शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
2
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
3
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
4
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
5
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
6
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
7
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
8
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
9
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
10
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
11
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
12
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
13
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
14
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
15
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
16
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
17
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
18
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
19
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
20
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा

बाबासाहेबांना अपेक्षित लोकशाही रुजलीच नाही

By admin | Updated: May 30, 2014 01:12 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना या देशात संविधानाच्या माध्यमातून केवळ राजकीय लोकशाही नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही रुजवायची होती. परंतु राज्यकर्त्यांंनी संविधानाचा वापर केवळ

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना या देशात संविधानाच्या माध्यमातून केवळ राजकीय  लोकशाही नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही रुजवायची होती. परंतु राज्यकर्त्यांंनी  संविधानाचा वापर केवळ आपल्या पद्धतीने केला. राजकीय लोकशाहीवरच अधिक भर देण्यात  आला. त्यामुळे या देशात केवळ राजकीय लोकशाही प्रस्थापित झाली. बाबासाहेबांना अपेक्षित  सामाजिक आणि आर्थिक लोकशाही रुजू शकली नाही, असे रोखठोक मत आंबेडकरी विचारवंत  व मुंबईचे अतिरिक्त आयकर आयुक्त सुबचन राम यांनी येथे व्यक्त केले.  वंदना संघ दीक्षाभूमी आणि लॉर्ड बुद्धा टीव्ही यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संविधान सभा डिबेटस्’चे  मराठी अनुवादित निकाय खंड ४, ५ व ६ संस्करणाचे लोकार्पण करताना ते बोलत होते. डॉ.  वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या लोकार्पण सोहळ्याला भय्याजी खैरकर, लॉर्ड बुद्धा  टीव्हीचे संचालक सचिन मून, अनुवादकर्ता प्रा. देवीदास घोडेस्वार, वासुदेवराव थूल, विठ्ठलराव  डांगरे, रेवनदास लोखंडे, जमुना डगावकर प्रामुख्याने उपस्थित होते.  सुबचन राम म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक विचार लोकांपर्यंंत  पोहोचविण्याची जबाबदारी आपली आहे. परंतु त्यासाठी एखाद्या मिशनरी     कार्यकर्त्याप्रमाणे  काम करावे लागेल. मिशनरीप्रमाणे आपण राहिलो तरच बाबासाहेबांना अपेक्षित संविधानिक  सामाजिक व आर्थिक लोकशाही रुजविता येईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.  प्रा. देवीदास घोडेस्वार यांनी सध्याची परिस्थिती एकूणच अल्पसंख्यक व मागासवर्गीयांसाठी  बिकट असल्याचे समजावून सांगितले. संविधानामुळेच आम्ही मुक्त झालो आहोत. सार्वभौम झालो  आहोत. परंतु संविधानावर विश्‍वास नसणार्‍या मंडळींना हे नको आहे. त्यामुळे ते संविधानाची  व्याख्या नव्याने मांडू लागले आहेत. त्यामुळे ते सांगतात म्हणून त्यावर विश्‍वास ठेवू नका. आपली  पिढी वाचवायची असेल तर संविधानाचा अभ्यास करा. संविधानाच्या डिबेटस्मधून संविधानाची  खरी व्याख्या लक्षात येईल. तेव्हा त्याचा अभ्यास करा, कुणाच्या षड्यंत्राला बळी पडू नका, असे  आवाहन त्यांनी केले.  भारतीय लोकशाही आणि संविधानाला वाचवायचे असेल तर व्यक्तिपूजेपासून सावध राहा, अशी  सूचनाही त्यांनी यावेळी केली. नेहा लोखंडे यांनी संचालन केले.  विठ्ठलराव डांगरे यांनी प्रास्ताविक  केले.  (प्रतिनिधी)बाबासाहेबांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्याची तयारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्यास महाराष्ट्र शासन अपयशी  ठरले आहे. तेव्हा ते साहित्य प्रकाशित करण्यास राईटस् थिंकर्स पब्लिकेशन अँण्ड डॉक्युमेन्टेशन  प्रा.लि.च्या माध्यमातून आम्ही तयार आहोत. याबाबत महाराष्ट्र शासनाला पत्रव्यवहारसुद्धा  करण्यात आला आहे, अशी माहिती प्रा. देवीदास घोडेस्वार यांनी यावेळी दिली.