शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

समता पाठोपाठ बार्टीचे विभागीय कार्यालयही बंद ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST

आनंद डेकाटे, नागपूर : समता प्रतिष्ठानच्या पाठोपाठ आता नागपुरातील बार्टीचे विभागीय कार्यालय सुद्धा बंद पडले आहे. सध्या हे कार्यालय ...

आनंद डेकाटे, नागपूर :

समता प्रतिष्ठानच्या पाठोपाठ आता नागपुरातील बार्टीचे विभागीय कार्यालय सुद्धा बंद पडले आहे. सध्या हे कार्यालय केवळ नावापुरतेच सुरू आहे. एका प्रभारी प्रकल्प अधिकाऱ्याच्या भरवशावर नागपुरातील विभागीय कार्यालय सुरू असल्याचा केवळ देखावा केला जात आहे. एकूणच नागपुरातील सामाजिक न्याय विभागाचा असलेला दबदबा नामशेष झाला आहे. याचा फटका नागपूर विभाग व एकूणच विदर्भातील मागासवर्गीयांवर होत आहे.

सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशाेधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच बार्टी ही एक स्वायत्त संस्था आहे. साामाजिक न्याय विभागांतर्गत असलेल्या विविध योजना मागासवर्गीयांपर्यंत पोहोचवण्यात आणि एकूणच मागासवर्गीयांच्या विकासात बार्टी या संस्थेचे मोठे योगदान राहिले आहे. नागपूर व विदर्भ या पट्ट्यात अनुसूचित जातीच्या लोकांची संख्या माेठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळेच दूरवरच्या लोकांपर्यंत याचा लाभ व्हावा म्हणून बार्टीचे विभागीय कार्यालय सुरू करण्यात आले. नागपुरात हे कार्यालय सुरू झाले. त्याचा लाभही मोठ्या प्रमाणात लोकांना भेटू लागला. भाजपच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले. याची स्थापना कंपनीच्या धर्तीवर करण्यात आली. नागपुरातच याचे मुख्यालय होते. या समता प्रतिष्ठानच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम राबविले गेले. विशेषत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राज्यभरात कार्यक्रम राबविले गेले; परंतु या कार्यक्रमांवर झालेल्या खर्चात गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला. चौकशी झाली आणि समता प्रतिष्ठानचे सर्व अधिकारी कर्मचारी निलंबित करीत हे कार्यालय एकप्रकारे बंद करण्यात आले. समता प्रतिष्ठान बंद झाल्यानंतर आता येथील बार्टीचे कार्यालय सुद्धा बंद पडले आहे. केवळ नावालाच प्रशिक्षणाचे ऑनलाइन कार्यक्रम सुरू आहे.

बॉक्स

१२ पैकी एकही अधिकारी-कर्मचारी नाही

बार्टीच्या विभागीय कार्यालयात एकूण १२ अधिकारी-कर्मचारी कार्यरत होते. यासोबतच समता प्रतिष्ठानचे कर्मचारीही बार्टीची कामे सांभाळायचे. सध्या नागपूर जिल्ह्यातील समता दूत प्रकल्पाची जबाबदारी सांभाळणारे प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले यांच्याकडे विभागाचा अतिरिक्त कारभार साेपवण्यात आला आहे. मुळाच विभागीय कार्यालय बंदच पडले आहे. केवळ दाखविण्यापुरता कारभार पाहिला जात आहे.