शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

‘बीएस्सी’च्या विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा!

By admin | Updated: July 22, 2015 03:26 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील २ ते ३ हजार बीएसस्सीच्या (जुना अभ्यासक्रम) विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

नागपूर विद्यापीठ : दुसऱ्या वर्षातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना अंतिम वर्षात मिळणार प्रवेशनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील २ ते ३ हजार बीएसस्सीच्या (जुना अभ्यासक्रम) विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. दुसऱ्या वर्षातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना अंतिम वर्षात प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली. ‘बीएसस्सी’ला सत्र प्रणाली लागू करण्यात आली आहे. परंतु जुन्या अभ्यासक्रमातील अनेक विद्यार्थ्यांचे दुसऱ्या वर्षाचे काही विषय निघाले होते. नियमांनुसार ते ‘एटीकेटी’च्या माध्यमातून तृतीय वर्षाच्या सत्रात प्रवेश घेण्यासाठी पात्र आहेत. परंतु ‘बीएसस्सी’ला सत्र प्रणाली लागू करताना विद्यापीठाने काढलेल्या एका ‘अध्यादेशानुसार असे विद्यार्थी प्रवेश घेण्यास पात्र नाहीत. सत्र प्रणालीनुसार तृतीय सत्रात अनुत्तीर्ण विद्यार्थ्याला पाचव्या सत्रात प्रवेश देणे शक्य नाही. त्यामुळे महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तसेच विद्यार्थ्यांनी यासंदर्भात विद्यापीठावर धडक दिली होती व प्र-कुलगुरूंसमोर हा मुद्दा मांडण्यात अला होता. विद्यार्थ्यांची बाजू योग्य असून याबाबत अभ्यास मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यांच्या प्रवेशासंदर्भात बुधवारी अध्यादेश जारी करण्यात येईल, असे प्र-कुलगुरूंनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)अटींचे पालन करण्याचे ‘एमकेसीएल’ला निर्देशदरम्यान,नागपूर विद्यापीठात प्रवेशाची नोंदणी होताक्षणीच विद्यार्थ्यांना ‘एसएमएस’ प्राप्त होणार आहे. विद्यार्थ्यांना ‘ई-सुविधेचे सर्व फायदे मिळाले पाहिजेत व काटेकोरपणे सामंजस्य करारातील अटींचे पालन झाले पाहिजे, असे विद्यापीठ प्रशासनाने ‘एमकेसीएल’ला बजावले आहे.देयकांवरुन वादात सापडलेले नागपूर विद्यापीठ व ‘एमकेसीएल’दरम्यानचा सामंजस्य करार कायम राहणार असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. परीक्षेच्या अगोदरची व नंतरची सर्व कामे ‘एमकेसीएल’कडे सोपविण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांच्या नोंदणीपासून ते पदवी प्रमाणपत्र जारी करण्यापर्यंतच्या प्रक्रियांचा समावेश आहे. केवळ उत्तरपत्रिका ‘स्कॅनिंग’ व ‘आॅन स्क्रीन’ मूल्यांकनासाठी विद्यापीठाला बाहेरील एजन्सीची मदत घ्यावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना वेळोवेळी विद्यापीठातील घडामोडींची माहिती कळावी यासाठी ‘एसएमएस’ सुविधा ‘एमकेसीएल’कडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची नोंदणी झाली की लगेच त्यांना ‘एसएमएस’ जाणार आहे. सोबतच विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक, विविध सूचना, निकाल यांची माहितीदेखील विद्यार्थ्यांना घरबसल्या कळणार आहे.