शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्काराने व्यक्तीला बळ मिळते

By admin | Updated: January 2, 2017 02:12 IST

मी स्वत: पुरस्कार सोहळ्यांना उपस्थित राहत नाही. मात्र पुरस्कारांना माझा विरोधही नाही.

श्याम मानव यांचे प्रतिपादन : सी. मो. फाऊंडेशनतर्फे पुरस्कार वितरण समारंभ नागपूर : मी स्वत: पुरस्कार सोहळ्यांना उपस्थित राहत नाही. मात्र पुरस्कारांना माझा विरोधही नाही. व्यक्तीला पुरस्कारांनी बळ मिळते. काम करण्याचा उत्साह मिळतो. त्यामुळे पुरस्कार वितरणासारखे उपक्रम झालेच पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्घा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी केले. सी. मो. झाडे फाऊंडेशनच्यावतीने रविवारी आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. सर्वोदय आश्रम, विनोबा भावे केंद्र येथे हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड़ मा. म. गडकरी होते. मंचावर अतिथी म्हणून दिल्ली येथील रवी कालरा, ज्येष्ठ पत्रकार अविनाश दुधे व सी. मो. झाडे फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास झाडे उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यानंतर पाहुण्यांच्या हस्ते सामाजिक, शैक्षणिक, अपंग-क्रीडा, आरोग्य व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी प्रा. मानव पुढे म्हणाले, सामाजिक क्षेत्रात काम करणारी प्रत्येक व्यक्ती ही एक शिक्षक असते. समाजात वैचारिक परिवर्तन घडवायचे असेल, तर त्यासाठी तर्कशुद्ध बुद्धी जागृत करून परिवर्तन घडवून आणावे लागते. सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होत असल्याचा दावा करीत आहे. मात्र अशीच परिस्थितीत कायम राहिल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या पुन्हा वाढणार आहेत. नोटाबंदीने खेड्यातील लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सध्याचे सरकार हे भांडवलदारांचे सरकार असल्याचाही त्यांनी यावेळी आरोप केला. तसेच या कार्यक्रमासाठी दिल्ली येथून आलेले रवि कालरा यांनी मानव सेवेतच परमेश्वर असल्याचे सांगितले. परमेश्वराने मनुष्याला सर्वांधिक बुद्धी दिली असून, ती समाजकार्यासाठी दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी) पाच मान्यवरांचा गौरव या समारंभात पाहुण्यांच्या हस्ते सामाजिक, शैक्षणिक, अपंग-क्रीडा, आरोग्य व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पाच मान्यवरांना डॉ. गोविंद समर्थ, मीराबेन शाह, ना. बा. सपाटे, सी. मो. झाडे व डॉ. अतुल कल्लावार यांच्या नावे पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. यात जगदीश हरडे, रुबीना पटेल, पंकज वंजारी, कृष्णकुमार मिश्रा व डॉ. राजेश नाईक यांचा समावेश होता. शाल-श्रीफळ, रोख पाच हजार रुपये व प्रमाणपत्र असे त्या पुरस्काराचे स्वरूप होते.