शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
2
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
3
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
4
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
5
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
6
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
7
"जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक
8
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
9
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
10
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
12
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...
13
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?
14
Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान!
15
एल्विशची सिस्टम हँग होणार! सापाचे विष आणि ड्रग्जच्या वापराप्रकरणात युट्यूबरला कोर्टाचा दणका
16
पाकिस्तानात आज पुन्हा भूकंपाचे धक्का; ७ दिवसांत तिसऱ्यांदा हादरली पाकची जमीन
17
सचिन वर्सेस विराट; कसोटीत कोण ठरलं भारी! इथं पाहा खास रेकॉर्ड
18
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
19
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"
20
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!

राष्ट्र उभारणीत बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा!

By admin | Updated: April 10, 2017 02:00 IST

काजव्याचा प्रकाश तोपर्यंतच असतो जोपर्यंत सूर्य उगवत नाही. याप्रमाणेच डॉ. बाबासाहेबांच्या विद्वत्तेपुढे आपला टिकाव लागणार नाही.

सुनील कदम : पुसद येथे धम्मक्रांती प्रज्ञापर्वातील द्वितीय प्रबोधन पुष्पपुसद : काजव्याचा प्रकाश तोपर्यंतच असतो जोपर्यंत सूर्य उगवत नाही. याप्रमाणेच डॉ. बाबासाहेबांच्या विद्वत्तेपुढे आपला टिकाव लागणार नाही. म्हणून त्यांना जाती किंवा विशिष्ट लोकांचे उद्धारकर्ते म्हणून चाकोरित बांधण्याचा प्रयत्न येथील विद्वान म्हणविणाऱ्यांनी केला. तसेच बाबासाहेबांनी केलेल्या कामाचे श्रेय स्वत: लाटून घेण्याचा प्रकारच हे सिद्ध करतो की भारताच्या उभारणीत बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा होता, असे प्रतिपादन मुंबई येथील आंबेडकरवादी विचारवंत सुनील कदम यांनी केले. धम्मक्रांती प्रज्ञापर्वानिमित्त आयोजित प्रबोधनमालेत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्र उभारणीत योगदान’ या विषयावर ते दुसरे पुष्प गुंफत होते. सुरुवातीला आदर्शनगरच्या चिमुकल्यांनी ‘जय भीमवाल्यांची शान निळा झेंडा’ या गीतावर नृत्य, तर शिवाजी वॉर्ड येथील परिवर्तन बहुद्देशीय महिला मंडळाने सामूहिक बुद्ध वंदना सादर केली. अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुधीर भगत, मनोज बागुल, राजेंद्र कांबळे, यशवंत देशमुख, विश्वास भवरे, आर.डी. रणवीर, प्रज्ञापर्वचे अध्यक्ष मिलिंद हट्टेकर उपस्थित होते. वर्धा येथील सुधीर भगत यांनी ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या विषयावर विचार व्यक्त करताना पाली भाषेला अद्यापपर्यंत संविधानिक दर्जा न मिळाल्याची खंत व्यक्त केली. तर मुंबई येथील विचारवंत राजेंद्र कांबळे यांनी अनुसूचित जाती जमाती, ओबीसींची सद्यस्थिती या विषयावर बोलताना देशाच्या आर्थिक बजेटमध्ये आपल्याला न्याय मिळत नसल्याचे सांगत यासाठी आर्थिक विषयावर व्यापक लढा भीमसैनिकांनी उभारावा, असे आवाहन केले.संचालन भाऊ गवई यांनी, तर आभार दीपक मेश्राम यांनी मानले. सोमवार, १० एप्रिल रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनिस यांचे ‘राष्ट्रभक्त आंबेडकर आणि भारताचे भविष्य’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. (प्रतिनिधी)