शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

बाबांनी चहा विकला मी आयएएस होणार!

By admin | Updated: June 3, 2014 03:04 IST

त्या दाम्पत्याला दोन मुली. वंशाचा दिवा कोण वाढवणार?

९0.१५ टक्के गुण मिळविणार्‍या शुभांगीची जिद्द

सुनील चरपे नागपूर

त्या दाम्पत्याला दोन मुली. वंशाचा दिवा कोण वाढवणार? याची चिंता नाही. गरजही नाही. चहाची कॅन्टीन चालवून आपला उदरनिर्वाह करतात. घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. परंतु तरीही मुलींनी चांगले शिकावे, मोठय़ा हुद्याची नोकरी करावी, यासाठी त्यांचा आटापिटा. मुलीनेही बारावीच्या परीक्षेत ९0.१५ टक्के गुण घेऊन आपल्या आई-वडिलांच्या कष्टाला सार्थक केले. माझे आई-वडील चहा विकतात. या बळावरच त्यांनी मला शिकविले. आता त्यांचे ऋण फेडायची वेळ माझी आहे. मला आता आयएएस होऊन आपल्या पालकांना चांगले दिवस दाखवायचे आहेत. ही जिद्द आहे शुभांगी नारेकर या विद्यार्थिनीची.

शुभांगी सदर येथील जाईबाई चौधरी ज्ञानपीठ येथे कॉर्मस शाखेला होती. वडील दिलीप आणि आई मीराबाई हे सुरेंद्रगडसारख्या झोपडपट्टीत एका भाड्याच्या खोलीत राहतात. त्यांना शुभांगी आणि कोकिळा या दोन मुली. शुभांगी बारावीला होती. घरच्या परिस्थितीची तिला जाणीव आहे. त्यामुळे दोन खोलीचे घर. त्यात चार जीव. सुखी समाधानाने राहतात. आई-वडील आपल्यासाठी किती कष्ट घेतात, याची जाणीव दोन्ही मुलींना आहे. शुभांगी मोठी असल्याने ती जरा जास्त व शहाण्यासारखी वागते. आई-वडील दोघेही कामासाठी घराबाहेर असल्याने घरातील संपूर्ण कामे तीच करते. हे तिचे बारावीचे वर्ष असल्याने आई तिला फारसे काम करू देत नव्हती. तरी ती आपल्या अभ्यास सांभाळून आईला मदत करायचीच.

शिकवणी लावली नाही. शाळेत नियमित जाणे आणि शिक्षकांनी दिलेले होमवर्क करणे यावरच अधिक लक्ष केंद्रित केले. दहावीमध्ये ८२ टक्के गुण घेतल्याने आई-वडिलांचाही तिच्यावर फार विश्‍वास. आपली मुलगी नक्कीच नाव कमावणार, असे तिच्या आई-वडिलांना नेहमीच वाटायचे. हा विश्‍वास अखेर तिने सार्थ केला.

पालीमध्ये १00 पैकी १00

शुभांगी ही ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थिनी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तिचे आदर्श. ज्या ठिकाणी ती अभ्यास करते, तिथे तिने डॉ. आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धांची मूर्ती ठेवली आहे. यातून आपल्याला प्रेरणा मिळत असल्याचे ती सांगते. या प्रेरणेतूनच पाली या विषयामध्ये शुभांगीने १00 पैकी १00 गुण घेतले आहे.