शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

राष्ट्र उभारणीत बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा!

By admin | Updated: April 10, 2017 02:00 IST

काजव्याचा प्रकाश तोपर्यंतच असतो जोपर्यंत सूर्य उगवत नाही. याप्रमाणेच डॉ. बाबासाहेबांच्या विद्वत्तेपुढे आपला टिकाव लागणार नाही.

सुनील कदम : पुसद येथे धम्मक्रांती प्रज्ञापर्वातील द्वितीय प्रबोधन पुष्पपुसद : काजव्याचा प्रकाश तोपर्यंतच असतो जोपर्यंत सूर्य उगवत नाही. याप्रमाणेच डॉ. बाबासाहेबांच्या विद्वत्तेपुढे आपला टिकाव लागणार नाही. म्हणून त्यांना जाती किंवा विशिष्ट लोकांचे उद्धारकर्ते म्हणून चाकोरित बांधण्याचा प्रयत्न येथील विद्वान म्हणविणाऱ्यांनी केला. तसेच बाबासाहेबांनी केलेल्या कामाचे श्रेय स्वत: लाटून घेण्याचा प्रकारच हे सिद्ध करतो की भारताच्या उभारणीत बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा होता, असे प्रतिपादन मुंबई येथील आंबेडकरवादी विचारवंत सुनील कदम यांनी केले. धम्मक्रांती प्रज्ञापर्वानिमित्त आयोजित प्रबोधनमालेत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्र उभारणीत योगदान’ या विषयावर ते दुसरे पुष्प गुंफत होते. सुरुवातीला आदर्शनगरच्या चिमुकल्यांनी ‘जय भीमवाल्यांची शान निळा झेंडा’ या गीतावर नृत्य, तर शिवाजी वॉर्ड येथील परिवर्तन बहुद्देशीय महिला मंडळाने सामूहिक बुद्ध वंदना सादर केली. अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुधीर भगत, मनोज बागुल, राजेंद्र कांबळे, यशवंत देशमुख, विश्वास भवरे, आर.डी. रणवीर, प्रज्ञापर्वचे अध्यक्ष मिलिंद हट्टेकर उपस्थित होते. वर्धा येथील सुधीर भगत यांनी ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या विषयावर विचार व्यक्त करताना पाली भाषेला अद्यापपर्यंत संविधानिक दर्जा न मिळाल्याची खंत व्यक्त केली. तर मुंबई येथील विचारवंत राजेंद्र कांबळे यांनी अनुसूचित जाती जमाती, ओबीसींची सद्यस्थिती या विषयावर बोलताना देशाच्या आर्थिक बजेटमध्ये आपल्याला न्याय मिळत नसल्याचे सांगत यासाठी आर्थिक विषयावर व्यापक लढा भीमसैनिकांनी उभारावा, असे आवाहन केले.संचालन भाऊ गवई यांनी, तर आभार दीपक मेश्राम यांनी मानले. सोमवार, १० एप्रिल रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनिस यांचे ‘राष्ट्रभक्त आंबेडकर आणि भारताचे भविष्य’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. (प्रतिनिधी)