शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

बाबासाहेब आंबेडकर छोट्या राज्यांचे पुरस्कर्ते

By admin | Updated: December 25, 2016 03:00 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नेहमीच छोट्या राज्याचे पुरस्कर्ते राहिले आहेत. राज्यकारभार आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने छोटी राज्ये असावीत,

श्रीनिवास खांदेवाले : दीक्षाभूमी येथे व्याख्यानमाला नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नेहमीच छोट्या राज्याचे पुरस्कर्ते राहिले आहेत. राज्यकारभार आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने छोटी राज्ये असावीत, असे त्यांचे मत होते. ज्यावेळी एका भाषेचे एक राज्य ही संकल्पना मांडली जात होती त्यावेळी त्यांनी मराठी भाषेच्या महाराष्ट्राचे एक नव्हे तर चार राज्ये करावीत, असे सांगितले होते. यासाठी त्यांनी दिलेले तर्क हे आजही लागू होतात, असे प्रतिपादन रुईकर इन्स्टिट्यूट आॅफ लेबर अ‍ॅण्ड सोशिओ कल्चरल स्टडीजचे संचालक अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी येथे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती व डॉ. आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती महोत्सवनिमित्त दीक्षाभूमी येथे व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू डॉ. हरिभाऊ केदार होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, सचिव सदानंद फुलझेले, प्राचार्य पी.सी. पवार, स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे प्रामुख्याने उपस्थित होते. ‘विदर्भाविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका’ या विषयावर बोलताना श्रीनिवास खांदेवाले म्हणाले, बाबासाहेबांचा प्रत्येक विचार हा नैतिकता व मानवतेवर अवलंबून असल्याचे दिसून येते. त्यांचे विचार वाचून आपण उन्नत होतो. त्यांचे तर्क आजही लागू पडतात. राज्याच्या पुनर्रचनेबाबतही तेच दिसून येते. नागपूर ही मध्य प्रांताची राजधानी होती. २२ जिल्हे त्यात होते. यापैकी १४ जिल्हे हे हिंदी भाषिक आणि ८ जिल्हे हे मराठी भाषिक होते. मराठी भाषेचे वेगळे विदर्भ राज्य व्हावे, अशी विदर्भ राज्यातील नागरिकांची मागणी होती. परंतु ती मागे पडली आणि विदर्भाला महाराष्ट्रात जोडण्यात आले. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्राचे एक नव्हे तर चार राज्ये व्हावीत, अशी भूमिका मांडली होती. त्यात विदर्भाचे पूर्व महाराष्ट्र असे राज्य करण्यात यावे, अशी भूमिका मांडली होती. नागपूर कराराच्या वेळीसुद्धा त्यांनी या कराराला पश्चिम महाराष्ट्रातील नेते काडीचीही किंमत देणारी नाही, असे डॉ. आंबेडकरांनी स्पष्ट सांगितले होते. आज ती बाब खरी ठरली आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत डॉ. आंबेडकरांचे विचार आज सर्वच राजकारण्यांनी बाद केले असल्याचेही खांदेवाले यांनी सांगितले. विदर्भ हा स्वतंत्र झाला तर तो निश्चितच सक्षम राज्य होईल, असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. विजय चिकाटे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. शैलेश बहादुरे यांनी संचालन केले तर प्रा. करपे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) सामाजिक समतेसाठी बाबासाहेब आयुष्यभर झटले हरिभाऊ केदार यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांचा विकास घडून येण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आयुष्यभर झटले. वेगळ्या विदर्भाची संकल्पना त्यांनी पूर्वीच मांडलेली होती. याकरिता डॉ. आंबेडकरांचे मूलगामी विचार महत्त्वाचे ठरलेले आहे. महाराष्ट्र व विदर्भाबाबत बोलताना ते म्हणाले, त्यांनी दोन भाऊ एकत्र राहू शकत नसतील तर मित्र म्हणून तर राहू शकतात. एकट्या पुण्यात जेवढे कारखाने आहेत, तितके संपूर्ण विदर्भातही नाहीत, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.