसेच विद्यार्थ्यांनी यासंदर्भात विद्यापीठावर धडक दिली होती व प्र-कुलगुरूंसमोर हा मुद्दा मांडण्यात अला होता. विद्यार्थ्यांची बाजू योग्य असून याबाबत अभ्यास मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यांच्या प्रवेशासंदर्भात बुधवारी अध्यादेश जारी करण्यात येईल, असे प्र-कुलगुरूंनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)अटींचे पालन करण्याचे ‘एमकेसीएल’ला निर्देशदरम्यान,नागपूर विद्यापीठात प्रवेशाची नोंदणी होताक्षणीच विद्यार्थ्यांना ‘एसएमएस’ प्राप्त होणार आहे. विद्यार्थ्यांना ‘ई-सुविधेचे सर्व फायदे मिळाले पाहिजेत व काटेकोरपणे सामंजस्य करारातील अटींचे पालन झाले पाहिजे, असे विद्यापीठ प्रशासनाने ‘एमकेसीएल’ला बजावले आहे.देयकांवरुन वादात सापडलेले नागपूर विद्यापीठ व ‘एमकेसीएल’दरम्यानचा सामंजस्य करार कायम राहणार असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. परीक्षेच्या अगोदरची व नंतरची सर्व कामे ‘एमकेसीएल’कडे सोपविण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांच्या नोंदणीपासून ते पदवी प्रमाणपत्र जारी करण्यापर्यंतच्या प्रक्रियांचा समावेश आहे. केवळ उत्तरपत्रिका ‘स्कॅनिंग’ व ‘आॅन स्क्रीन’ मूल्यांकनासाठी विद्यापीठाला बाहेरील एजन्सीची मदत घ्यावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना वेळोवेळी विद्यापीठातील घडामोडींची माहिती कळावी यासाठी ‘एसएमएस’ सुविधा ‘एमकेसीएल’कडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची नोंदणी झाली की लगेच त्यांना ‘एसएमएस’ जाणार आहे. सोबतच विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक, विविध सूचना, निकाल यांची माहितीदेखील विद्यार्थ्यांना घरबसल्या कळणार आहे.