शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

काेराेना विधवांना ‘भाऊ’आधार देण्याचा प्रयत्न ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:09 IST

नागपूर : कोरोना महामारीने राज्यभरात २०,००० पेक्षा जास्त महिलांचे कुंकू पुसले आहे. कर्त्या माणसाच्या जाण्याने पाेरक्या झालेल्या कुटुंबाचा आधार ...

नागपूर : कोरोना महामारीने राज्यभरात २०,००० पेक्षा जास्त महिलांचे कुंकू पुसले आहे. कर्त्या माणसाच्या जाण्याने पाेरक्या झालेल्या कुटुंबाचा आधार झालेल्या या महिलांच्या आयुष्यात एकटेपणाची भावना निर्माण हाेण्याची शक्यता आहे. या भगिनींना मानसिक आधार देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सरसावले आहेत. अशा महिलांच्या घरापर्यंत जाऊन ‘रक्षाबंधन’ भेट देण्याचे अभियान आज राज्यभर राबविण्यात येत आहे.

कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्यावतीने समन्वयक हेरंभ कुळकर्णी यांच्या आवाहनानंतर २२ जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात येत आहे. काेराेनामुळे विधवा झालेल्या महिलांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी समितीच्या माध्यमातून १५० च्यावर संस्था जुळल्या आहेत. अशा महिलांवे सर्वेक्षण करण्यापासून ते शासनाच्या वेगवेगळ्या याेजनांचा लाभ मिळवून देणे व अशा निराधार कुटुंबाच्या पुनर्वसनाकडे शासनाचे लक्ष वेधण्याचे कार्य या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे चालविले आहे. या प्रयत्नांमुळेच राज्य शासनाने निराधार बालक व काेराेना विधवांसाठी वेगवेगळ्या याेजना आखल्या आहेत.

सणासुदीच्या दिवशी मात्र त्यांना एकटेपणाची जाणीव हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणारे सण या कुटुंबाच्या घरी जाऊन साजरा करण्याचे अभियान राबविले जात असून रक्षाबंधन पर्वावर याची सुरुवात करण्यात आली. जिल्हा व तालुका स्तरावर असलेले या संस्थांचे कार्यकर्तेे गावाेगावी अशा एकल महिलांच्या घरी जाणार आहेत. स्थानिक लाेकप्रतिनिधी, सरपंच, पाेलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य आणि शासकीय अधिकाऱ्यांनाही साेबत घेतले जाणार आहे. आपल्या परिसरातील कोरोना विधवा असेल किंवा इतर कोणतीही विधवा किंवा एकल महिला असेल अशा बहिणीच्या घरी जाऊन आपण रक्षाबंधन साजरे केले तर त्या महिलेला नक्कीच आधार वाटेल. तुम्ही एकट्या नाहीत तर सर्व समाज तुमच्या पाठीशी आहे असा संदेश देण्यासाठीच हे अभियान आयाेजित केल्याची भावना हेरंभ कुळकर्णी यांनी व्यक्त केली. समितीचे सर्व कार्यकर्ते गावागावात अशा रीतीने रक्षाबंधन साजरे करणार आहेत.

शासन स्तरावर विधवा महिला व निराधार कुटुंबांसाठी नियाेजन केले जात असले तरी हवी तशी आर्थिक मदत या कुटुंबापर्यंत पाेहचल्याचे दिसत नाही. या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी समितीचे प्रयत्न आहेत. काही प्रमाणात यश आले पण अजून माेठा पल्ला गाठायचा आहे. या उपक्रमातून त्यांना भावनिक आधार देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

- हेरंभ कुळकर्णी, सामाजिक कार्यकर्ते