शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

बाबासाहेब आंबेडकर छोट्या राज्यांचे पुरस्कर्ते

By admin | Updated: December 25, 2016 03:00 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नेहमीच छोट्या राज्याचे पुरस्कर्ते राहिले आहेत. राज्यकारभार आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने छोटी राज्ये असावीत,

श्रीनिवास खांदेवाले : दीक्षाभूमी येथे व्याख्यानमाला नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नेहमीच छोट्या राज्याचे पुरस्कर्ते राहिले आहेत. राज्यकारभार आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने छोटी राज्ये असावीत, असे त्यांचे मत होते. ज्यावेळी एका भाषेचे एक राज्य ही संकल्पना मांडली जात होती त्यावेळी त्यांनी मराठी भाषेच्या महाराष्ट्राचे एक नव्हे तर चार राज्ये करावीत, असे सांगितले होते. यासाठी त्यांनी दिलेले तर्क हे आजही लागू होतात, असे प्रतिपादन रुईकर इन्स्टिट्यूट आॅफ लेबर अ‍ॅण्ड सोशिओ कल्चरल स्टडीजचे संचालक अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी येथे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती व डॉ. आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती महोत्सवनिमित्त दीक्षाभूमी येथे व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू डॉ. हरिभाऊ केदार होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, सचिव सदानंद फुलझेले, प्राचार्य पी.सी. पवार, स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे प्रामुख्याने उपस्थित होते. ‘विदर्भाविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका’ या विषयावर बोलताना श्रीनिवास खांदेवाले म्हणाले, बाबासाहेबांचा प्रत्येक विचार हा नैतिकता व मानवतेवर अवलंबून असल्याचे दिसून येते. त्यांचे विचार वाचून आपण उन्नत होतो. त्यांचे तर्क आजही लागू पडतात. राज्याच्या पुनर्रचनेबाबतही तेच दिसून येते. नागपूर ही मध्य प्रांताची राजधानी होती. २२ जिल्हे त्यात होते. यापैकी १४ जिल्हे हे हिंदी भाषिक आणि ८ जिल्हे हे मराठी भाषिक होते. मराठी भाषेचे वेगळे विदर्भ राज्य व्हावे, अशी विदर्भ राज्यातील नागरिकांची मागणी होती. परंतु ती मागे पडली आणि विदर्भाला महाराष्ट्रात जोडण्यात आले. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्राचे एक नव्हे तर चार राज्ये व्हावीत, अशी भूमिका मांडली होती. त्यात विदर्भाचे पूर्व महाराष्ट्र असे राज्य करण्यात यावे, अशी भूमिका मांडली होती. नागपूर कराराच्या वेळीसुद्धा त्यांनी या कराराला पश्चिम महाराष्ट्रातील नेते काडीचीही किंमत देणारी नाही, असे डॉ. आंबेडकरांनी स्पष्ट सांगितले होते. आज ती बाब खरी ठरली आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत डॉ. आंबेडकरांचे विचार आज सर्वच राजकारण्यांनी बाद केले असल्याचेही खांदेवाले यांनी सांगितले. विदर्भ हा स्वतंत्र झाला तर तो निश्चितच सक्षम राज्य होईल, असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. विजय चिकाटे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. शैलेश बहादुरे यांनी संचालन केले तर प्रा. करपे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) सामाजिक समतेसाठी बाबासाहेब आयुष्यभर झटले हरिभाऊ केदार यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांचा विकास घडून येण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आयुष्यभर झटले. वेगळ्या विदर्भाची संकल्पना त्यांनी पूर्वीच मांडलेली होती. याकरिता डॉ. आंबेडकरांचे मूलगामी विचार महत्त्वाचे ठरलेले आहे. महाराष्ट्र व विदर्भाबाबत बोलताना ते म्हणाले, त्यांनी दोन भाऊ एकत्र राहू शकत नसतील तर मित्र म्हणून तर राहू शकतात. एकट्या पुण्यात जेवढे कारखाने आहेत, तितके संपूर्ण विदर्भातही नाहीत, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.