शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
6
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
7
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
8
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
9
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
10
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
11
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
12
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
13
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
14
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
15
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
16
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
18
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
19
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
20
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद

बार्टीची विशेष अनुदान योजना फक्त कागदावरच; अनेक विद्यार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 07:00 IST

Nagpur News दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना ही प्रत्यक्षात विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नसल्याने अनेक विद्यार्थी वंचित राहिले आहेत.

ठळक मुद्देमेडिकल, इंजिनीयरिंगमध्ये प्रवेश अवघड

आनंद डेकाटे

नागपूर : सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या बार्टीने मोठा गाजावाजा करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना सुरू केली. यानुसार दहावीतील गुणंवत मागासवर्गीय विद्यार्थी विविध शाखेत जाण्यासाठी प्रवेश परीक्षा देत असेल तर त्याला परीक्षेच्या वर्गासाठी प्रत्येकी दोन लाख रुपये मिळणार होते. परंतु याची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही. योजनेचे नियोजन चुकल्याने एकाही विद्यार्थ्याला अद्याप लाभ मिळालेला नाही.

मेडिकल, किंवा इंजिनीयरिंगकडे जाणारे विद्यार्थी प्रवेश परीक्षेचे क्लासेस लावत असतात. हे क्लासेस दहावीनंतरच लावले जातात. या क्लासेसचे शुल्क भरमसाठ असते. याचा फायदा मागासवर्गीय गरीब गुणवंत विद्यार्थ्यांनासुद्धा व्हावा, यासाठी सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)तर्फे सन २०२०-२१ मध्ये ही योजना करण्यात आली. या योजनेंतर्गत दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण घेणारा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याला प्रवेश परीक्षेसाठीच्या क्लासेसचे शुल्क भरण्यासाठी प्रत्येकी २ लाख रुपये देण्याचे जाहीर करण्यात आले. अगोदर संख्येची मर्यादा नव्हती. तब्बल ४,०१० जणांनी या योजनेसाठी अर्ज केले. परंतु एकाही विद्यार्थ्याला त्याचा लाभ मिळू शकलेला नाही. नंतर ही योजना केवळ १०० विद्यार्थ्यांनाच मिळेल, असे सांगण्यात आले. परंतु या १०० जणांची यादीसुद्धा अद्याप लागलेली नाही.

अनेकांनी क्लासेस सोडले

योजनेचा लाभ मिळेल या अपेक्षेने अनेक विद्यार्थ्यांनी योजनेसाठी अर्ज केले व क्लासेसही लावले. परंतु शासनाचे अनुदान मिळाले नसल्याने अनेकांना क्लासेस सोडावे लागले.

विभागीय स्तरावर प्रशिक्षण केंद्र का नाही?

१०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी २ लाख रुपये दिल्यास दोन कोटी रुपये होतात. ४ हजार विद्यार्थ्यांचा विचार केला तर ८० कोटी रुपये खर्च येतील. तसेच एका वर्षी केवळ १०० जणांनाच लाभ देता येईल. त्यापेक्षा विभागीय स्तरावर प्रशिक्षण केंद्र सुरू केले किंवा एखादी संस्था हायर करून विभागस्तरावर प्रशिक्षणाची व्यवस्था केली तर कमी पैशात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळू शकतो. तसेच कायमस्वरूपी व्यवस्थाही निर्माण होईल. इतकेच नव्हे तर यातून शासनाच्या निधीचीही बचत होऊ शकते.

- अतुल खाेब्रागडे, विद्यार्थी नेते

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र