शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

राज्यातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:06 IST

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव, कधी मराठा आरक्षण तर कधी अन्य तांत्रिक कारणांमुळे राज्य लोकसेवा आयोगाद्वारे करण्यात येणारी पदभरती, घेण्यात ...

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव, कधी मराठा आरक्षण तर कधी अन्य तांत्रिक कारणांमुळे राज्य लोकसेवा आयोगाद्वारे करण्यात येणारी पदभरती, घेण्यात येणाऱ्या परीक्षा, नियुक्त्या रखडलेल्या आहेत. त्यामुळे राज्यातील जवळपास १५ लाख विद्यार्थी अस्वस्थ आहेत. कोरोनामुळे गरीब सामान्य वर्गातील कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे आणि त्यातच मागील २ ते ३ वर्षांपासून परीक्षा लांबणीवर जाणे, नियुक्त्या रखडणे, नवीन पदभरती न होणे हे विद्यार्थ्यांसाठी भयावय आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शारीरिक, आर्थिक तसेच मानसिक खच्चीकरण होत आहे. त्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

सरकारी नोकरी लागावी या उद्देशाने मोठ्या संख्येने विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. यासाठी आता तर इंजिनिअरींग व उच्च शिक्षित विद्यार्थी सुद्धा मोठ्या संख्येने परीक्षा देत आहेत. दरवर्षी एमपीएससीद्वारे परीक्षा घेतली जाते. विद्यार्थी पाच, सहा वर्षांपासून तयारी करतात. मुलींचीही संख्या यात मोठी आहे. अशात शासनातर्फे परीक्षा घेण्यातच येत नसलीत तर या विद्यार्थ्यांची मेहनत पाण्यात जात आहे. शिवाय त्यांचे वय सुद्धा वाढत आहे. २०१९ मध्ये एमपीएससीने परीक्षा घेतल्या. त्यानंतर अजूनही परीक्षा झाल्या नाहीत.

- एमपीएससीद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेची स्थिती

१) राज्य सेवा परीक्षा ४ वेळा पुढे ढकलण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आक्रोशानंतर मार्च २०२१ मध्ये पूर्व परीक्षा घेण्यात आली. आतापर्यंत निकाल लागलेला नाही.

२) संयुक्त पूर्व परीक्षा ५ वेळा पुढे ढकलण्यात आली. मागील १८ महिन्यांपासून परीक्षा झाली नाही.

३) आरटीओची पूर्व परीक्षा होऊन दीड वर्ष झाले. अजूनही निकाल लागलेला नाही.

४) सहा. वन संरक्षकाच्या परीक्षेचा अंतिम निकाल गेल्या वर्षभरापासून लागलेला नाही.

५) वर्ग ‘क’ च्या मंत्रालयीन पदांकरिता २ वर्षांपासून जाहिरात नाही.

६) कर सहाय्यक, महिला व बाल कल्याण अधिकारी या पदाकरीता ३ वर्षांपासून जाहिरात नाही.

७) स्थापत्य अभियांत्रिकी परीक्षेत ३६०० विद्यार्थ्यांच्या मुलाखती रखडलेल्या आहे.

८) कृषी विभागातील पदभरती रखडलेली आहे.

९) पीएसआय पदासाठी, शारीरिक चाचणी दीड वर्षापासून झालेली नाही.

-राज्य लोकसेवा आयोगात सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्या

मागील ३ वर्षांपासून राज्य लोकसेवा आयोगात सदस्यांची नियुक्ती केली नाही. सध्या ६ पैकी २ सदस्य कार्यरत आहेत. मागील सरकारने आणि आताच्याही सरकारने सुद्धा याकडे दुर्लक्षच केले आहे. दोनपैकी एक सदस्य लवकरच निवृत्त होणार आहे. त्याचा परिणाम एमपीएससीद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांवर होत आहे.

- आता घरच्यांचे बोलणे खावे लागत आहे

२०१६ ला बीटेक झाले. तेव्हापासून एमपीएससीची तयारी सुरू केली. २०१९ मध्ये झालेल्या मेन्समध्ये पीएसआयसाठी १ मार्क कमी पडला. त्यामुळे पुन्हा जिद्दीने अभ्यासाला लागले. दहा दहा तास अभ्यास केला आहे. यंदा नक्कीच मेन्स क्लिअर होईल याचा आत्मविश्वास आहे. परंतु एमपीएससीने परीक्षेची तारीख काही जाहीर केली नाही. तिकडे वय वाढत असल्याने घरच्यांचे लग्नासाठी बोलणे खावे लागत आहे. त्यांना कोणते कारण द्यावे, असा प्रश्न आमच्यासारख्या मुलींना पडला आहे.

- गौरी रेणुसे, विद्यार्थिनी

- परीक्षा होत नसल्या तर मुलांचे वय निघून जात आहे. परीक्षेच्या तयारीसाठी ते दुसरे जॉब करीत नाही. मुलींचे सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहे. यासाठी सरकार आणि एमपीएससीही जबाबदार आहे. एमपीएससी आपल्या निर्णयावर ठाम नाही. सरकारचा हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

उमेश कोर्राम

स्टुडंट राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया