शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
3
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
4
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
5
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
6
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
7
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
8
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
9
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
10
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
11
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
12
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
13
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
14
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
15
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
16
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा
17
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
18
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
19
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
20
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...

काेराेना विधवांना ‘भाऊ’आधार देण्याचा प्रयत्न ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:09 IST

नागपूर : कोरोना महामारीने राज्यभरात २०,००० पेक्षा जास्त महिलांचे कुंकू पुसले आहे. कर्त्या माणसाच्या जाण्याने पाेरक्या झालेल्या कुटुंबाचा आधार ...

नागपूर : कोरोना महामारीने राज्यभरात २०,००० पेक्षा जास्त महिलांचे कुंकू पुसले आहे. कर्त्या माणसाच्या जाण्याने पाेरक्या झालेल्या कुटुंबाचा आधार झालेल्या या महिलांच्या आयुष्यात एकटेपणाची भावना निर्माण हाेण्याची शक्यता आहे. या भगिनींना मानसिक आधार देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सरसावले आहेत. अशा महिलांच्या घरापर्यंत जाऊन ‘रक्षाबंधन’ भेट देण्याचे अभियान आज राज्यभर राबविण्यात येत आहे.

कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्यावतीने समन्वयक हेरंभ कुळकर्णी यांच्या आवाहनानंतर २२ जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात येत आहे. काेराेनामुळे विधवा झालेल्या महिलांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी समितीच्या माध्यमातून १५० च्यावर संस्था जुळल्या आहेत. अशा महिलांवे सर्वेक्षण करण्यापासून ते शासनाच्या वेगवेगळ्या याेजनांचा लाभ मिळवून देणे व अशा निराधार कुटुंबाच्या पुनर्वसनाकडे शासनाचे लक्ष वेधण्याचे कार्य या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे चालविले आहे. या प्रयत्नांमुळेच राज्य शासनाने निराधार बालक व काेराेना विधवांसाठी वेगवेगळ्या याेजना आखल्या आहेत.

सणासुदीच्या दिवशी मात्र त्यांना एकटेपणाची जाणीव हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणारे सण या कुटुंबाच्या घरी जाऊन साजरा करण्याचे अभियान राबविले जात असून रक्षाबंधन पर्वावर याची सुरुवात करण्यात आली. जिल्हा व तालुका स्तरावर असलेले या संस्थांचे कार्यकर्तेे गावाेगावी अशा एकल महिलांच्या घरी जाणार आहेत. स्थानिक लाेकप्रतिनिधी, सरपंच, पाेलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य आणि शासकीय अधिकाऱ्यांनाही साेबत घेतले जाणार आहे. आपल्या परिसरातील कोरोना विधवा असेल किंवा इतर कोणतीही विधवा किंवा एकल महिला असेल अशा बहिणीच्या घरी जाऊन आपण रक्षाबंधन साजरे केले तर त्या महिलेला नक्कीच आधार वाटेल. तुम्ही एकट्या नाहीत तर सर्व समाज तुमच्या पाठीशी आहे असा संदेश देण्यासाठीच हे अभियान आयाेजित केल्याची भावना हेरंभ कुळकर्णी यांनी व्यक्त केली. समितीचे सर्व कार्यकर्ते गावागावात अशा रीतीने रक्षाबंधन साजरे करणार आहेत.

शासन स्तरावर विधवा महिला व निराधार कुटुंबांसाठी नियाेजन केले जात असले तरी हवी तशी आर्थिक मदत या कुटुंबापर्यंत पाेहचल्याचे दिसत नाही. या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी समितीचे प्रयत्न आहेत. काही प्रमाणात यश आले पण अजून माेठा पल्ला गाठायचा आहे. या उपक्रमातून त्यांना भावनिक आधार देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

- हेरंभ कुळकर्णी, सामाजिक कार्यकर्ते