शहरं
Join us  
Trending Stories
1
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
2
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
3
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
4
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
5
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
6
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
7
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
8
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
9
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
10
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
11
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
12
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
13
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
14
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
15
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
16
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
17
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
18
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
19
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
20
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक

बार्टीची विशेष अनुदान योजना फक्त कागदावरच; अनेक विद्यार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 07:00 IST

Nagpur News दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना ही प्रत्यक्षात विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नसल्याने अनेक विद्यार्थी वंचित राहिले आहेत.

ठळक मुद्देमेडिकल, इंजिनीयरिंगमध्ये प्रवेश अवघड

आनंद डेकाटे

नागपूर : सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या बार्टीने मोठा गाजावाजा करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना सुरू केली. यानुसार दहावीतील गुणंवत मागासवर्गीय विद्यार्थी विविध शाखेत जाण्यासाठी प्रवेश परीक्षा देत असेल तर त्याला परीक्षेच्या वर्गासाठी प्रत्येकी दोन लाख रुपये मिळणार होते. परंतु याची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही. योजनेचे नियोजन चुकल्याने एकाही विद्यार्थ्याला अद्याप लाभ मिळालेला नाही.

मेडिकल, किंवा इंजिनीयरिंगकडे जाणारे विद्यार्थी प्रवेश परीक्षेचे क्लासेस लावत असतात. हे क्लासेस दहावीनंतरच लावले जातात. या क्लासेसचे शुल्क भरमसाठ असते. याचा फायदा मागासवर्गीय गरीब गुणवंत विद्यार्थ्यांनासुद्धा व्हावा, यासाठी सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)तर्फे सन २०२०-२१ मध्ये ही योजना करण्यात आली. या योजनेंतर्गत दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण घेणारा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याला प्रवेश परीक्षेसाठीच्या क्लासेसचे शुल्क भरण्यासाठी प्रत्येकी २ लाख रुपये देण्याचे जाहीर करण्यात आले. अगोदर संख्येची मर्यादा नव्हती. तब्बल ४,०१० जणांनी या योजनेसाठी अर्ज केले. परंतु एकाही विद्यार्थ्याला त्याचा लाभ मिळू शकलेला नाही. नंतर ही योजना केवळ १०० विद्यार्थ्यांनाच मिळेल, असे सांगण्यात आले. परंतु या १०० जणांची यादीसुद्धा अद्याप लागलेली नाही.

अनेकांनी क्लासेस सोडले

योजनेचा लाभ मिळेल या अपेक्षेने अनेक विद्यार्थ्यांनी योजनेसाठी अर्ज केले व क्लासेसही लावले. परंतु शासनाचे अनुदान मिळाले नसल्याने अनेकांना क्लासेस सोडावे लागले.

विभागीय स्तरावर प्रशिक्षण केंद्र का नाही?

१०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी २ लाख रुपये दिल्यास दोन कोटी रुपये होतात. ४ हजार विद्यार्थ्यांचा विचार केला तर ८० कोटी रुपये खर्च येतील. तसेच एका वर्षी केवळ १०० जणांनाच लाभ देता येईल. त्यापेक्षा विभागीय स्तरावर प्रशिक्षण केंद्र सुरू केले किंवा एखादी संस्था हायर करून विभागस्तरावर प्रशिक्षणाची व्यवस्था केली तर कमी पैशात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळू शकतो. तसेच कायमस्वरूपी व्यवस्थाही निर्माण होईल. इतकेच नव्हे तर यातून शासनाच्या निधीचीही बचत होऊ शकते.

- अतुल खाेब्रागडे, विद्यार्थी नेते

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र