शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बांबूच्या ‘वेस्ट’ला बनविणार ‘बेस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:08 IST

अभय लांजेवार उमरेड : केवळ कागद तयार करण्यासाठीच बांबूचा उपयोग होतो असे नाही, तर औषधी गुणधर्म असलेला बांबू मनुष्यासाठी ...

अभय लांजेवार

उमरेड : केवळ कागद तयार करण्यासाठीच बांबूचा उपयोग होतो असे नाही, तर औषधी गुणधर्म असलेला बांबू मनुष्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. या बहुगुणी बांबूचा प्रत्येक घटक उपयोगी ठरावा; तसेच बांबूच्या ‘वेस्ट’पासून ‘बेस्ट’ तयार करण्याचा संकल्प उमरेड येथील रमेश प्रभाकर डुंभरे यांचा आहे. विदर्भाच्या मातीत हे स्वप्न येत्या दोन-तीन वर्षांत साकारण्यासाठी रमेश डुंभरे दिवसरात्र एक करीत मेहनत घेत आहेत. वनशेतीतून लवकरच लघुउद्योग उभारण्याचा ध्यास त्यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केला.

उमरेडपासून २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या चिखलापार-नाड (ता. भिवापूर) या शेतशिवारातील २४ एकरांतील वनशेतीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. १७ एकरांत बांबू, तर उर्वरित शेतात निलगिरी व सीताफळ आहेत. येत्या वर्षभरात बांबूचे पहिले उत्पादन निघेल. अशातच आता बांबूवनातील प्रत्येक घटकाचा उपयोग झाला पाहिजे, यासाठी रमेश डुंभरे प्रयत्नरत आहेत. जमिनीतील कोंबापासून वाढ होणाऱ्या बांबूत कोवळे कोंब असतात. आडव्या फांद्या तसेच तलवारीच्या आकारासारख्या पानांतसुद्धा औषधी गुणधर्म असतो. बांबूच्या बिया भाताप्रमाणे शिजवून खातात. कोवळ्या बांबूचे लोणचे घालतात व त्याची चटणीसुद्धा तयार करतात. बांबूच्या कोवळ्या भागांचा उपयोग श्वसनविकारावरसुद्धा भारतातील काही भागांत केला जातो. मोठी हॉटेल्स, मॉलमध्ये बांबूपासून विविध डिश तसेच रुचकर खाद्यपदार्थ तयार करतात. सोबतच जळाऊ म्हणून उपयोगी ठरणारे पॅलेट आणि ब्रिक्सची निर्मितीसुद्धा यातूनच करण्याची योजना आहे. परवानगीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या दोन-तीन वर्षांत हा लघुप्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा निर्धार आहे, अशी बाब रमेश डुंभरे यांनी व्यक्त केली.

बांधकामासाठीसुद्धा मोठ्या बांबूचा उपयोग होतो. टोपल्या, करंड्या, हारे, सुपे, पडदे, आदी स्वयंपाकघरातील साहित्य तसेच फर्निचर सजावटीसाठीसुद्धा बांबू मोलाचा ठरत असल्याने शासनाने वनशेतीला आर्थिक बळ दिल्यास नक्कीच शेतकऱ्यांसाठी वनशेती वरदान ठरेल, असा विश्वासही डुंभरे यांनी व्यक्त केला. बांबू विकास महामंडळाकडून वा शासनाकडून कोणत्याही प्रकारचे आर्थिक पाठबळ मला मिळालेले नाही. स्वबळावर हा प्रकल्प मी सुरू केला आणि त्याला योग्यरीत्या आकारही दिला.

शेतपिकात समावेश करा

बांबूचा समावेश शेतवर्गीय पिकात होत नाही, या कारणाने त्याला कर्जसुद्धा मिळत नाही. एकरी सुमारे एक लाख रुपयांचा खर्च बांबूसाठी येतो. शिवाय चार वर्षांनंतर पहिले उत्पादन हाती येते. शासनाचे याकडे दुर्लक्ष असल्यानेच शेतकरी वर्ग या उत्पादनाकडे वळत नाही. कागद तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बांबूचा वापर होत असताना शासन यावर लक्ष केंद्रित का करीत नाही, असाही सवाल विचारला जात आहे. शेतवर्गीय पिकात बांबूचा समावेश करावा, अशी मागणी रमेश डुंभरे यांनी केली आहे.