शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्र उभारणीत बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा!

By admin | Updated: April 10, 2017 02:00 IST

काजव्याचा प्रकाश तोपर्यंतच असतो जोपर्यंत सूर्य उगवत नाही. याप्रमाणेच डॉ. बाबासाहेबांच्या विद्वत्तेपुढे आपला टिकाव लागणार नाही.

सुनील कदम : पुसद येथे धम्मक्रांती प्रज्ञापर्वातील द्वितीय प्रबोधन पुष्पपुसद : काजव्याचा प्रकाश तोपर्यंतच असतो जोपर्यंत सूर्य उगवत नाही. याप्रमाणेच डॉ. बाबासाहेबांच्या विद्वत्तेपुढे आपला टिकाव लागणार नाही. म्हणून त्यांना जाती किंवा विशिष्ट लोकांचे उद्धारकर्ते म्हणून चाकोरित बांधण्याचा प्रयत्न येथील विद्वान म्हणविणाऱ्यांनी केला. तसेच बाबासाहेबांनी केलेल्या कामाचे श्रेय स्वत: लाटून घेण्याचा प्रकारच हे सिद्ध करतो की भारताच्या उभारणीत बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा होता, असे प्रतिपादन मुंबई येथील आंबेडकरवादी विचारवंत सुनील कदम यांनी केले. धम्मक्रांती प्रज्ञापर्वानिमित्त आयोजित प्रबोधनमालेत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्र उभारणीत योगदान’ या विषयावर ते दुसरे पुष्प गुंफत होते. सुरुवातीला आदर्शनगरच्या चिमुकल्यांनी ‘जय भीमवाल्यांची शान निळा झेंडा’ या गीतावर नृत्य, तर शिवाजी वॉर्ड येथील परिवर्तन बहुद्देशीय महिला मंडळाने सामूहिक बुद्ध वंदना सादर केली. अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुधीर भगत, मनोज बागुल, राजेंद्र कांबळे, यशवंत देशमुख, विश्वास भवरे, आर.डी. रणवीर, प्रज्ञापर्वचे अध्यक्ष मिलिंद हट्टेकर उपस्थित होते. वर्धा येथील सुधीर भगत यांनी ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या विषयावर विचार व्यक्त करताना पाली भाषेला अद्यापपर्यंत संविधानिक दर्जा न मिळाल्याची खंत व्यक्त केली. तर मुंबई येथील विचारवंत राजेंद्र कांबळे यांनी अनुसूचित जाती जमाती, ओबीसींची सद्यस्थिती या विषयावर बोलताना देशाच्या आर्थिक बजेटमध्ये आपल्याला न्याय मिळत नसल्याचे सांगत यासाठी आर्थिक विषयावर व्यापक लढा भीमसैनिकांनी उभारावा, असे आवाहन केले.संचालन भाऊ गवई यांनी, तर आभार दीपक मेश्राम यांनी मानले. सोमवार, १० एप्रिल रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनिस यांचे ‘राष्ट्रभक्त आंबेडकर आणि भारताचे भविष्य’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. (प्रतिनिधी)