शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
3
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
4
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
5
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
6
अ‍ॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर...
7
सीबीआयपाठोपाठ आता ईडीचीही एन्ट्री! २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी अनिल अंबानींवर कारवाई
8
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली
9
३ फ्लॅट, ५० लाखांचं सोनं... महिलेने १०० लोकांची केली ९ कोटींची फसवणूक, 'असा' घातला गंडा
10
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
11
बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...
12
आधी चर्चेला बोलावलं अन् नंतर हाकलून लावलं; नेपाळमध्ये Gen-Zसोबत चर्चेचा खेळ गडबडला?
13
ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल
14
कोळशावरील बेकऱ्यांना टाळेच! नोटिसा देण्यास सुरुवात; स्वच्छ इंधनच वापरावे लागणार
15
Gold Silver Price 10 September: मोठ्या तेजीनंतर सोन्या-चांदीचे दर आज घसरले; पाहा १४ ते २४ कॅरेटसाठी आता किती खर्च करावा लागणार
16
Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस
17
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
18
iPhone 17: भारत, दुबई, अमेरिका की इतर कुठे; कोणत्या देशात आयफोन १७ मिळतोय स्वस्त? वाचा
19
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
20
सगळ्यात स्वस्त ७ सीटर असणाऱ्या 'या' कारची किंमत ९६ हजारांनी झाली कमी! आता कितीला मिळणार?

‘बालसदन’चा श्वास कोंडतोय

By admin | Updated: December 6, 2015 03:13 IST

शाळाबाह्य मुलांना शाळेत आणण्यासाठी एकीकडे शासन प्रयत्न करीत आहे, मात्र दुसरीकडे अनाथ मुलांना शाळेचा आधार देणाऱ्या संस्थांचा श्वास रोखला जात आहे.

निशांत वानखेडें नागपूरशाळाबाह्य मुलांना शाळेत आणण्यासाठी एकीकडे शासन प्रयत्न करीत आहे, मात्र दुसरीकडे अनाथ मुलांना शाळेचा आधार देणाऱ्या संस्थांचा श्वास रोखला जात आहे. बालसदनबाबत हाच प्रकार दिसून येत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून या संस्थेची रसदच रोखण्यात आली आहे. ही संस्था बंद करण्याचा घाट प्रशासनाने घातला असल्याचा आरोप संस्थेच्या सदस्यांनी लावला आहे. दुसरीकडे संस्था सदस्यांकडूनच अनधिकृत प्रकार सुरू असल्याचा ठपका ठेवत प्रशासनानेही आडमुठी भूमिका घेतली आहे. या वादामुळे बालसदन आणि सध्या येथे वास्तव्यास असलेल्या १३ मुलांचे भविष्यच अंधारात लोटल्या जाईल की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.विद्यार्थ्यांची रसद, कर्मचाऱ्यांचे पगार रोखले : १३ मुलांचा जीव टांगणीलाविदर्भ सहायता समितीकडून १९९० साली बालसदनची स्थापना करण्यात आली. तत्कालीन राज्यपालांनी काटोल रोडवरील राजभवनाची २.५ एकर जागा या बालसदनसाठी दिली. बालसदनला प्रशासकीय यंत्रणेची जोड मिळावी आणि कारभारावर नियंत्रण राहावे, यासाठी विदर्भ सहायता समितीवर पदसिद्ध अध्यक्ष म्हणून विभागीय आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर अनेक वर्षे बालसदनचा कारभार सुरळीत सुरू होता. यावर्षी तर बालसदनची अवस्था अतिशय दयनीय झाल्याचे चित्र आहे. विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार शासनाने गेल्या पाच महिन्यांपासून या बालगृहाची रसदच बंद केली आहे; सोबतच येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगारही बंद केले आहेत. सध्या बालगृहात १३ मुले व त्यांच्या व्यवस्थेसाठी ३ कर्मचारी कार्यरत आहेत. शासकीय रसद बंद झाल्याने मुलांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. दुसरीकडे पगार न मिळाल्यामुळे कर्मचारी हतबल झाले आहेत. समितीचे आजीवन सदस्य असलेल्या ज्ञानेश्वर रक्षक यांनी बालसदनच्या परिस्थितीसाठी विभागीय आयुक्त प्रशासनाला जबाबदार धरले आहे. प्रशासनाला या जागेवर दुसरीच इमारत उभी करायची आहे. त्यामुळे बालसदनला टाळे ठोकण्याचे षङ्यंत्र प्रशासन करीत असल्याचा आरोप रक्षक यांनी लावला. रक्षक यांनी सांगितले की, २०१३ साली तत्कालीन आयुक्त बी.व्ही. गोपाल रेड्डी यांनी बालसदन संस्था बंद करण्यात येणार असल्याचे सांगत मुलांना प्रवेश देणे बंद करा, असे निर्देश सदस्यांना दिले होते. मात्र ही सेवाभावी संस्था बंद होऊ नये म्हणून आम्ही एनजीओंच्या सहकार्याने आंदोलनाचा पवित्रा घेतला. या दबावामुळे त्यांनी हा निर्णय मागे घेतल्याचे रक्षक म्हणाले. यानंतर आलेल्या आयुक्तांनीही हाच पवित्रा घेतला.